एक्स्प्लोर

सम-विषम तारखेच्या नियमाला मुंबईतील व्यापाऱ्यांचा विरोध, दुकानं सहा दिवस सुरु ठेवण्याची मागणी

मुंबई महापालिकेने लागू केलेल्या सम-विषय तारखेच्या नियमाला व्यावसायिकांनी विरोध केला आहे. परंतु ग्राहकांच्या अभावी व्यवसाय पूर्णपणे थंड असल्याने दुकानं सहा दिवस सुरु करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

मुंबई : मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक व्यवसायांना सुरु करण्यासाठी परवानगी दिली. परंतु व्यावसायिकांनी सम-विषय तारखेच्या नियमाला विरोध केला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे त्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. याचा फटका म्हणजे अनेक व्यवसाय पूर्णपणे थंड आहे. त्यातच तीन दिवसच दुकानं सुरु ठेवण्यामुळे काहीच व्यवसाय होत नाही. यावर उपाय म्हणून आम्हाला सहा दिवस व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी द्या, अशी मागणी सर्व व्यापाऱ्यांनी केली आहे.

मिशन बिगीन अगेनअंतर्गत सलून व्यवसाय, बाजार, देशांतर्गत विमानसेवा सुरु झाली. यासोबतच वेगवेगळी दुकानंही सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. या व्यवसायिकांना सम आणि विषम तारखेच्या नियमाचा निर्बंध घालण्यात आला होता. आता अनेक व्यवसायिकांनी मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या या नियमाचा विरोध केला आहे. यामध्ये झवेरी बाजारातील सोने चांदीचे व्यापारी, तसेच मुंबईतील फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने विरोध दर्शवला आहे. या संघटनेचे महाराष्ट्रात तब्बल साडेतीन लाख सदस्य आहेत.

सध्या मुंबईत कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. याचा फटका म्हणजे सध्या अनेक व्यवसाय पूर्णपणे थंड असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातच तीन दिवसच दुकानं सुरु ठेवण्यामुळे काहीच व्यवसाय होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यावर उपाय म्हणून आम्हाला सहा दिवस व्यवसाय सुरु ठेवण्याची मागणी सर्व व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. सध्या देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जरी वाढत असला तरीही दुसरीकडे विचार केला तर महाराष्ट्राला आणि देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी व्यवसाय सुरु करणं गरजेचं असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

याबाबत बोलताना, मुंबईतील फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा म्हणाले की, "महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र हे राज्य देशातील सर्वात जास्त टॅक्स भरणारे राज्य आहे. महाराष्ट्र राज्य वर्षाला तब्बल 65 टक्के जीएसटी केंद्राला देत आहे. त्यामुळे मुंबई, किंबहुना देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी मुंबईतील व्यवसाय सुरु होणं गरजेचं आहे. सध्या मुंबईत सम आणि विषम तारखेचा निर्णय लागू करण्यात आला आहे. परंतु अडचण अशी आहे की, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे दुकानात येणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यात सम-विषमच्या नियमामुळे केवळ तीन दिवसच दुकानं सुरु असतात. यामुळे कामगारांना पगार देता येईल, इतकी देखील रक्कम जमा होतं नाही. मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी व्यवसाय सहा दिवस सुरु करण्याची परवानगी द्यावी. या मागणीसाठी आम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रव्यवहार केला आहे. अपेक्षा आहे लवकरच आमची मागणी मान्य होईल."

तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, "सध्या आम्ही तीन दिवसांचा नियम लागू केला आहे. जर सम विषमचा फॉर्म्युला यशस्वी झाल्याचं लक्षात आलं तर आम्ही लवकरच सात दिवस दुकानं सुरु करण्यासाठी परवानगी देऊ. सध्या आमची याबाबत चर्चा सुरु आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊ."

Mission Begin Again | मुंबईतील दुकानं सहा दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्या : व्यापारी

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
BMC : वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकारांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकारांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Embed widget