एक्स्प्लोर

Majha Maharashtra Majha Vision | सत्ता गेल्याने विरोधकांचं व्हिजन धूसर झालंय, आमचं व्हिजन साफ : आदित्य ठाकरे

विरोधकांनी केंद्र सरकारला विचारलं पाहिजे आमच्या राज्याचे जीएसटीचे पैसे कधी मिळणार. देशात अनेक मोठ्या घडामोडी होत आहे. मात्र विरोधक लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

Majha Maharashtra Majha Vision |  मेट्रो कारशेड ही जागा जंगलाचा भाग आहे. मुंबईतून वाहणारी मिठी नदी आरेमधून वाहते. आरेमध्ये विकामकामं करुन आपण मीठी नदीचा प्रवाह बंद करतोय. त्यामुळे आरेमध्ये विकामकामं करुन आपण पर्यावरणाची हानी केली असती. कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड गेल्याने नागरिकांचा फायदाच होईल. मेट्रोचं जाळं जोडण्यासाठी कांजूरमार्गच्या जागेचा महत्त्वाची आहे. तसेच हजारो कोटी रुपये देखील सरकारचे वाचणार आहेत. चांगली कामं केली तर विरोधकांच्या पोटात का दुखतं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. आदित्या ठाकरेंच्या हट्टामुळे हा निर्णय घेण्यात आला या विरोधकांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, जनतेच्या हितासाठी मी असे हट्ट करत राहणार. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते.

समझने वालो को इशारा काफी है

विरोधक ठाकरे कुटुंबियांवर सातत्याने आरोप करत आहेत. याशिवाय शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत विचारलं असता, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. 'समझने वालो को इशारा काफी है' असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. विरोधकांनी केंद्र सरकारला विचारलं पाहिजे आमच्या राज्याचे जीएसटीचे पैसे कधी मिळणार. देशात अनेक मोठ्या घडामोडी होत आहे. मात्र विरोधक लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

विरोधकांच्या डोक्यात सतत सरकार अस्थिर करण्याचा विचार

विरोधकांचं व्हिजन सरकार गेल्याने धूसर झालं आहे. आमचं व्हिजन साफ आहे. आम्ही लोकांची सेवा करणार, जनहिताची कामं करणार, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. विरोधकांच्या डोक्यात सतत सरकार अस्थिर करण्याचा विचार असतो. सतत निवडणूक लागावी असा त्यांचा विचार आहे. सरकारवर आरोप करुन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र लोकांचा विश्वास महाराष्ट्र सरकारवर वाढत आहे, हे विरोधकांनी पाहिलं पाहिजे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणं हे माझं काम नाही. लोकांना मदत करणे, त्यांच्या हिताची कामं करणे ही माझी जबाबदारी आहे, असं ते म्हणाले.

डोंबिवलीच्या प्रदूषणावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, डोंबिवली माझं आवडतं शहर आहे. सत्तांतर झाल्यानंतर डोंबिवलीचे रस्ते आम्ही सुधारण्यास सुरुवात करत इतर विकासकामंही हाती घेतली आहेत. डोंबिंवली किंवा इतर काही शहरांमधील प्रदूषणांचा विषय आम्ही हाती घेतला आहे. येत्या दोन-तीन वर्षात कायदेशीररित्या पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या कंपन्या शहराबाहेर नेण्याबाबत विचार केला जाईल, असंही त्यांनी आश्वासन दिलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG Semi Final Turning Point : एक झेल अन् ते 2 षटके... इंग्लंडचा पराभव तिथेच ठरला! सेमीफायलनचा टर्निंग पॉइंट कोणता?, पाहा Video
एक झेल अन् ते 2 षटके... इंग्लंडचा पराभव तिथेच ठरला! सेमीफायलनचा टर्निंग पॉइंट कोणता?, पाहा Video
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget