एक्स्प्लोर

मराठा आरक्षण ही निव्वळ राजकीय खेळी, विरोधकांचा हायकोर्टात दावा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यचं आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाता कामा नये, त्यामुळे नव्यानं देण्यात आलेलं हे आरक्षण बेकायदेशीरच असल्याचा आरोप करत हे आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई : मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे केवळ राजकीय हेतून प्रेरीत असल्याचा आरोप या आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांच्यावतीनं करण्यात आला आहे. मराठा हे जर कुणबी असतील तर कुणबी जातीचा याआधीच ओबीसी वर्गात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना वेगळं 16 टक्के आरक्षण देण्याऐवजी ओबीसीत सामावून घ्यावं असा युक्तिवाद करत मराठा आरक्षणाचा फार्स हा केवळ आगामी निवडणुका ध्यानात ठेऊन केलेला आहे, असा आरोप हायकोर्टात करण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मुळात राज्य सरकारला अशाप्रकारे ठराव मंजूर करून घेण्याचा संविधानिक अधिकारच नाही असाही आरोप करण्यात आला आहे. युक्तिवाद  गुरूवारीही सुरू राहील राज्य सरकारनं जारी केलेल्या 16 टक्के मराठा आरक्षणाविरोधातील याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी सुरू आहे. बुधवारच्या सुनावणीत या आरक्षणाला विरोध करणाऱ्या जयश्री पाटील यांच्यावतीनं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपला युक्तिवाद संपवला. त्यानंतर संजीत शुक्ला यांच्यातर्फे अॅड. अरविंद दातार यांनी आपला युक्तिवाद सुरू केला असून तो गुरूवारीही सुरू राहील. विरोध करणाऱ्यांपैकी अन्य दोन याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद संपले की राज्य सरकराच्यावतीनं माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी आपला युक्तिवाद सुरू करतील. गायकवाड समितीच्या वैधतेवरच आक्षेप दरम्यान बुधवारच्या सुनावणीत अॅड. सदावर्ते यांनी गायकवाड समितीच्या वैधतेवरच आक्षेप घेतला. आयोगाचा अहवाल अयोग्य पद्धतीनं गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुष्काळामुळे आत्महत्या करणार्यांमध्ये मरठा समाजातील लोकांनी संख्या सर्वाधिक असल्याचा राज्य सरकारचा दावा खोटा असून इतर मागास वर्गातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी जास्त असल्याचा दावाही करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यचं आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाता कामा नये, त्यामुळे नव्यानं देण्यात आलेलं हे आरक्षण बेकायदेशीरच असल्याचा आरोप करत हे आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
SIP : शेअर बाजारात धक्के इकडे SIP खाती खटाखट बंद, जानेवारीत एसआयपी खात्यात विक्रमी घट, आकडेवारी समोर
शेअर बाजारातील घसरणीमुळं धक्के सुरुच, SIP खाती खटाखट बंद, जानेवारी महिन्यातील आकडे समोर
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देशAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पाBharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
SIP : शेअर बाजारात धक्के इकडे SIP खाती खटाखट बंद, जानेवारीत एसआयपी खात्यात विक्रमी घट, आकडेवारी समोर
शेअर बाजारातील घसरणीमुळं धक्के सुरुच, SIP खाती खटाखट बंद, जानेवारी महिन्यातील आकडे समोर
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
Non Veg Plant: सिंधुदुर्गात सापडली दुर्मिळ 'मांसाहारी' वनस्पती, PHOTO पाहून व्हाल अवाक
सिंधुदुर्गात सापडलं दुर्मिळ 'मांसाहारी' झाड
Supreme Court Slams Ranveer Allahbadia: तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
तुझ्या डोक्यात घाणच भरलीय, कोर्टाने रणवीर इलाहाबादियाला झाप झाप झापलं, अटकेच्या कारवाईवर न्यायमूर्ती म्हणाले....
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.