एक्स्प्लोर

Majha Maharashtra Majha Vision : लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सक्ती करावी लागेल, तोपर्यंत देशातील प्रश्न सुटणार नाहीत : राज ठाकरे

शिक्षणाचा प्रश्न दरवर्षा कोर्टात का जातो. विद्यार्थ्यांचे हाल होतात. याला आपण प्रगती म्हणणार का? आपल्याकडे उपलब्ध नोकरी प्रमाणे मुलांना शिक्षण मिळणार आहे का? असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

Majha Maharashtra Majha Vision : जो पर्यंत आपण देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर गांभीर्याने विचार करत नाहीत तोवर देशातील प्रश्न सुटणार नाहीत. लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल, नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल. याबाबत ठोस निर्णय घ्यावे लागतील. वाढणारी लोकसंख्या आणि विकासकामे यांचा ताळमेळ जमत नाहीये, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. राज ठाकरे एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते. 

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाची प्रगती झाली यात शंका नाही. मात्र रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही. देश म्हणून  आपण वैचारिक प्रगती केली का? देश म्हणून आपण विचार करतोय का? आपण अजूनही भागा भागात विचार करतोय. देशात प्रगतीच्या व्याख्या काय आहेत? आजही आपल्या निवडणुकीतले विषय बदलेले नाहीत. वीज, पाणी, रस्ते, शिक्षण याच विषयावर निवडणुका लढवल्या जात असतील तर आपण कशात प्रगती केली? याचा विचार झाला पाहिजे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. 

शिक्षणाचा प्रश्न दरवर्षा कोर्टात का जातो. याआधी असे प्रश्न उपस्थित होत नव्हते. दरवेळी विद्यार्थ्यांचे हाल होतात. याला आपण प्रगती म्हणणार का? आपल्याकडे उपलब्ध नोकरी प्रमाणे मुलांना शिक्षण मिळणार आहे का? असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

राजकारण्यांच्या स्वार्थामुळे शहरांची बकाल अवस्था 

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील अनधिकृत घरांना अधिकृत केलं जातं. राजकीय फायद्यासाठी शहरांची बकाल अवस्था होत आहे. जो खरा करदाता आहे त्याला ज्या गोष्टी मिळायला हव्या त्या मिळत नाही. बाहेरुन लोक येत असल्याने शहरं अनधिकृतपणे विस्तारत आहेत. छोट्या गावांची शहरं होत आहे. मात्र त्यांना शहरं म्हणू शकत नाही अशी त्यांची अवस्था आहे. मतांच्या राजकारणासाठी कायद्यांची अमंलबजावणी केली जात नाही. विकासाबाबत बोलताना याचा विचार होणे गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.   

इंदिरा गांधींच्या काळापासून अंतर्गत राजकारणात लक्ष वाढलं

पंडित नेहरुंच्या काळात देशाच विकास झपाट्याने झाला. कारण त्या काळात त्यांना कुणी विरोधक नव्हते. इंदिरा गांधींच्या काळापासून विरोधक निर्माण झाले, त्यामुळे अंतर्गत राजकारणात लक्ष जास्त दिलं गेलं. त्यामुळे देशाच्या विकासाकडून लक्ष हटलं आणि आपल्या आपल्या भागाचा विचार केला गेला. अनेकांनी राज्याचा, देशाचा विचार केला. मात्र त्यांना म्हणावी तेवढी संधी मिळाली नाही. देशासाठीच्या विकासाच्या गोष्टींसाठी एक तज्ज्ञ मंडळी असणे आवश्यक आहे. हे ज्या दिवशी या देशामध्ये होईल, त्यावेळी देशाचा खरा विकास होईल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Unveiling Ceremony : एकनाथ Shinde म्हणाले 'ठाण्यातील Vitthal मूर्ती भक्तांसाठी प्रेरणा'
Pigeon Feeding Row: मुंबईत कबूतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध, फक्त ४ ठिकाणी सकाळी ७ ते ९ परवानगी
Sanjay Raut Health: 'प्रकृतीत गंभीर बिघाड', खासदार Sanjay Raut दोन महिने राजकारणापासून दूर
Maha Local Body Polls: 'पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता'- Ajit Pawar
EVM Protest: 'परवानगीशिवाय मोर्चा काढल्यास कारवाई', चंद्रशेखर बावनकुळेंचा MVA-MNS ला थेट इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget