युतीसाठी भाजपकडून 50-50 चा फॉर्म्युला

"युतीबाबत आज सकारात्मक चर्चा झाली.
जागावाटपासंदर्भात बोलणी झाली. दोन्ही पक्षांनी सूचना केल्या.
जागांची यादी तयार करुन एकमेकांना द्यायची,
मग त्यावर पक्षातील ज्येष्ठ नेते यादी पाहतील,
आणि अभ्यास करुन मग पुढे बोलणी होतील",
असं अनिल देसाई यांनी सांगितलं.
याशिवाय ज्या जागा भाजपला हव्या आहेत, ती यादी ते देतील, आम्हाला ज्या जागा वाटतील, त्यांची यादी आम्ही भाजपला देऊ शकतो, असंही देसाई यांनी सांगितलं.
गेल्या बैठकीच्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बैठकीला उपस्थित होते. यावेळी मात्र ते हजर नाहीत. आशिष शेलार"मोकळ्या पद्धतीने चर्चा केली.
पारदर्शकता या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे चर्चा झाली.
ते नेते ठरवतील त्यावर आज चर्चा झाली नाही.
दहिसर ते मुलुंड चर्चा केली. दोन्ही पक्ष ज्या जागा जिंकू शकतील,
अशा जागांचा प्रस्ताव आम्ही एकमेकांना देणार आहोत",
असं भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे - मुख्यमंत्र्यांची फोनवरुन चर्चा भाजप आणि शिवसेनेमधल्या युतीच्या चर्चेचं घोडं ज्या पारदर्शकतेच्या अजेंड्यामुळं अडलं आहे, त्यावर आता फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चर्चा करणार आहेत. फोनवर झालेल्या चर्चेनंतर उद्धव आणि मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर जागा वाटपासंदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून खलबतं सुरूच राहणार आहे. संबंधित बातम्यामहापौर स्नेहल आंबेकरांच्या उमेदवारीला विरोध
पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा
शिवसेनेच्या 'डीड यू नो'ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सवाल
राज्य आणि केंद्रातही पारदर्शकता हवी : शिवसेना
शिवसेना-भाजपमधील आज होणारी बैठक रद्द
Before You Go
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग






















