एक्स्प्लोर

Mumbai Coronavirus Update : कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, टास्क फोर्सचा दावा, मुंबईकरांसाठी सर्वात मोठा दिलासा

Mumbai Coronavirus Update : राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अजीत देसाई यांनी एबीपी माझाशी खास बातचित केली आहे. यावेळी त्यांनी मुंबईतील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत भाष्य केलं.

Mumbai Coronavirus Update : मुंबईत गेल्या 3 आठवड्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत होता. अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं मुंबईत धडक दिल्याचं बोललं जात होतं. गेल्या 2 आठवड्यांपासून कमी होणारी रुग्णसंख्या लक्षात घेतली तर असं म्हटलं जाऊ शकतं की, मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आता घटताना दिसत असून परिस्थिती आटोक्यात येत आहे. यासंदर्भात राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अजीत देसाई यांनी एबीपी माझाशी बातचित केली आहे. 

मुंबईतील कोरोना परिस्थितीबाबत बोलताना डॉ. अजीत देसाई म्हणाले की, "4 दिवसांपूर्वीपर्यंत मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या 20 हजारांच्या पार होती. परंतु, काल (मंगळवारी) 11 हजार दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामागे काही कारण आहेत. सरकारनं लागू केलेल्या निर्बंधांचा परिणाम दिसून येत आहे. तसेच नागरिक सतर्क झाले असून काळजी घेत आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "दुसरं कारण म्हणजे, कोविड टेस्टिंग 10 टक्क्यांनी कमी झाली आहे. कारण आता लोक घरच्या घरी टेस्ट करुन स्वतः क्वॉरंटाईन होत आहेत."

दिलासादायक बाब म्हणजे, 85 टक्के मुंबईकरांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. दक्षिण आफ्रिकेत आलेली कोरोनाची तिसरी लाट खूपच मोठी होती. परंतु, त्याच वेगानं ती ओसरलीही. मुंबईतही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या वांद्रे येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 800 रुग्णांपैकी केवळ 3 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तसेच एकूण बाधितांपैकी केवळ 20 टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे दावा केला जात आहे की, मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय. असं असलं तरी सर्वांनी कोरोना नियमांचं पालन करणं आणि काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. 

मुंबईतील रुग्ण वाढ मंदावली

मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 14 हजार 980 इतकी आहे. हा आकडा देखील महत्त्वाचा आहे कारण जे नवीन रुग्ण समोर आले आहेत, त्यापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या रुग्णांच्या 7283 खाटा भरल्या आहेत. तर 36,573 रुग्णालयातील खाटा रिक्त आहेत. मंगळवारी 851 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तर, शहराचा कोरोना रिकव्हरी रेट सध्या 87 टक्के आहे.

कोरोनाविरुद्धच्या युद्धात मुंबई महानगरपालिकेचा खर्च जवळपास तीन हजार कोटींवर पोहोचला आहे. पालिकेने पुन्हा एकदा आकस्मिकता निधीतून 300 कोटी रुपये काढण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. यापूर्वी आकस्मिकता निधीतून 400 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ऑक्टोबर 2021 पर्यंत मुंबई पालिकेने यासाठी 2 हजार 300 कोटी रुपये खर्च केले होते. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, या खर्चामध्ये नागरिकांच्या चाचण्या, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था, नवीन जम्बो कोविड सेंटर, क्वारंटाईन सेंटर, वॉर्ड वॉर रूम, डॉक्टर, परिचारिका आणि बाहेरून येणाऱ्या औषधांचा खर्च समाविष्ट आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'
India CWG 2026 : कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारत सुसाट! गुलवीरने रचला इतिहास, हरजिंदरनेही उंचावला तिरंगा, सहाव्या दिवशी अखेर पदकांची संख्या झाली डझनभर
Mira Road Crime News : मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
मीरा-भाईंदरमध्ये नामांकित शाळेसमोरील स्पामध्ये तरुणींची संशयास्पद ये-जा, पोलिसांनी धाड टाकताच देहव्यापाराचा पर्दाफाश
WI vs PAK 1st Test : बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
बाबर आजम फक्त पाहतच राहिला... डोळ्यांसमोर पाकिस्तानचा पुन्हा एकदा झाला गेम! वेस्ट इंडिजने मैदान मारलं
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
India Coaching Staff News : एक-दोन नाही... तब्बल 10 कॅच सुटले! अखेर टीम इंडियाने घेतला मोठा निर्णय, फील्डिंग कोच बाहेर, आता नवा गुरु कोण?
एक-दोन नाही... तब्बल 10 कॅच सुटले! अखेर टीम इंडियाने घेतला मोठा निर्णय, फील्डिंग कोच बाहेर, आता नवा गुरु कोण?
Embed widget