एक्स्प्लोर

परमबीर सिंहांच्या पत्रानंतरही मुख्यमंत्री कारवाई करत नसतील तर हे गंभीर आहे : देवेंद्र फडणवीस

परमबीर सिंह यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही मुख्यमंत्री कारवाई करत नसतील तर हे गंभीर आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवी यांनी दिली आहे.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या पत्रानंतर आता विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
परमबीर सिंह यांचे पत्र धक्कादायक आणि खळबळजनक आहे. एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने असे पत्र गृहमंत्र्यांबद्दल लिहिण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे फडणवीस म्हणाले. या पत्रासोबत एक चॅटही जोडली असून गृहविभागात नियुक्ती किंवा बदलीबद्दल जे काही घडत होते, त्याचा हा कळस असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली. 

..तर हे गंभीर आहे : फडणवीस
मुंबई पोलीस दलाचं खच्चीकरण करणारी, मानहानी करणारी ही घटना आहे. गृहमंत्री पदावर राहिल्यानंतर याची चौकशी कशी होईल? कोणी छोट्या मोठ्या व्यक्तीने लावलेला आरोप नाही. एका डीजी रँकच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे. पुरावा म्हणून चॅटही सोबत जोडलेलं आहे, तो पुरावाच आहे. परमबीर सिंह यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही जर मुख्यमंत्री कारवाई करत नसतील तर हे गंभीर आहे. आपलं सरकार वाचवण्यासाठी त्यानी दुर्लक्ष केलं असल्याची गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

परमबीर सिंह यांचे आरोप काय आहेत?
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे की, "सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही महिन्यात फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावलं होतं. फेब्रुवारी दरम्यान या भेटी झाल्या. अशा भेटीदरम्यान अनेकदा एक-दोन स्टाफ मेंबर आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास 1 हजार 750 बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील काही बाबींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच महिन्याकाठी 40-50 कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर बाबीतून मिळवता येतील, असं म्हणता येईल."

अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले

दरम्यान परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत. अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, "मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे."

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! ..तर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक, शासकीय योजनांचा लाभही नाही; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! ..तर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक, शासकीय योजनांचा लाभही नाही; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Mumbai Crime : मुंबई हादरली! बोलत नाही म्हणून 16 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार, आरोपी युवक अटकेत, मुलुंडमधील प्रकार
मुंबई हादरली! बोलत नाही म्हणून 16 वर्षीय मुलीवर कोयत्याने वार, आरोपी युवक अटकेत, मुलुंडमधील प्रकार
तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो? सुषमा अंधारेंचा शितल म्हात्रेंना सवाल, खरात प्रकरणावरुन महिला नेत्यांची छन्नाछन्नी
तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो? सुषमा अंधारेंचा शितल म्हात्रेंना सवाल, खरात प्रकरणावरुन महिला नेत्यांची छन्नाछन्नी
मोठी बातमी! घरातला जुना स्टोव्ह बाहेर काढा, केंद्र सरकारची रॉकेल वाटपास मंजुरी; प्रत्येक कुटुंबाला किती लिटर केरोसीन?
मोठी बातमी! घरातला जुना स्टोव्ह बाहेर काढा, केंद्र सरकारची रॉकेल वाटपास मंजुरी; प्रत्येक कुटुंबाला किती लिटर केरोसीन?

व्हिडीओ

Sushma Andhare on Sheetal Mhatre : खरातला पाणी देण्यासाठी रुपाली चाकणकरांची शिफारस, मग बंदूक कुणी दिली?
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Sheetal Mhatre on Matoshree : मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाने अशोक खरातला पाणी जोडणी
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Update : 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
BCCI Schedule Update : रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी
रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी
इराणनं होर्मुझवरून घाम फोडला असतानाच आता अरबी समुद्राच्या तोंडावर असणाऱ्या स्ट्रेटवर हल्ल्याचा इशारा! तेथून अमेरिकन एअरबेस फक्त 30 किमी अंतरावर!
इराणनं होर्मुझवरून घाम फोडला असतानाच आता अरबी समुद्राच्या तोंडावर असणाऱ्या स्ट्रेटवर हल्ल्याचा इशारा! तेथून अमेरिकन एअरबेस फक्त 30 किमी अंतरावर!
Sushma andhare on Shital Mhatre: आम्ही कधी लता वहिनी किंवा श्रीकांत शिंदेंच्या बायकोवर बोललो नाही, सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंना सूचक इशारा
आम्ही कधी लता वहिनी किंवा श्रीकांत शिंदेंच्या बायकोवर बोललो नाही, सुषमा अंधारेंचा शीतल म्हात्रेंना सूचक इशारा
मोठी बातमी! ..तर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक, शासकीय योजनांचा लाभही नाही; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! ..तर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी 5 वर्षांसाठी ब्लॉक, शासकीय योजनांचा लाभही नाही; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Alireza Tangsiri : होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणारा इराणचा नौदल प्रमुख ठार, इस्त्रायलचा मोठा दावा
होर्मुझ सामुद्रधुनी बंद करणारा इराणचा नौदल प्रमुख ठार, इस्त्रायलचा मोठा दावा
Petrol Shortage : दुचाकीसाठी संभाजीनगर, परभणीत 200, तर नांदेडमध्ये फक्त 300 रुपयांचं पेट्रोल मिळणार; शासनाचे पंप चालकांना आदेश, तुमच्या शहरात काय स्थिती?, A टू Z माहिती
दुचाकीसाठी संभाजीनगर, परभणीत 200, तर नांदेडमध्ये फक्त 300 रुपयांचं पेट्रोल मिळणार; शासनाचे पंप चालकांना आदेश, तुमच्या शहरात काय स्थिती?, A टू Z माहिती
Lockdown Fact Check: भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण; जाणून घ्या सत्य
भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण; जाणून घ्या सत्य
Embed widget