एक्स्प्लोर

नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती टाळली

मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी मात्र नदी पुनरुज्जीवन संकल्प कार्यक्रमाला कार्यक्रमाला हजेरी लावली.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सहभाग असलेल्या 'सेव्ह रिव्हर' या व्हिडिओवर काँग्रेसने निशाणा साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 'नद्या पुनर्जीवन संकल्प कार्यक्रमा'ला जाणंच टाळलं. मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी मात्र या कार्यक्रमाला हजेरी लावली. मुंबईत दहीसरमध्ये आज सकाळी सात वाजता 'नद्या पुनर्जीवन संकल्प कार्यक्रम' आयोजित करण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री या कार्यक्रमाला गेलेच नाहीत. व्हिडिओत झळकलेले अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही कार्यक्रमाला दांडी मारली. मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस आणि भाजप आमदार राम कदम मात्र कार्यक्रमाला उपस्थित होते. 'सेव्ह रिव्हर' या व्हिडिओवर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. या व्हिडिओत महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलिस आयुक्त यांचाही समावेश आहे. मात्र अशा खासगी कंपनीच्या व्हिडिओत प्रशासकीय अधिकारी कसे सहभागी होऊ शकतात? असा सवाल काँग्रेसने उपस्थित करत कारवाईची मागणी केली. या व्हिडिओची निर्मिती करणारी संस्था भाजपशी संबंधित असल्याचा आरोपही काँग्रेसने केला. दरम्यान,  हा व्हिडिओ सरकारने तयार केलेला नसून, 'रिव्हर मार्च' या सामाजिक संस्थेने केल्याचं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं. नदी शुद्धीकरण आणि पर्यावरण संवर्धन ही आजच्या काळाची गरज असल्यामुळेच मुख्यमंत्री आणि अन्य प्रशासकीय अधिकार्‍यांनी त्यांच्या विनंतीला होकार देऊन यात सहभाग घेतला. लोकोपयोगी कार्यासाठी उपक्रम व्यावसायिक नसेल तर शहराचे नागरिक म्हणून अधिकारी त्यात सहभागी होऊ शकतात असं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं. महापालिका आयुक्त/पोलिस आयुक्त यांचा सहभाग नदी संवर्धनच नाही, तर स्वच्छता, हागणदारीमुक्ती अशा अनेक व्हिडिओंमध्ये या अधिकार्‍यांनी यापूर्वीही सहभाग घेतला आहे. अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, सलमान खान यासारख्या अभिनेत्यांसोबतही त्यांनी जनतेला विविध सामाजिक उपक्रमांसाठी आवाहन केलं आहे. आयएएस अधिकार्‍यांसाठी जी आदर्श आचारसंहिता आहे, त्यात कलम 6 मध्ये प्रेस किंवा पब्लिक मीडियामध्ये येण्यासंबंधीची संहिता दिली आहे. त्यानुसार पुस्तक लिहिणे, सहभाग घेणे यासारख्या व्यावसायिक नसलेल्या लोकोपयोगी कार्यासाठी पूर्वपरवानगीची गरज नसल्याचं सरकारने सांगितलं. शहराचे नागरिक म्हणूनही त्यांना या उपक्रमात सहभागाचा अधिकार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं रिव्हर मार्च ही कोणतीही नोंदणीकृत संस्था नाही, ते एक अभियान आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी जाणार्‍यांनी एकत्र येऊन उभे केलेलं हे अभियान आहे. महात्मा गांधी यांनी जसे दांडी मार्चचे आयोजन केले होते, त्यातूनच ‘रिव्हर मार्च’ असे नामकरण या सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्याचं सरकारने स्पष्ट केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात चित्रीकरण करण्यापूर्वी रितसर परवानगी घेण्यात आली होती. उद्यानाचे वनक्षेत्रपाल यांनी ही परवानगी दिली आणि त्यासाठी 14 हजार 645 रुपये असे शुल्कही भरण्यात आल्याचं शासनाने नमूद केलं

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' व्हिडीओवरील काँग्रेसच्या आक्षेपांना भाजपचं उत्तर

श्री व सौ मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओवर काँग्रेसचे दहा प्रश्न

VIDEO : जेव्हा श्री आणि सौ मुख्यमंत्री अभिनय करतात!

महत्त्वाच्या बातम्या

ST चा ताफा अधिक सक्षम होणार, तब्बल पाच हजार 'लालपरी'बस येणार, गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नाही : मंत्री प्रताप सरनाईक
ST चा ताफा अधिक सक्षम होणार, तब्बल पाच हजार 'लालपरी'बस येणार, गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नाही : मंत्री प्रताप सरनाईक
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Narendra Modi : पंतप्रधानांच्या बालमित्राची जमीन कोण हडपली? मिरा भाईंदरच्या असगरअलींची भाजप नेत्याच्या विरोधात CBI चौकशीची मागणी
पंतप्रधानांच्या बालमित्राची जमीन कोण हडपली? मिरा भाईंदरच्या असगरअलींची भाजप नेत्याच्या विरोधात CBI चौकशीची मागणी
जरांगे साहेबांच्या 99 टक्के मागण्या मान्य झाल्यात, ते मुंबईत आले तरी त्यांचं स्वागतच, शिवसेना आमदार फाटक यांचं वक्तव्य 
जरांगे साहेबांच्या 99 टक्के मागण्या मान्य झाल्यात, ते मुंबईत आले तरी त्यांचं स्वागतच, शिवसेना आमदार फाटक यांचं वक्तव्य 

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Embed widget