एक्स्प्लोर

Dasara Melava : कालच्या मेळाव्यांची आजही चर्चा! दसरा मेळाव्यात नेमकी कुणी मारली बाजी?

कालच्या मेळाव्यांची आजही चर्चा आहे. एकूण तुलना केल्यास त्यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दसरा मेळाव्याचे पारडे जड झाल्याचे दिसून आले.

Dasara Melava : एका बाजूला शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दसरा मेळावा तर दुसऱ्या बाजूला बीकेसी ग्राउंड वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यामुळे राजकीय आरोपांच्या हजारो फैरी झाडल्या गेल्या, पण एकूण तुलना केल्यास त्यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दसरा मेळाव्याचे पारडे जड झाल्याचे दिसून आले.

काल मुंबईत एकीकडे धार्मिक दसरा घरोघरी पार पडला जात होता तर दुसरीकडे राजकीय दसरा त्यापेक्षा कित्येक जास्त पटीने पार पडला. शिवाजी पार्क शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार या प्रश्नाचे उत्तर हायकोर्टात मिळाल्यानंतर शिवाजी पार्क उद्धव ठाकरे गटाने तर बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर एकनाथ शिंदे गटाने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली. यावर्षीचा दसरा मेळावा अतिप्रचंड अफाट आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा व्हावा यासाठी दोन्ही गटाकडून शक्य तेवढे सर्व प्रयत्न केले गेले. त्यामुळे दोन्ही दसरा मेळाव्याची तुलना तर करावीच लागणार.  

कुणाच्या मेळाव्याला किती उपस्थिती?
 
तुलना करायची झाल्यास सर्वात पहिला मुद्दा येतो गर्दीचा, मुंबई पोलिसांनीच दिलेल्या आकडेवारीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क यातील मेळाव्यासाठी 65 ते 70 हजार शिवसैनिक उपस्थित होते. शिवाजी पार्क मैदानाची एकूण क्षमता 50 हजार इतकी आहे. मात्र त्याच वेळी एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला एक लाख 25 हजार ते तीस हजार शिवसैनिक उपस्थित होते असे मुंबई पोलिसांचे आकडेवारी सांगते. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी याच मैदानात सर्वाधिक 97 हजार नागरिक उपस्थित होते मात्र त्याहीपेक्षा जास्त गर्दी एकनाथ शिंदे यांनी जमवली असल्याचे पोलिसांचीच आकडेवारी सांगत आहे. 

सर्वाधिक गर्दी जमवल्याचा दावा जरी ठाकरे गटाकडून करण्यात येत असला तरी आणखीन एका बाबतीत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली असं म्हणावं लागेल. ते म्हणजे थेट उद्धव ठाकरे यांचे बंधू आणि गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास अज्ञात वाचत असलेले जयदेव ठाकरे यांना थेट व्यासपीठावर त्यांनी आणले, सोबतच स्मिता ठाकरे आणि आनंदी घे यांची सखी बहीण अरुणाताई यादेखील एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी व्यासपीठावर उपस्थित होत्या. ठाकरे घराण्यांच्या या सर्व व्यक्तींना व्यासपीठावर आल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. 

त्यानंतर मुद्दा येतो तो म्हणजे मेळाव्याच्या आयोजनाचा, एकनाथ शिंदे यांनी कधी नव्हे तो दसरा मेळावा हा भव्य दिव्य करून दाखवला, कारण दीड लाखांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची बसण्याची आणि  खाण्याची सोय करून ठेवण्यात आली होती. शिवाजी पार्क येथील मेळाव्यात मात्र तशी खास सोय दिसून आली नाही. 

अशी होती सभेसाठी व्यवस्था
शिवाजी पार्क येथील मैदानात साठ बाय वीस फुटांचा स्टेज उभारण्यात आला होता, तर बीकेसी येथे 120 बाय 40 फुटांचा प्रचंड स्टेज होता.
शिवाजी पार्क येथे आत 3 तर बाहेर 4 एल ई डी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या, जेणेकरून उधहव ठाकरे यांचे भाषण लांबच्या लोकांना बघता येईल, दुसरीकडे बीकेसी येथे स्टेजच्या बाजूला दोन 15 बाय 20 फुटांच्या स्क्रीन तर संपूर्ण मैदानात 15 स्क्रीन लावण्यात आल्या होत्या, तसेच वांद्रे भागात आस पास देखील चौकात अश्याच स्क्रीन लावल्या होत्या
पश्चिम रेल्वेच्या लोकल मध्ये देखील एकनाथ शिंदे यांचा मेळावा लाईव्ह दाखवण्यात येत होता
याच प्रमाणे शिवाजी पार्कमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांना तशी खास जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती, तर एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासाठी ठाण्यातील महागड्या प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानातून खास धपाटे कचोऱ्या आणि गुलाबजामचे खाण्याचे पाकीट सर्वांना वाटण्यात आले. 

या सर्व टीकेला भाजपने मात्र शिंदे गटाची बाजू घेत चोख प्रतिउत्तर दिला आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मिळाल्यावर उत्तर देणे महत्त्वाचे नसल्याचे सांगितले, तर नारायण राणे यांनी देखील एकनाथ शिंदे यांचाच मेळावा सरस असल्याचे म्हटले.

सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे भाषण. उद्धव ठाकरे यांचे भाषण हे 37 मिनिटांचे होते. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड तास भाषण करून उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढले, ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नातवावर देखील टीका केली त्यावेळी तर झाल्याचे बघायला मिळाले. 

कालच्या मेळावा नंतर उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांनी आमचाच मेळावा हा खरा मेळावा असून आमच्या मेळाव्यातली गर्दी हीच विचारांशी एकनिष्ठ असलेली गर्दी असं सांगितला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पहिल्याच या राजकीय दसरा मेळाव्यासाठी तयार करण्यात आलेला कॅनवास हा प्रचंड मोठा होता हे देखील दिसून आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Dasara Melava : आव्वाज कोणाचा...? दोन्ही दसरा मेळाव्यांपैकी कोणत्या गटाचा आवाज सर्वाधिक?

Dasara Melava: मुंबई विद्यापीठात दारुच्या बाटल्या; दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिंदे गटावर युवासेनेचा आरोप

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Thackeray Brothers Protest : राज ठाकरेंनी 'शिवतीर्थ'वर तिरंगा मोर्चाचा प्लॅन आखला, मनसेच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, शरद पवारांनाही फोन फिरवला
राज ठाकरेंनी 'शिवतीर्थ'वर तिरंगा मोर्चाचा प्लॅन आखला, मनसेच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, शरद पवारांनाही फोन फिरवला
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha : प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून मनसेकडून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Embed widget