एक्स्प्लोर

ना Remdesivir वापरलं, ना सल्ला दिला; रेमडेसिवीरशिवाय कोरोनाबाधितांना बरे करणारे डॉ. हिंमतराव बावस्कर!

रेमडेसिवीर इंजेक्शनशिवाय 800 हून अधिक रुग्णांना बरं करण्याची किमया महाडमधील डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी करुन दाखवली आहे. रेमडेसिवीरशिवाय रुग्णांना बरं कसं केलं याविषयी एबीपी माझाने डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्याशी संवाद साधला.

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहेत. कोरोनावर अद्याप ठोस उपाय आला नसला तरी बाधितांवरील उपचारांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर सध्या केला जात आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळालं नाही तर रुग्ण बरा होईल की नाही अशी धाकूधक नातेवाईकांच्या मनात असते. परंतु रेमडेसिवीर इंजेक्शनशिवाय 800 हून अधिक रुग्णांना बरं करण्याची किमया महाडमधील डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी करुन दाखवली आहे. रेमडेसिवीर ही संजिवनी नाही, माझे मित्र डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी रेमडेसिवीरविना 800 पेक्षा जास्त रुग्ण बरे केले, असं महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनीही नमूद केलं होतं. रेमडेसिवीरशिवाय रुग्णांना बरं कसं केलं याविषयी एबीपी माझाने डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्याशी संवाद साधला.

रेमडेसिवीरशिवाय रुग्ण बरा होत नाही, या मानसिकतेसंदर्भात डॉ. बावस्कर म्हणाले की, "कोविडवर सुरुवातीला कोणताही उपाय नसल्याने काही जरी वापरलं तर ते महत्त्वाचं आहे अशी भावना निर्माण झाली. रेमडेसिवीरचा भारतीय वैज्ञानिकांनीच शोध लावलं. मीडियाने रेमडेसिवीरला उचलून धरलं, मग डॉक्टरांनीही तेच केलं. ग्रामीण भागात रेमडेसिवीर उपलब्ध नव्हतं. पण त्यामुळे रुग्णांना मरु द्यायचं का तर नाही. त्यासाठी पर्याय शोधला. त्यानंतर समजलं की रेमडेसिवीरची गरजच लागत नाही. रेमडेसिवीर देण्यासाठी क्रायटेरिया असतो. ज्याप्रमाणे मीडियात सांगितलं जातं तेवढी त्याची गरज नाही." 

रुग्णांच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिवीरचा अट्टाहास केला जातो. हा माझा स्वत:चा अनुभव आहे, असं डॉ. बावस्कर म्हणाले. "लोकांच्या मनात रेमडेसिवीरविषयी एक ग्रह तयार झाला आहे. मृत्यूदरामुळे कोरोनाबाबत भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत काही होणार नाही, असा विश्वास डॉक्टरांनी रुग्णांना द्यायला हवा, असं ते म्हणाले. "रुग्णांना रेमडेसिवीर प्रीस्क्राईब करु नये हे सरकारने उशिरा सांगितलं. कोणाला रेमडेसिवीर द्यावं याबाबत सरकारने ऑडिट केलं पाहिजे," अशी सूचनाही त्यांनी केली. 

ना कोणत्या रुग्णासाठी रेमडेसिवीर वापरलं, ना कोणाला सल्ला दिला
"मी आतापर्यंत एकाही रुग्णासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वापरलं नाही आणि कोणालाही ते घेण्याचा सल्ला दिला नाही. शिवाय कोणीही माझ्याकडे याबाबत विचारणा केली नाही. उच्च आणि मध्यमवर्गीयांमध्ये रेमडेसिवीर प्रचलित आहे. खेड्यांमध्ये रेमडेसिवीर आलं नाही. माझ्याकडे कोणी रेमडेसिवीर मागत नाही आणि वापरलं जात नाही," असंही डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी नमूद केलं

ग्रामीण भागातील रुग्ण बाधा झाल्यानंतर आठव्या किंवा नवव्या दिवशी येतात. पण हे त्यांच्या आणि इतरांच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे. अशावेळी जनजागृती कशी करता? असं विचारलं असता डॉ. बावस्कर म्हणाले की, "मी केलेला मेसेज सध्या व्हायरल होता. जनरल प्रॅक्टिशनर्सनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, कणकण असलेला कोणताही रुग्ण आला तर त्याला सरकारी रुग्णालयात स्वॅब टेस्ट करण्यास सांगावं."

ग्रामीण भागात शहरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता रुग्णसंख्या वाढली आहे. वयस्कर रुग्ण आहेतच पण 20-40 वर्षे वयोगटातील रुग्ण वाढत आहेत, ही गंभीर बाब असल्याचं डॉ. बावस्कर यांनी म्हटलं.

भारताचं कुठे चुकलं?
कोविड-19 मुक्त होणारा इस्रायल हा पहिला देश ठरला आहे. मग कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात भारताचं कुठे चुकलं. यावर बावस्करांनी उत्तर दिलं की, "इस्रायलमध्ये सगळ्यांचं लसीकरण झालं. तो देश लहान आहे. आपला देश मोठा आहे. त्यानुसार आपले आरोग्य कर्मचारी जास्त आहेत. सरकारने वेळेत लसीकरण केलं असतं तर कोरोनाची दुसरी लाट आली नसती."
 
हे सोपे उपाय कराच!

1. कणकण आणि ताप अंगावर काढायचा नाही

2. स्बॅव टेस्ट करायला घाबरायचं नाही

3. दररोज व्यायाम करा, मधुमेह नियत्रंणात पाहिजे

4. लसीचे दोन्ही डोस घेतलेच पाहिजे

5. मास्क व्यवस्थित वापरावा, माझ्यापासून दुसऱ्यांना इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घ्यावी

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण आरोग्य यंत्रणा थकली आहे. सरकार थकून जाईल तेव्हा आपण सगळेच थकून जाऊ. त्यामुळे सरकारला आणि देशाला उभं करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असं डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget