एक्स्प्लोर

नौकरी गेल्याच्या नैराश्यातून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, सायबर पोलिसांनी वाचवले प्राण

नौकरी गेल्याच्या नैराश्यातून तरूण आत्महत्या करत होता. विशेष म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाने स्वत: ट्विटरवरून याबाबत माहिती दिली होती. 

मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने एका युवकाचे प्राण वाचवले आहेत. नौकरी गेल्याच्या नैराश्यातून हा तरूण आत्महत्या करत होता. विशेष म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाने स्वत: ट्विटरवरून याबाबत माहिती दिली होती. 
  
सायबर शाखेच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी एबीपी न्यूजसोबत बोलताना सांगितले की, "कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे 30 वर्षीय युवकाची नौकरी गेली होती. शिवाय त्याच्यावर 37 हजार रूपये कर्ज होते. त्यामुळे नैराश्यातून या तरूणाने आत्महत्या करण्याचा विचार केला होता. त्यासाठी त्याने सुसाइड नोट लिहिली आणि ती नोट ट्विट केली. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया सेलने हे ट्विट पाहिले आणि सायबर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. सायबर पोलिसांनी तत्काळ ट्विटरच्या माध्यमातून त्या युवकाचा पत्ता शोधून काढला आणि त्याचा फोन नंबरही मिळवला."

"पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तो तरूण विरारमधील चंदनसार परिसरातील राहणारा होता. त्याचा मोबाईल नंबरही पोलिसांना मिळाला. त्यामुळे आमच्या एका टीमने त्याला फोनवरून समजावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुसऱ्या टीमने विरार पोलिसांना संपर्क करून त्याचा पत्ता दिला. सायबर पोलिसांची टीम त्याला समजावत असतानाच विरार पोलीस त्याच्या घरी पोहोचले आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. या सर्व घटनेनंतर सायबर पोलिसांनी त्याचे समुपदेषन केले, अशी माहिती रश्मी करंदीकर यांनी दिली.    

रश्मी करंदीकर म्हणाल्या, आत्महत्या करण्यापासून वाचविल्यानंतर या तरूणासोबत चर्चा केल्यानंतर त्याने सांगितले की, मी अंधेरीतील एका कंपनीत काम करत होतो. घर भाडे आणि इतर खर्चासाठी त्याने कंपनीच्या खात्यातून 37 हजार रूपये काढले होते. त्यानंतर कंपनीने आॅक्टोंबर महिन्याच्या पगारासह त्याचे इतर इंसेंटिव थांबवले. त्याबदल्यात कंपनीला चेक दिला आहे आणि आता कंपनी हा चेक डिपॉझिट करणार आहेत. असे झाले तर चेक बाऊंस होईल आणि कंपनीवाले माझ्याविरोधात गुन्हा दाखल करतील. त्यानंतर मला तूरूंगात जावे लागेल. मला नौकरी मिळाली तर मी त्यांचे सर्व पैसे परत करेन. परंतु, कंपनीने मला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. त्यामुळे मला नौकरी मिळत नाही. त्यामुळे आत्महत्येशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. "   

रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, या वर्षात आम्ही जवळपास 29 लोकांना आत्महत्या करण्यापासून रोखले आणि त्यांचे प्राण वाचवले आहेत. हे सर्व जण विविध कारणांमुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होते.

महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
बसला ओव्हरटेक करताना रिक्षाचा भीषण अपघात, मुंबईतील दहिसरमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू
बसला ओव्हरटेक करताना रिक्षाचा भीषण अपघात, मुंबईतील दहिसरमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू
Mumbai Goa Highway : 31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातायेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 
गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातायेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget