एक्स्प्लोर

Majha Maharashtra Majha Vision : लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सक्ती करावी लागेल, तोपर्यंत देशातील प्रश्न सुटणार नाहीत : राज ठाकरे

शिक्षणाचा प्रश्न दरवर्षा कोर्टात का जातो. विद्यार्थ्यांचे हाल होतात. याला आपण प्रगती म्हणणार का? आपल्याकडे उपलब्ध नोकरी प्रमाणे मुलांना शिक्षण मिळणार आहे का? असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

Majha Maharashtra Majha Vision : जो पर्यंत आपण देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर गांभीर्याने विचार करत नाहीत तोवर देशातील प्रश्न सुटणार नाहीत. लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल, नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल. याबाबत ठोस निर्णय घ्यावे लागतील. वाढणारी लोकसंख्या आणि विकासकामे यांचा ताळमेळ जमत नाहीये, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. राज ठाकरे एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते. 

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाची प्रगती झाली यात शंका नाही. मात्र रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही. देश म्हणून  आपण वैचारिक प्रगती केली का? देश म्हणून आपण विचार करतोय का? आपण अजूनही भागा भागात विचार करतोय. देशात प्रगतीच्या व्याख्या काय आहेत? आजही आपल्या निवडणुकीतले विषय बदलेले नाहीत. वीज, पाणी, रस्ते, शिक्षण याच विषयावर निवडणुका लढवल्या जात असतील तर आपण कशात प्रगती केली? याचा विचार झाला पाहिजे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. 

शिक्षणाचा प्रश्न दरवर्षा कोर्टात का जातो. याआधी असे प्रश्न उपस्थित होत नव्हते. दरवेळी विद्यार्थ्यांचे हाल होतात. याला आपण प्रगती म्हणणार का? आपल्याकडे उपलब्ध नोकरी प्रमाणे मुलांना शिक्षण मिळणार आहे का? असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

राजकारण्यांच्या स्वार्थामुळे शहरांची बकाल अवस्था 

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील अनधिकृत घरांना अधिकृत केलं जातं. राजकीय फायद्यासाठी शहरांची बकाल अवस्था होत आहे. जो खरा करदाता आहे त्याला ज्या गोष्टी मिळायला हव्या त्या मिळत नाही. बाहेरुन लोक येत असल्याने शहरं अनधिकृतपणे विस्तारत आहेत. छोट्या गावांची शहरं होत आहे. मात्र त्यांना शहरं म्हणू शकत नाही अशी त्यांची अवस्था आहे. मतांच्या राजकारणासाठी कायद्यांची अमंलबजावणी केली जात नाही. विकासाबाबत बोलताना याचा विचार होणे गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.   

इंदिरा गांधींच्या काळापासून अंतर्गत राजकारणात लक्ष वाढलं

पंडित नेहरुंच्या काळात देशाच विकास झपाट्याने झाला. कारण त्या काळात त्यांना कुणी विरोधक नव्हते. इंदिरा गांधींच्या काळापासून विरोधक निर्माण झाले, त्यामुळे अंतर्गत राजकारणात लक्ष जास्त दिलं गेलं. त्यामुळे देशाच्या विकासाकडून लक्ष हटलं आणि आपल्या आपल्या भागाचा विचार केला गेला. अनेकांनी राज्याचा, देशाचा विचार केला. मात्र त्यांना म्हणावी तेवढी संधी मिळाली नाही. देशासाठीच्या विकासाच्या गोष्टींसाठी एक तज्ज्ञ मंडळी असणे आवश्यक आहे. हे ज्या दिवशी या देशामध्ये होईल, त्यावेळी देशाचा खरा विकास होईल. 

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम

व्हिडीओ

NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget