एक्स्प्लोर

लग्नाच्या आहेराची रक्कम सैनिक फंडाला, डहाणूतील राजपूत कुटुंबीयांच्या निर्णयाचं कौतुक

आपण जो आनंद साजरा करतो, हा सैनिकांमुळे असून त्यांच्याकरिता काही केले पाहिजे, या भावनेतून विवाह सोहळ्यात जमा होणारी धनराशी सैनिक रिलीफ फंडाला द्यायचा विचार त्यांच्या मनात आला.

पालघर : पुलवामा येथील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देशभर हळहळ आणि पाकिस्तानविषयी द्वेष भावना निर्माण झाली. दरम्यान आपल्या सुख:करिता देहाची बाजी लावणार्‍या सैनिकांकरीता मुलीच्या लग्नातील आहेराची सर्व धनराशीच देण्याचा निर्णय डहाणू शहरातील सरावली येथल्या अशोक ओघडभाई राजपूत आणि कुटुंबियांनी घेतला आहे. त्यांच्या या देशप्रेमाविषयी सर्वत्र अभिनंदन होत आहे. राजपूत कुटुंबीय सरावली मानफोडपाडा येथील रहिवासी आहेत. अशोक हे एका कंपनीत व्यवस्थापक पदावर आहेत. त्यांची थोरली मुलगी भावना (वय 25 वर्ष) हिचा विवाह सेलवासाच्या कोडिणार गावातील वालजीभाई जेठवा यांच्या इंजिनीअर मुलगा केतुल (वय 26 वर्ष) यांच्याशी 24 फेब्रुवारी रोजी ठरला. लगीनघाई सुरु असताना 14 फेब्रुवारी रोजी पुलावामा येथील दहशतवादी हल्यात चाळीस भारतीय जवान शहीद झाल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण देशभर शोककळा पसरली. लग्नकार्याच्या तोंडावर हे घडल्याने राजपूत कुटुंबीय हेलावून गेले. समाजात आणि माध्यमांमध्ये शहीद आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी ऐकताना मन कष्टी बनायचे अशा आठवणी अशोक राजपूत यांनी बोलताना सांगितल्या. आपण जो आनंद साजरा करतो, हा सैनिकांमुळे असून त्यांच्याकरिता काही केले पाहिजे, या भावनेतून विवाह सोहळ्यात जमा होणारी धनराशी सैनिक रिलीफ फंडाला द्यायचा विचार त्यांच्या मनात आला. हा विचार त्यांनी पत्नी सुधा, आई मंगुबाई, मुलगी भावना आणि स्नेहल आणि मुलगा स्वप्नील यांना सांगितला. त्यानंतर नवर्‍याकडील मंडळींना कळवलं. या सर्वांनी त्याचे स्वागत केले. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी उभयंत्यांचा विवाह सोहळा पार पडला. किंबहुना राजपूत कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती शहरातील नागरिकांनाही कळली त्यांनी या कुटुंबियांची पाठ थोपटली. दरम्यान या लग्नात आहेर देणार्‍या प्रत्येकाच्या नावाची नोंद एका रजिस्टरवर केली असून त्या समोर रक्कमही नोंदविण्यात येणार आहे. या यादीसह संपूर्ण धनराशी पालघर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सैनिक रिलीफ फंडाला धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात येईल असे राजपूत म्हणाले. माझ्या या निर्णयात कुटुंबिय आणि मित्र परिवाराचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनाही या माध्यमातून देशसेवेत खारीचा वाटा उचलल्याचे समाधान मिळेल हा उदात्त हेतू त्यांनी बोलून दाखवला. किमान दीड लाख रुपयांचा आहेर येणे अपेक्षित आहे. जरी 2 किंवा 3 लाखांच्या घरात रक्कम गेली, तरीही पै अन् पै सैनिकांच्या नावेच जमा केली जाईल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. हा अनोखा विवाहसोहळा चर्चेचा विषय बनला असून राजपूत कुटुंबियांचे सर्वच स्तरावर अभिनंदन होत आहे. "केवळ सैनिकांमुळेच भारतीय नागरिक सुरक्षित आहेत, या भावनेतून आहेराची धनराशी सैनिक फंडाला देण्याचा निर्णय कुटुंबीयांच्या चर्चेनंतर घेतला. लग्नानंतरचे काही रिती-रिवाज अद्याप बाकी आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर आहेर देणार्‍यांची नावं आणि रक्कम असलेली यादी आणि धनराशी जिल्हाधिकार्‍यांमार्फत इंडियन आर्मी रिलीफ फंड मध्ये जमा केली जाईल," अशी माहिती वधूचे वडील अशोक राजपूत यांनी दिली. "डहाणूतील राजपूत कुटुंबीयांनी सैनिकांविषयी दाखवलेल्या भावना आदर्शवत आहेत. या शहरातील नागरिक सुजाण असल्याचे हे उत्तम उदाहरण असून त्याचे अनुकरण झाले पाहिजे," असं डहाणूचे प्रांताधिकारी सौरभ कटियार म्हणाले.
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget