एक्स्प्लोर

Majha Maharashtra Majha Vision : लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सक्ती करावी लागेल, तोपर्यंत देशातील प्रश्न सुटणार नाहीत : राज ठाकरे

शिक्षणाचा प्रश्न दरवर्षा कोर्टात का जातो. विद्यार्थ्यांचे हाल होतात. याला आपण प्रगती म्हणणार का? आपल्याकडे उपलब्ध नोकरी प्रमाणे मुलांना शिक्षण मिळणार आहे का? असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

Majha Maharashtra Majha Vision : जो पर्यंत आपण देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर गांभीर्याने विचार करत नाहीत तोवर देशातील प्रश्न सुटणार नाहीत. लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल, नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल. याबाबत ठोस निर्णय घ्यावे लागतील. वाढणारी लोकसंख्या आणि विकासकामे यांचा ताळमेळ जमत नाहीये, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. राज ठाकरे एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते. 

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाची प्रगती झाली यात शंका नाही. मात्र रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे, हातात मोबाईल येणे याला मी प्रगती म्हणणार नाही. देश म्हणून  आपण वैचारिक प्रगती केली का? देश म्हणून आपण विचार करतोय का? आपण अजूनही भागा भागात विचार करतोय. देशात प्रगतीच्या व्याख्या काय आहेत? आजही आपल्या निवडणुकीतले विषय बदलेले नाहीत. वीज, पाणी, रस्ते, शिक्षण याच विषयावर निवडणुका लढवल्या जात असतील तर आपण कशात प्रगती केली? याचा विचार झाला पाहिजे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं. 

शिक्षणाचा प्रश्न दरवर्षा कोर्टात का जातो. याआधी असे प्रश्न उपस्थित होत नव्हते. दरवेळी विद्यार्थ्यांचे हाल होतात. याला आपण प्रगती म्हणणार का? आपल्याकडे उपलब्ध नोकरी प्रमाणे मुलांना शिक्षण मिळणार आहे का? असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

राजकारण्यांच्या स्वार्थामुळे शहरांची बकाल अवस्था 

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील अनधिकृत घरांना अधिकृत केलं जातं. राजकीय फायद्यासाठी शहरांची बकाल अवस्था होत आहे. जो खरा करदाता आहे त्याला ज्या गोष्टी मिळायला हव्या त्या मिळत नाही. बाहेरुन लोक येत असल्याने शहरं अनधिकृतपणे विस्तारत आहेत. छोट्या गावांची शहरं होत आहे. मात्र त्यांना शहरं म्हणू शकत नाही अशी त्यांची अवस्था आहे. मतांच्या राजकारणासाठी कायद्यांची अमंलबजावणी केली जात नाही. विकासाबाबत बोलताना याचा विचार होणे गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.   

इंदिरा गांधींच्या काळापासून अंतर्गत राजकारणात लक्ष वाढलं

पंडित नेहरुंच्या काळात देशाच विकास झपाट्याने झाला. कारण त्या काळात त्यांना कुणी विरोधक नव्हते. इंदिरा गांधींच्या काळापासून विरोधक निर्माण झाले, त्यामुळे अंतर्गत राजकारणात लक्ष जास्त दिलं गेलं. त्यामुळे देशाच्या विकासाकडून लक्ष हटलं आणि आपल्या आपल्या भागाचा विचार केला गेला. अनेकांनी राज्याचा, देशाचा विचार केला. मात्र त्यांना म्हणावी तेवढी संधी मिळाली नाही. देशासाठीच्या विकासाच्या गोष्टींसाठी एक तज्ज्ञ मंडळी असणे आवश्यक आहे. हे ज्या दिवशी या देशामध्ये होईल, त्यावेळी देशाचा खरा विकास होईल. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 
रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2026 | शनिवार
अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे मंत्री कोण? सर्वांची चौकशी करुन कारवाई करा, काँग्रेसची मागणी 
अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे मंत्री कोण? सर्वांची चौकशी करुन कारवाई करा, काँग्रेसची मागणी 

व्हिडीओ

Special Report US Benifiting from War : युद्ध लांबल्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढतोय पण..
Special Report Iran Israel युद्धाबाबत ब्रिटननं भूमिका बदलल्यानं इराणचा संताप, प्रथमच खुलं आव्हान
Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara : भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”, शिवेंद्रराजे भोसलेंचा शंभूराज देसाईंना सवाल
भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”: शिवेंद्रराजे भोसले
Maharashtra Live blog: पुण्यातील दरी पुलावर अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या
Maharashtra Live blog: पुण्यातील दरी पुलावर अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
Jaykumar Gore : पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जाते, जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंवर आरोप
पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, पोलीस अधीक्षकांसोबत घरगड्याशी बोलल्यासारखं बोलतात : जयकुमार गोरे
Iran War Live Update: तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांचं प्रदेशाध्यक्ष पद राहणार की जाणार? देवगिरीवर उच्चस्तरीय बैठक, सुनेत्राताई पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात खलबतं
चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत देवगिरीवर उच्चस्तरीय बैठक, सुनेत्राताई पवार, तटकरे आणि पटेल यांच्यात खलबतं
Embed widget