एक्स्प्लोर

चाळीत राहणाऱ्या मुलाला गृहनिर्माण मंत्री केलं, हे फक्त शरद पवारच करू शकतात : जितेंद्र आव्हाड

पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी जितेंद्र आव्हाड यांचं नाव समोर येत असून जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यास येथील भौगोलिक आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जोरावर या जिल्ह्याचा कायापालट करेन असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

पालघर : लहानपणी चाळीत राहणाऱ्या मुलाला चाळींचा विकास करण्याचं मंत्रीपद पद मिळालं आहे. त्यामुळे या सगळ्या चाळींचा कायापालट करणार असल्याचा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांच्याइतका सामाजिक भान असलेला नेता दुसरा महाराष्ट्रात आहे असं मला वाटत नाही, असं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या चाळीतल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी जितेंद्र आव्हाड यांचं नाव समोर येत असून जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यास येथील भौगोलिक आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जोरावर या जिल्ह्याचा कायापालट करेन असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतेच गृहनिर्माण खात मिळालेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तलासरी राष्ट्रवादीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी आव्हाड यांनी विष्णू सवरांसह माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. चाळीत राहणाऱ्या मुलाला गृहनिर्माण मंत्री केलं हे फक्त शरद पवारच करू शकता असे म्हणत पवार यांच्या माध्यमातून नियतीने मला ही संधी दिली त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आव्हाड म्हणाले की, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीकडे असेल असे संकेत दिले. त्यामुळे माजी पालकमंत्री सवरा जिल्ह्यातील गावात मागील पाच वर्षात जितके फिरले नाहीत त्यापेक्षा जास्त गावं आपण फिरून दाखवू असं आश्वासन देत पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता आली तर अधिकचा निधी आणून विकास करू असे सांगितले. यावेळी माजी मुख्यमंत्री फडणवीस आज जिल्ह्यात फिरतात त्यापेक्षा मागील पाच वर्षे आढावा घेतला असता तर भलं झालं असतं असं ते म्हणाले. 72 टक्के निधी परत पाठवणार हा कर्तृत्ववान मंत्री कोण? त्यांचा सत्कार देखील व्हायला हवा असे विष्णू सवरा यांचं नाव न घेता टोला हाणला. सवरा यांच्या घरासमोरील रस्ता देखील आपण त्यांचा सोयी करीता करू अशी टीका आव्हाड यांनी केली. पूर्वीच्या मंत्र्यांनी काही केलं नाही म्हणून पालकमंत्री म्हणून मला संधी मिळाली तर सागरी, नागरी, डोंगरी असा निसर्गाने वरदान दिलेल्या प्रदेशाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले. प्रदूषणमुक्त प्रदेश असल्याने मेडिकल हब म्हणून ही विकास साधता येईल का यासाठी प्रयत्न करून पर्यटनातून आदिवासींचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मी स्वतः ह्या भागात विकासासाठी काम करणार असून मी पवार साहेबांच्या व्यतिरिक्त कुणाचंही ऐकत नाही किंवा कुणाच्या दबावात येत नाही, असंही ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget