एक्स्प्लोर

मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाइनच नोंदणी; 15 ऑगस्टपासून नवी नियमावली, आदेश जारी

मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना आता केवळ डिजिटल प्रवेश पत्राद्वारेच प्रवेश देण्यात येईल. डिजीप्रवेश या ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळविता येणार आहे.

मुंबई : राजधानी मुंबई (Mumbai) हे महाराष्ट्राचं मुख्यालय म्हणता येईल, विधिमंडळ, सचिवालय आणि मंत्रालय (Mantralay) ह्या महत्त्वाच्या आणि प्रशासकीय व प्रमुख संस्था मुंबईत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात नागरिक, राजकीय नेतेमंडळी, आमदार, खासदार, पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रमुख भेटी देत असतात. स्थानिक आणि जिल्हा पातळीवर आपली कामे रखडल्यानंतर संबंधित व्यक्ती वा संस्था मंत्रालयाचं दार ठोठावत असते. मात्र, आता मंत्रालयाचं दार सहजपणे ठोठावता येणार नाही. मंत्रालयीन प्रवेशासाठी (Pass) सरकारने आता ऑनलाईन प्रवेश प्रणाली सुरू केली असून डिजी प्रवेश पास असल्याशिवाय तुम्हाला मंत्रालयात एंट्री मिळणार नाही. 

मंत्रालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांना आता केवळ डिजिटल प्रवेश पत्राद्वारेच प्रवेश देण्यात येईल. डिजीप्रवेश या ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळविता येणार आहे. येत्या 15 ऑगस्टपासून ही नवी कार्यप्रणाली लागू केली जात आहे. अभ्यागतांकडे मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. अशिक्षीत तसेच स्मार्टफोन नसलेल्या अभ्यांताकरीता गार्डन गेट येथे ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश नोंदणीकरीता तसेच मदतीकरीता एक खिडकी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे, आता मंत्रालयात यायचं असेल तर नागरिकांना डिजिटल व्हावे लागणार आहे. 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या गृह विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. त्यानुसार, यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेली मॅन्युअली प्रवेश पास देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे.

डिजी अॅपच्या माध्यमातून अशी करा नोंदणी

‘डिजीप्रवेश’ ॲप हे मोबाईल ॲप ॲण्ड्राईड आणि आयओएस ॲपल या दोन्ही प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या मोबाईल च्या प्रणालीनुसार ॲण्ड्राईडमध्ये प्ले स्टोअर वर तर आयओएस ॲपलवर ॲपल स्टोअरवर digi pravesh हे सर्च केल्यास हे ॲप विनामुल्य डाऊनलोड करता येते. या ॲपवर सुरूवातीला केवळ एकदाच नोंदणी करणे आवश्यक राहील. नोंदणी झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारीत यंत्रणेद्वारे छायाचित्राची ओळख पटवून नोंदणी पूर्ण केल्यानंतर ज्या विभागात काम आहे, त्याचा स्लॉट बुक करून रांगेशिवाय प्रवेश घेता येईल. या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनीटांपेक्षा कमी कालावधी लागतो.

अ‍ॅप वापरता न येणाऱ्यांना दरवाजे बंद का? - शेख

महाराष्ट्र सरकारचं नवं फर्मान की हुकूमशाही "DigiPravesh" या मोबाईल अ‍ॅपशिवाय मंत्रालयात आता पाऊलही टाकता येणार नाही. अधिकारी असो, कर्मचारी असो किंवा सामान्य भेट देणारा व्यक्ती असो आधी ऑनलाईन नोंदणी करा, मगच प्रवेश. वाह रे सरकार, अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मेहबुब शेख यांनी केली आहे. तसेच, आता ग्रामीण भागातील सर्व लोकांना स्मार्टफोन नाही? नेट नाही? अ‍ॅप वापरता येत नाही? मग त्या लोकांसाठी मंत्रालयाचे दरवाजे कायमचे बंद का ? लोकशाहीत जनता आणि सरकार यांच्यातील दरवाजे उघडे असायला हवेत, पण हे सरकार जनतेसमोर डिजिटल कुलूप लावतंय. तंत्रज्ञान सोयीसाठी असतं, अडथळा बनवण्यासाठी नाही. तंत्रज्ञान वापरा पण जनतेवर अन्याय होईल अस तंत्रज्ञान, नियम लावून काय उपयोग ?, असा सवालही मेहबुब शेख यांनी उपस्थित केलाय. 

हेही वाचा

मोठी बातमी : अदिती तटकरे रायगडमध्ये, अजितदादा बीडमध्ये ध्वजारोहण करणार, नाशिकचाही निर्णय फायनल!

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: चोरीचा डाव साधत असतानाच पोलिसांची एन्ट्री, गाडी दिसताच चोरटे धावत सुटले, नाशिकमध्ये मध्यरात्री सिनेस्टाईल थरार, PHOTO
चोरीचा डाव साधत असतानाच पोलिसांची एन्ट्री, गाडी दिसताच चोरटे धावत सुटले, नाशिकमध्ये मध्यरात्री सिनेस्टाईल थरार, PHOTO
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार कंटेनरवर आदळून चुराडा, दोघांनी जागेवरच जीव सोडला, अपघाताचे फोटो समोर
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार कंटेनरवर आदळून चुराडा, दोघांनी जागेवरच जीव सोडला, अपघाताचे फोटो समोर
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: चोरीचा डाव साधत असतानाच पोलिसांची एन्ट्री, गाडी दिसताच चोरटे धावत सुटले, नाशिकमध्ये मध्यरात्री सिनेस्टाईल थरार, PHOTO
चोरीचा डाव साधत असतानाच पोलिसांची एन्ट्री, गाडी दिसताच चोरटे धावत सुटले, नाशिकमध्ये मध्यरात्री सिनेस्टाईल थरार, PHOTO
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार कंटेनरवर आदळून चुराडा, दोघांनी जागेवरच जीव सोडला, अपघाताचे फोटो समोर
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार कंटेनरवर आदळून चुराडा, दोघांनी जागेवरच जीव सोडला, अपघाताचे फोटो समोर
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीला पुन्हा झळाळी! चांदीच्या दराने गाठला नवा उच्चक; तर सोन्याच्या किमतीत पुन्हा 3 हजारांची वाढ, आजचे दार काय?
सोन्या-चांदीला पुन्हा झळाळी! चांदीच्या दराने गाठला नवा उच्चक; तर सोन्याच्या किमतीत पुन्हा 3 हजारांची वाढ, आजचे दार काय?
Raj Thackeray: वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला... मनसेप्रमुख राज ठाकरे संतापले, स्पष्टच सुनावलं
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Maharashtra Live Updates: महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी पुण्यात भाजपमधील इच्छुकांची गर्दी
Match Fixing Indian Cricket : क्रिकेटविश्व हादरलं! मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात भारताचे 4 खेळाडू, मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?
क्रिकेटविश्व हादरलं! मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात भारताचे 4 खेळाडू, मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?
Embed widget