एक्स्प्लोर

सम-विषम तारखेच्या नियमाला मुंबईतील व्यापाऱ्यांचा विरोध, दुकानं सहा दिवस सुरु ठेवण्याची मागणी

मुंबई महापालिकेने लागू केलेल्या सम-विषय तारखेच्या नियमाला व्यावसायिकांनी विरोध केला आहे. परंतु ग्राहकांच्या अभावी व्यवसाय पूर्णपणे थंड असल्याने दुकानं सहा दिवस सुरु करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

मुंबई : मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक व्यवसायांना सुरु करण्यासाठी परवानगी दिली. परंतु व्यावसायिकांनी सम-विषय तारखेच्या नियमाला विरोध केला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे त्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. याचा फटका म्हणजे अनेक व्यवसाय पूर्णपणे थंड आहे. त्यातच तीन दिवसच दुकानं सुरु ठेवण्यामुळे काहीच व्यवसाय होत नाही. यावर उपाय म्हणून आम्हाला सहा दिवस व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी द्या, अशी मागणी सर्व व्यापाऱ्यांनी केली आहे.

मिशन बिगीन अगेनअंतर्गत सलून व्यवसाय, बाजार, देशांतर्गत विमानसेवा सुरु झाली. यासोबतच वेगवेगळी दुकानंही सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. या व्यवसायिकांना सम आणि विषम तारखेच्या नियमाचा निर्बंध घालण्यात आला होता. आता अनेक व्यवसायिकांनी मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या या नियमाचा विरोध केला आहे. यामध्ये झवेरी बाजारातील सोने चांदीचे व्यापारी, तसेच मुंबईतील फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने विरोध दर्शवला आहे. या संघटनेचे महाराष्ट्रात तब्बल साडेतीन लाख सदस्य आहेत.

सध्या मुंबईत कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. याचा फटका म्हणजे सध्या अनेक व्यवसाय पूर्णपणे थंड असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातच तीन दिवसच दुकानं सुरु ठेवण्यामुळे काहीच व्यवसाय होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यावर उपाय म्हणून आम्हाला सहा दिवस व्यवसाय सुरु ठेवण्याची मागणी सर्व व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. सध्या देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जरी वाढत असला तरीही दुसरीकडे विचार केला तर महाराष्ट्राला आणि देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी व्यवसाय सुरु करणं गरजेचं असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

याबाबत बोलताना, मुंबईतील फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा म्हणाले की, "महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र हे राज्य देशातील सर्वात जास्त टॅक्स भरणारे राज्य आहे. महाराष्ट्र राज्य वर्षाला तब्बल 65 टक्के जीएसटी केंद्राला देत आहे. त्यामुळे मुंबई, किंबहुना देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी मुंबईतील व्यवसाय सुरु होणं गरजेचं आहे. सध्या मुंबईत सम आणि विषम तारखेचा निर्णय लागू करण्यात आला आहे. परंतु अडचण अशी आहे की, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे दुकानात येणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यात सम-विषमच्या नियमामुळे केवळ तीन दिवसच दुकानं सुरु असतात. यामुळे कामगारांना पगार देता येईल, इतकी देखील रक्कम जमा होतं नाही. मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी व्यवसाय सहा दिवस सुरु करण्याची परवानगी द्यावी. या मागणीसाठी आम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रव्यवहार केला आहे. अपेक्षा आहे लवकरच आमची मागणी मान्य होईल."

तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, "सध्या आम्ही तीन दिवसांचा नियम लागू केला आहे. जर सम विषमचा फॉर्म्युला यशस्वी झाल्याचं लक्षात आलं तर आम्ही लवकरच सात दिवस दुकानं सुरु करण्यासाठी परवानगी देऊ. सध्या आमची याबाबत चर्चा सुरु आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊ."

Mission Begin Again | मुंबईतील दुकानं सहा दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्या : व्यापारी
ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
Embed widget