एक्स्प्लोर

वर्सोवा-वांद्रे सी लिंकचं 'कास्टिंग यार्ड' बेकायदेशीर असल्याचा हायकोर्टाचा निर्वाळा

पर्यावरण संवर्धनाच्या मुद्यावर जुहूमध्ये कास्टिंग यार्डला परवानगी देता येणार नाही, असं हायकोर्टाने स्पष्ट केलं. कास्टिंग यार्डविरोधातील याचिका स्वीकारत हायकोर्टने राज्य सरकारला परवानगी नाकारली आहे.

मुंबई : जुहू समुद्र किनाऱ्यावर वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पासाठी 'कास्टिंग यार्ड' उभारण्याची परवानगी हायकोर्टाने नाकारली आहे. त्यामुळे हे कास्टिंग यार्ड आता दुसरीकडे हलवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. हे कास्टिंग यार्ड जरी तात्पुरत्या स्वरूपाचं असलं तरी यामुळे समुद्र किनाऱ्यावरील पर्यावरणावर होणारे परिणाम हे कधीही भरुन न येणारे ठरतील. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या मुद्यावर याठिकाणी कास्टिंग यार्डला परवानगी देता येणार नाही, असं स्पष्ट करत या कास्टिंग यार्डविरोधातील याचिका स्वीकार करत हायकोर्टने राज्य सरकारला परवानगी नाकारली आहे. पर्यायाने हा प्रकल्पही आता रखडण्याची चिन्हं आहेत. कांदळवनाची खुलेआम कत्तल करण्याची परवानगी देत एमएसआरडीसीने खाजगी कंपनीमार्फत समुद्रातील वाळू उपसून तिथं या कास्टिंग यार्डाचं काम सुरु केलं होतं. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा दणका बसला आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. जुहू बीचवर वर्सोवा-वांद्रे सी लिंकच्या कामासाठी लागणारे सिमेंटचे पिलर्स, बीम, गर्डर्स तयार करण्यासाठी कास्टिंग यार्ड उभारण्यात येणार होते. त्यासाठी सुमारे 7.9 हेक्टर जागा ताब्यात घेण्यात आली असून या जागेवरील कांदळवनांची कत्तल करण्यात आली आहे. तसेच किनाऱ्यावरील रेती उपसून त्याचा ढिगारा टाकण्यात आल्यामुळे उरलेल्या कांदळवनांना भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी मिळत नाही, अशी सोय करण्यात आली होती. त्यामुळे त्या जागेवरील उरलेली ही कांदळवनंही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रकरणी सरळसरळ सीआरझेड कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ता झोरु भाटेना यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील गायत्री सिंग यांनी कोर्टाला सांगितले की किनाऱ्यावर टाकण्यात आलेल्या भरावामुळे समुद्राचे पाणी उर्वरित कांदळवनांना मिळेनासे झाले आहे. त्यामुळे या कांदळवनांचा बळी जाणार आहे. याशिवाय या कामासाठी वनविभागाची परवानगीही घेण्यात आलेली नाही. एमएसआरडीसीकडून बाजू मांडताना कोर्टाला सांगण्यात आले होते की, या संदर्भात आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचिककर्त्यांचा दाव्यात काहीही तथ्य नसून ही याचिका फेटाळण्यात यावी. हायकोर्टाने दोन्ही बाजू कडील युक्तिवाद ऐकून घेत अखेरीस हे कास्टिंग यार्ड बेकायदेशीर ठरवलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget