एक्स्प्लोर

सम-विषम तारखेच्या नियमाला मुंबईतील व्यापाऱ्यांचा विरोध, दुकानं सहा दिवस सुरु ठेवण्याची मागणी

मुंबई महापालिकेने लागू केलेल्या सम-विषय तारखेच्या नियमाला व्यावसायिकांनी विरोध केला आहे. परंतु ग्राहकांच्या अभावी व्यवसाय पूर्णपणे थंड असल्याने दुकानं सहा दिवस सुरु करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

मुंबई : मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक व्यवसायांना सुरु करण्यासाठी परवानगी दिली. परंतु व्यावसायिकांनी सम-विषय तारखेच्या नियमाला विरोध केला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे त्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. याचा फटका म्हणजे अनेक व्यवसाय पूर्णपणे थंड आहे. त्यातच तीन दिवसच दुकानं सुरु ठेवण्यामुळे काहीच व्यवसाय होत नाही. यावर उपाय म्हणून आम्हाला सहा दिवस व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी द्या, अशी मागणी सर्व व्यापाऱ्यांनी केली आहे.

मिशन बिगीन अगेनअंतर्गत सलून व्यवसाय, बाजार, देशांतर्गत विमानसेवा सुरु झाली. यासोबतच वेगवेगळी दुकानंही सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. या व्यवसायिकांना सम आणि विषम तारखेच्या नियमाचा निर्बंध घालण्यात आला होता. आता अनेक व्यवसायिकांनी मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या या नियमाचा विरोध केला आहे. यामध्ये झवेरी बाजारातील सोने चांदीचे व्यापारी, तसेच मुंबईतील फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने विरोध दर्शवला आहे. या संघटनेचे महाराष्ट्रात तब्बल साडेतीन लाख सदस्य आहेत.

सध्या मुंबईत कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीती आहे. त्यामुळे नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. याचा फटका म्हणजे सध्या अनेक व्यवसाय पूर्णपणे थंड असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातच तीन दिवसच दुकानं सुरु ठेवण्यामुळे काहीच व्यवसाय होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यावर उपाय म्हणून आम्हाला सहा दिवस व्यवसाय सुरु ठेवण्याची मागणी सर्व व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. सध्या देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जरी वाढत असला तरीही दुसरीकडे विचार केला तर महाराष्ट्राला आणि देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी व्यवसाय सुरु करणं गरजेचं असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

याबाबत बोलताना, मुंबईतील फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा म्हणाले की, "महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र हे राज्य देशातील सर्वात जास्त टॅक्स भरणारे राज्य आहे. महाराष्ट्र राज्य वर्षाला तब्बल 65 टक्के जीएसटी केंद्राला देत आहे. त्यामुळे मुंबई, किंबहुना देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी मुंबईतील व्यवसाय सुरु होणं गरजेचं आहे. सध्या मुंबईत सम आणि विषम तारखेचा निर्णय लागू करण्यात आला आहे. परंतु अडचण अशी आहे की, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे दुकानात येणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यात सम-विषमच्या नियमामुळे केवळ तीन दिवसच दुकानं सुरु असतात. यामुळे कामगारांना पगार देता येईल, इतकी देखील रक्कम जमा होतं नाही. मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी व्यवसाय सहा दिवस सुरु करण्याची परवानगी द्यावी. या मागणीसाठी आम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रव्यवहार केला आहे. अपेक्षा आहे लवकरच आमची मागणी मान्य होईल."

तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, "सध्या आम्ही तीन दिवसांचा नियम लागू केला आहे. जर सम विषमचा फॉर्म्युला यशस्वी झाल्याचं लक्षात आलं तर आम्ही लवकरच सात दिवस दुकानं सुरु करण्यासाठी परवानगी देऊ. सध्या आमची याबाबत चर्चा सुरु आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊ."

Mission Begin Again | मुंबईतील दुकानं सहा दिवस सुरु ठेवण्याची परवानगी द्या : व्यापारी

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget