एक्स्प्लोर

दिल्लीतून 2024 नंतर मोठा फंड आणता येईल, आदित्य ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

मुंबई आपली आई असून कल्याण डोंबिवली आपली मावशी असल्याने या भागाच्या विकासासाठी दुर्लक्ष करून चालणारच नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई : विकासासाठी फंड मिळावा यासाठी आतुरतेने वाट पहावी लागत होती मात्र आपल्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर फंड आणला जात आहे. दिल्लीतून फंड आला पाहिजे असे सांगतानाच गोव्यात प्रचार करत होतो इतर राज्यात पण शिवसेना निवडणूक लढत आहे. त्यामुळे 2024 नंतर दिल्लीतून पण शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणे शक्य होईल असे सूचक वक्तव्य करत शिवसेनेचे 2024  चे लक्ष दिल्ली असल्याचे सूचक इशारा मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मुंबई आपली आई असून कल्याण डोंबिवली आपली मावशी असल्याने या भागाच्या विकासासाठी दुर्लक्ष करून चालणारच नाही असे सांगितलं. डोंबिवलीमध्ये विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वि दा सावरकर सभागृहाचे तसेच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नदी किनारा विकसित करणे, डायलिसीस सेंटरचे उद्घाटन करणे आणि औद्योगिक क्षेत्रातील 55 कोटीच्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री ठाकरे यांनी राज्यातील 51 टक्के महराष्ट्राचे शहरीकरण झाले असून या वाढत्या शहरीकरणाबरोबर वाढणाऱ्या लोकसंख्येला मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात आजवरच्या इतिहासात कधीही नव्हता इतका निधी आणला नाही. डोंबिवली कल्याण शहराकडे आपले विशेष लक्ष असल्याचे सांगण्यासाठी त्यांनी मुंबई ही आपली आई असून कल्याण डोंबिवली आपली मावशी असल्याने या भागाच्या विकासासाठी दुर्लक्ष करून चालणारच नाही असे सांगितलं 

एमएमआर रिजनचे विकास करणे हे आमचे ध्येय : आदित्य ठाकरे

कल्याण डोंबिवलीमधील विविध विकास कामांचा आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं . याबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोव्हिड सारख्या कठीण काळात देखील या ठिकाणी रस्त्याचे काम असेल पुलाचे काम असतील ते  सुरू होते,एकंदरीतच पूर्ण एम एम आर रिजनचे विकास करणे हे आमचे ध्येय आणि धोरण असल्याचे सांगितले.

राऊत यांनी मॅच सुरू केली आता पुढची बॅटिंग बघू

संजय राऊत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषेदेत किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत वसई येथील कंपन्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले .याबाबत आदित्य ठाकरे यांनी राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे आता पुढची बॅटिंग बघू अशी प्रतिक्रिया दिली आहे

ड्रीम प्रोजेक्ट्सला विरोध नाही - आदित्य ठाकरे

नागपूर-अजनी वन प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे .हा प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पर्यावरणवाद्यांना आदित्य ठाकरे यांनी पाठींबा दर्शवला आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी या प्रोजेक्टला वैयक्तिक विरोध नाही. वन वाचवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल त्याचा विचार करतोय असे सांगितलं.

रोजगाराचे नुकसान होऊ नये याची दक्षता - आदित्य ठाकरे 

डोंबिवली एम आय डी सी मधील 156 कंपन्या स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उद्योजकांनी याबाबत विरोध केला  आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी कुठेही रोजगाराचे नुकसान होऊ नये याची दक्षता आम्ही घेत आहोत. प्रदूषण होत आहे त्यामुळे जिथे रेड इंडस्ट्रीसाठी जागा आहे तिथे स्थलांतर करण्यात येत आहे. तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून आणि रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget