एक्स्प्लोर

Lock Down | लॉकडाऊनचा पॉझिटिव्ह इफेक्ट; मुंबई, इटली, चीनमधील प्रदूषण घटलं!

जगातली मोठी शहरं कोरोनामुळे लॉकडाऊन आहेत. मात्र, या लॉकडाऊनमुळे मोठ्या शहरांमधली हवेची गुणवत्तात कित्येक वर्षांनंतर सुधारली आहे. एरव्ही मध्यम किंवा वाईट असणारा एअर क्वॉलिटी इंडेक्स चक्क समाधानकारक आणि उत्तम असल्याची सध्या नोंद होत आहे.

मुंबई : कोरोनाने जगभरातल्या महत्त्वाच्या शहरांना ठप्प व्हायला भाग पाडलं. एरव्ही रस्त्यांवर मुंगीलाही वाट काढायला जागा न देणारी वाहनं रस्त्यावरुन अचानक गायब झाली. धूर ओकणाऱ्या कारखान्यातलं काम थांबलं. बांधकामं थांबली इतकंच काय तर नाक्यावरच्या टपरीपाशी निघणारी सिगरेटच्या धुराची वलयंही नाहीशी झाली आणि कित्येक वर्षांनंतर या शहरांतल्या रस्त्यांनी आणि हवेनेही मोकळा श्वास घेतला.

कोरोनामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं जगभरातली शहरं लॉकडाऊन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे जगभरातल्या बंद असलेल्या शहरांमधली प्रदूषणाची पातळी कमालीची घटली आहे.

चीन - चीनमधलं आकाश निरभ्र झालं. वुहान ज्या ठिकाणी आहे त्या हुबेई प्रांतात फेब्रुवारी महिन्यात हवेच्या गुणवत्तेत 21.5 टक्के वाढ झाली. इतकंच काय नासाने घेतलेल्या सॅटेलाइट फोटोवरुनही कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानंतर वातावरणात झालेला फरक दिसून येतो.

इटली - इटलीत व्हेनिसमधील कालव्यातील पाणी स्वच्छ झालं. त्याठिकाणी, जवळपास एका महिन्याला 50 लाख पर्यटक भेट देतात. आता पर्यटकांची संख्या कमी झाल्याने व्हेनिसच्या कालव्यात नाव, बोट यामुळे होणारं प्रदूषण कमी झालं आहे. आता तिथे डॉल्फिन उड्या मारताना दिसतात. तसंच पाणीही स्वच्छ झालं आहे.

इतर देशांमधल्या प्रदूषणाच्या पातळीत जी घट झाली आहे तीच स्थिती थोड्या बहुत फरकाने आपल्याकडेही आहे.

- सामान्यत: मार्च महिन्यात प्रदूषणाची पातळी मध्यम श्रेणीत असते. पण ती चक्क सध्या उत्तम श्रेणीत आहे.

- मुंबई, पुणे या ठिकाणी हवेची गुणवत्ता - एअर क्वॉलिटी इंडेक्स 50 ते 100 किंवा 100 ते 150 असतो, तो आता एक्यूआय 0-50 श्रेणीत आहे.

- 2018 आणि 2019 च्या तुलनेत मार्च 2020 मध्ये मुंबई आणि पुण्यातील नायट्रोजन ऑक्साईडच्या पातळीत 45% घट झाली आहे.

- पी.एम 2.5 या प्रदूषक घटकाची पातळी दिल्लीत 30 टक्क्यांनी खालावली आहे.

- एनओएक्स (नायट्रोजन ऑक्साईड) प्रदूषण घटकाची पातळी पुण्यात 43 टक्के, मुंबईत 38 टक्के, आणि अहमदाबादमध्ये 5 टक्क्यांनी घटली आहे.

- गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच मुंबईतले सर्वाधिक प्रदुषित भाग असणारे सायन आणि कुर्ला इथे हवेची गुणवत्ता चक्क उत्तम आहे.

सिस्टम ऑफ एयर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) संस्थेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांनंतर हवेची ही गुणवत्ता पाहायला मिळत आहे.

मुंबईतल्या मरिन ड्राईव्हवरही एरव्ही माणसांची गर्दी आणि भरतीच्या लाटांसोबत येणारा कचरा दिसतो पण आता तिथेही निळंशार पाणी आणि त्यावर अंथरलेलं निळं आभाळ दिसतंय.

कोरोनाने माणसांना पिंजऱ्यात टाकलं आणि आजपर्यंत माणसाने ज्या हवेला धूरकट बनवलं तिनेही मोकळा श्वास घेतला. या रस्त्यांवर, समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छ मोकळी प्रदूषणविरहीत हवा आहे. कोरोनाचं संकट संपेल तोपर्यंत कदाचित ही मोकळी, प्रदूषणविरहीत हवाही पुन्हा एकदा अनोळखी होईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
Embed widget