एक्स्प्लोर

'जस्टिस फॉर सुशांत'पासून 'जस्टिस फॉर कंगना'पर्यंत कसे आलो? उर्मिला मातोंडकरांचा सवाल

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीच्या मागे तीन-तीन केंद्रीय तपास यंत्रणा लावून, तासंतास तिची चौकशी केली गेली, यातून काहीतरी निघायला हवं होतं की नाही? असा सवाल उर्मिला यांनी उपस्थित केला.

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांनी कंगना रनौतने बॉलिवूडवर केलेल्या आरोपांबाबत सडेतोड उत्तर दिलं आहे. कंगनाचे बॉलिवूडमध्ये ज्या काही लोकांशी वाईट संबंध आहेत, ते चार-दहा लोक म्हणजे बॉलिवूड नाही. बॉलिवूड खुप मोठी, सतत मेहनत करणारी इंडस्ट्री आहे. मात्र काही लोकांमुळे संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करणे अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. ज्या इंडस्ट्रीने तुम्हाला घडवलं, त्याबद्दल असं बोलणे चुकीचं आहे, असं उर्मिला मांतोडकर यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

'जस्टिस फॉर सुशांत'पासून 'जस्टिस फॉर कंगना'पर्यंत कसे आलो याचा विचार सर्वसामान्यांनी करायला हवा. एक अभिनेता तडकाफडकी या जगातून निघूत जातो, मात्र त्याच्या मृत्यूचं आज भांडवलं केलं जात आहे. यामुळे सुशांतच्या कुटुंबियांना खरंच न्याय मिळतोय का? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीच्या मागे तीन-तीन केंद्रीय तपास यंत्रणा लावून, तासंतास तिची चौकशी केली गेली, यातून काहीतरी निघायला हवं होतं की नाही? असा सवाल उर्मिला यांनी उपस्थित केला.

कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा कशासाठी?

कंगनाच्या वाय प्लस दर्जाची सुरक्षेबाबतही उर्मिला यांनी प्रश्न उपस्थित केले. वाय प्लस सुरक्षेसाठी पैसे कोण देतं? तुमच्या आमच्यासारखा लोकांच्या टॅक्सच्या पैशातून कंगनाला ही वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली. मात्र ती कशासाठी दिली गेली, असा प्रश्न उर्मिला यांनी उपस्थित केला. माझ्याकडे ड्रग माफियांची नावं असून ती तपास यंत्रणेला द्यायची असल्याचं तिने म्हटलं होतं. मात्र आजच्या टेक्नोलॉजीच्या युगात मुंबईत न येता माहिती देणे सहज शक्य होतं. इंटरनेट, मेल, फोन सारखे पर्याय तिच्याकडे उपलब्ध होते. मग ती का आली? चिथवायला? असं उर्मिला यांनी म्हटलं.

कंगना सारखी भारतकन्या देशातील प्रत्येक भागात निर्माण झाली पाहिजे. ती केवळ मुंबईतच का आलीय? तिने आधी हिमाचल प्रदेशच्या लोकांकरीत काहीतरी करावं, असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईत कंगनाने सर्वकाही कमावलं. बॉलिवूडने कंगनाला भरभरुन दिलं, मात्र तरीही बॉलिवूडला नावं ठेवयची हे चुकीचं आहे, असं उर्मिला यांनी म्हटलं.

बॉलिवूडमधील नेपोटिझमबाबत बोलताना उर्मिला यांनी म्हटलं की, बॉलिवूडमध्ये नेपोटिझम नाही असं मी बोलणार नाही. मला देखील बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचे परिणाम भोगावा लागला. त्या काळात माझ्यावर अनेक प्रकारे टीका करण्यात आली. त्यात मराठी असल्यानेही अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या. विविध प्रकारच्या भूमिका केल्या अनेकांनी माझी कधी स्तुती केली नाही. मात्र बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी माझ्या कामाचं कौतुकही केलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok kharat: अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
Video: साताऱ्यात राजांना मारलं, दोन राजे मार खातात; सभागृहात अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचंलं, म्हणाले, कुठे गेले वाघ?
Video: साताऱ्यात राजांना मारलं, दोन राजे मार खातात; सभागृहात अनिल परबांनी शिवसेना नेत्यांना डिवचंलं, म्हणाले, कुठे गेले वाघ?
Eknath Shinde and Devendra Fadnavis: फडणवीसांनी शिवसेना आमदारांच्या पायऱ्यांवरच्या आंदोलनाबाबत नाराजी बोलून दाखवली, एकनाथ शिंदेंचा तात्काळ प्रतिसवाल, म्हणाले, 'साताऱ्यात जयकुमार गोरे वागले ते योग्य होतं का?'
फडणवीसांनी नाराजी बोलून दाखवताच एकनाथ शिंदेंचा तत्क्षणी प्रतिसवाल, म्हणाले, 'साताऱ्यात गोरे जे वागले ते...'

व्हिडीओ

Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
Ashok kharat: अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
शेपूट घातली, चिरडून मारताहेत, भाजपचं नाव घ्यायला घाबरता, मंत्री मार खाताहेत म्हणत अनिल परबांनी शिंदे सेनेच्या सातारच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं; उदय सामंत, शंभूराज देसाई जागेवर भडकले अन् म्हणाले..
शेपूट घातली, चिरडून मारताहेत, भाजपचं नाव घ्यायला घाबरता, मंत्री मार खाताहेत म्हणत अनिल परबांनी शिंदे सेनेच्या सातारच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं; उदय सामंत, शंभूराज देसाई जागेवर भडकले अन् म्हणाले..
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ओबीसी नाहीत, बोगस प्रमाणपत्र मिळवलं; शशिकांत शिंदेंचा गंभीर आरोप
Renu Desai on Dhurandhar 2: 'मोदीजींची अंधभक्त असल्याचा अभिमान...'; उपमुख्यमंत्र्यांच्या Ex पत्नीची पोस्ट, 'धुरंधर 2'ची क्लिप शेअर करत म्हणाली...
'मोदीजींची अंधभक्त असल्याचा अभिमान...'; उपमुख्यमंत्र्यांच्या Ex पत्नीची पोस्ट, 'धुरंधर 2'ची क्लिप शेअर करत म्हणाली...
सभापती राम शिंदे नीलम गोऱ्हेंचा निर्णय फिरवणार? साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या निर्णयावरुन वातावरण तापलं
सभापती राम शिंदे नीलम गोऱ्हेंचा निर्णय फिरवणार? साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या निर्णयावरुन वातावरण तापलं
Raj Thackeray:
"कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?" 'अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेव्हा खरंच...' राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Satara ZP Election : मोठी बातमी : कथित अपहरण झालेला सदस्य सातारा पोलिसात दाखल, बापू शिंदेंच्या एन्ट्रीने ZP निवडणुकीचं गणित बदलणार?
मोठी बातमी : कथित अपहरण झालेला सदस्य सातारा पोलिसात दाखल, बापू शिंदेंच्या एन्ट्रीने ZP निवडणुकीचं गणित बदलणार?
Embed widget