एक्स्प्लोर

Majha Maharashtra Majha Vision | सत्ता गेल्याने विरोधकांचं व्हिजन धूसर झालंय, आमचं व्हिजन साफ : आदित्य ठाकरे

विरोधकांनी केंद्र सरकारला विचारलं पाहिजे आमच्या राज्याचे जीएसटीचे पैसे कधी मिळणार. देशात अनेक मोठ्या घडामोडी होत आहे. मात्र विरोधक लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

Majha Maharashtra Majha Vision |  मेट्रो कारशेड ही जागा जंगलाचा भाग आहे. मुंबईतून वाहणारी मिठी नदी आरेमधून वाहते. आरेमध्ये विकामकामं करुन आपण मीठी नदीचा प्रवाह बंद करतोय. त्यामुळे आरेमध्ये विकामकामं करुन आपण पर्यावरणाची हानी केली असती. कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड गेल्याने नागरिकांचा फायदाच होईल. मेट्रोचं जाळं जोडण्यासाठी कांजूरमार्गच्या जागेचा महत्त्वाची आहे. तसेच हजारो कोटी रुपये देखील सरकारचे वाचणार आहेत. चांगली कामं केली तर विरोधकांच्या पोटात का दुखतं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. आदित्या ठाकरेंच्या हट्टामुळे हा निर्णय घेण्यात आला या विरोधकांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, जनतेच्या हितासाठी मी असे हट्ट करत राहणार. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते.

समझने वालो को इशारा काफी है

विरोधक ठाकरे कुटुंबियांवर सातत्याने आरोप करत आहेत. याशिवाय शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईबाबत विचारलं असता, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. 'समझने वालो को इशारा काफी है' असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. विरोधकांनी केंद्र सरकारला विचारलं पाहिजे आमच्या राज्याचे जीएसटीचे पैसे कधी मिळणार. देशात अनेक मोठ्या घडामोडी होत आहे. मात्र विरोधक लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

विरोधकांच्या डोक्यात सतत सरकार अस्थिर करण्याचा विचार

विरोधकांचं व्हिजन सरकार गेल्याने धूसर झालं आहे. आमचं व्हिजन साफ आहे. आम्ही लोकांची सेवा करणार, जनहिताची कामं करणार, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. विरोधकांच्या डोक्यात सतत सरकार अस्थिर करण्याचा विचार असतो. सतत निवडणूक लागावी असा त्यांचा विचार आहे. सरकारवर आरोप करुन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र लोकांचा विश्वास महाराष्ट्र सरकारवर वाढत आहे, हे विरोधकांनी पाहिलं पाहिजे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणं हे माझं काम नाही. लोकांना मदत करणे, त्यांच्या हिताची कामं करणे ही माझी जबाबदारी आहे, असं ते म्हणाले.

डोंबिवलीच्या प्रदूषणावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, डोंबिवली माझं आवडतं शहर आहे. सत्तांतर झाल्यानंतर डोंबिवलीचे रस्ते आम्ही सुधारण्यास सुरुवात करत इतर विकासकामंही हाती घेतली आहेत. डोंबिंवली किंवा इतर काही शहरांमधील प्रदूषणांचा विषय आम्ही हाती घेतला आहे. येत्या दोन-तीन वर्षात कायदेशीररित्या पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या कंपन्या शहराबाहेर नेण्याबाबत विचार केला जाईल, असंही त्यांनी आश्वासन दिलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Guardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोपABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaSaif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलंBaburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Embed widget