एक्स्प्लोर

Mumbai Paryushan Parv 2025: पर्युषण काळात मुंबईतील कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, जैन समाजाची मागणी फेटाळली

Mumbai Paryushan Parv 2025: जैन धर्मीयांमध्ये दिगंबर पंथ 20 ते 27 ऑगस्ट तर श्वेतांबर पंथ 21 ते 28 ऑगस्ट दरम्यान पर्युषण पर्व साजरा करतात.या कालावधीत कत्तलखाने सलग नऊ दिवस बंद ठेवावेत, अशी मागणी केली होती.

मुंबई : जैन समुदायाच्या पर्युषण पर्वाच्या काळात कत्तलखाने सलग नऊ दिवस बंद ठेवण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ही मागणी होत असताना, “मुंबई महानगरपालिकेला असा आदेश देण्याचा अधिकार कुठल्या कायद्याअंतर्गत आहे? तसेच याचिकाकर्त्यांनाही हा आग्रह धरण्याचा कायदेशीर अधिकार आहे का?” असा स्पष्ट प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.

जैन धर्मीयांमध्ये दिगंबर पंथ 20 ते 27 ऑगस्ट तर श्वेतांबर पंथ 21 ते 28 ऑगस्ट दरम्यान पर्युषण पर्व साजरा करतात. या पर्वाला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने या कालावधीत कत्तलखाने सलग नऊ दिवस बंद ठेवावेत, अशी मागणी दोन धार्मिक संस्थांनी याचिकेद्वारे केली होती. सध्या परंपरेनुसार या काळात केवळ एका दिवसासाठीच कत्तलखाने बंद ठेवली जातात.

खंडपीठाचा नकार

मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे ही याचिका दाखल झाली होती. मात्र, न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला. “या विषयावर आपण कायदेशीर चौकटीत राहून निर्णय घ्यावा लागेल. नऊ दिवसांची बंदी लागू करण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत,” असे निरीक्षण न्यायालयाने व्यक्त केले.

 महापालिकेची भूमिका

महापालिकेने आपली बाजू मांडताना सांगितले की, “मुंबई हे बहुभाषिक व बहुधार्मिक शहर आहे. येथे नऊ दिवसांसाठी कत्तलखाने बंद ठेवणे व्यवहार्य नाही. नऊ दिवस बंदी घालणे हे धोरणात्मक दृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे फक्त एका दिवसाचीच बंदी ठेवण्यात येते,” असे स्पष्टीकरण देण्यात आले.

याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद

जैन संस्थांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, “मुंबईत जैन समाजाचे प्रमाण अहमदाबादपेक्षा जास्त आहे. शाकाहारी नागरिकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे नऊ दिवसांची बंदी लागू करणे शक्य व्हावे, अशी आमची मागणी आहे.” मात्र, न्यायालयाने यावर समाधान व्यक्त केले नाही.

सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील प्रसाद ढाकेफाळकर यांनी उदाहरण देताना सांगितले की, “मुघल बादशाह अकबर याला जैन धर्मीयांनी पटवून दिल्यानंतर त्याने सहा महिन्यांसाठी मांसाहारावर बंदी घातली होती. मात्र आजच्या काळात सरकार किंवा महापालिका नऊ दिवसांची बंदी लावायला तयार नाहीत.” यावर मुख्य न्यायमूर्तींनी विनोदी स्वरात टिप्पणी केली, “अकबर बादशाहला समजावणे सोपे गेले, पण महापालिकेला पटवणे कठीण दिसते. त्यामुळे हा प्रश्न तुम्हालाच महापालिकेसमोर मांडावा लागेल.”

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
किरीट सोमय्या विनापोस्ट काम करतात; किरीट सोमय्यांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Embed widget