एक्स्प्लोर

पुण्यात आयटी इंजिनिअर्सच्या आत्महत्या का वाढल्या आहेत?

पुणे: पुण्यात सध्या आयटी इंजिनिअरच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. आज एकाच दिवशी दोन  इंजिनिअर्सनी आत्महत्या केल्या. निनाद पाटील या इंजिनिअरने पिंपरी चिंचवडच्या रहाटणीमधील वर्धमान सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून, आयुष्य संपवलं. निनाद इन्फोसिस कंपनीत काम करत होता. त्याशिवाय पुण्याच्या कोंढव्यात बंगळुरूहून भेटायला आलेल्या महिला अभियंतेने प्रियकराने भेट न दिल्याने, इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. यापूर्वी इंजिनिअर्सच्या आत्महत्या 2 एप्रिल 2017 - जीशन शेख, पिंपळे गुरवमध्ये राहणाऱ्या या अभियंत्याने 11व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. 17 मार्च 2017 - दिघी येथील राजू तिवारी या अभियंत्याने पत्नीसह विष प्राशन करून आत्महत्या केली. 3 फेब्रुवारी 2017 - अभिषेक यादव, हिंजवडीतील या अभियंत्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. अभियंत्यांच्या एकापाठोपाठ होणाऱ्या या आत्महत्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ माजवत आहेत. आत्महत्यांमागे कंपनीतील ताण-तणाव, नैराश्य, धकाधकीची जीवनशैली आणि व्यसनाधीनता याला कारणीभूत ठरत आहे. 2000 साली भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने धूम माजवायला सुरुवात केली. या क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. अगदी काही वर्षाचा अनुभव कर्मचाऱ्यांना सहा आकड्यांच्या घरात पगारा मिळवून देऊ लागला. यामुळं बांधकाम व्यवसायदेखील तेजीत चालू लागला. परिणामी अर्थ व्यवस्थेला मोठी गती मिळाली. एकीकडं अर्थव्यवस्थेला ही गती मिळत असताना यात अनेक अडथळे निर्माण होऊ लागले. याची सुरुवात 2009 च्या आर्थिक मंदीपासून सुरु झाली, ती आजही या ना त्या कारणाने प्रकर्षाने दिसून येते. केवळ महाराष्ट्राचाच विचार केला तर प्रत्येक वर्षी इंजिनिअरिंगचे दीड लाख विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. सध्याची परिस्थिती पाहता 50 हजार हून अधिक जागा या रिक्त आहेत. तर जे शिक्षण घेऊन नोकऱ्या करत आहेत त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. त्याला भारतातील कंपन्यांची धोरणं जशी कारणीभूत आहेत तशीच परदेशात घडणाऱ्या घडामोडीही कारणीभूत ठरत आहेत. भारतातील ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. कंपन्यांच्या धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होणारे ताणतणाव आणि नैराश्य यातून या घटना घडत आहेत. ही परिस्थिती निवळायची असेल तर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करणं गरजेचं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवेंना पाठिंबा; उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची 'ती' अट केली मान्य
विधान परिषदेच्या निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवेंना पाठिंबा; उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची 'ती' अट केली मान्य
Priyanka Chaturvedi : 'आज पुन्हा एकदा...', उद्धव ठाकरेंनी स्वतः उमेदवारी टाळत अंबादास दानवेंना संधी; प्रियंका चतुर्वेदींच्या पोस्टने वेधलं लक्ष
'आज पुन्हा एकदा...', उद्धव ठाकरेंनी स्वतः उमेदवारी टाळत अंबादास दानवेंना संधी; प्रियंका चतुर्वेदींच्या पोस्टने वेधलं लक्ष
Eknath Shinde On Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेतूनच नावाला विरोध, तरीही विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हेंना उमेदवारी; एकनाथ शिंदे म्हणाले, मालकांचा...
शिवसेनेतूनच नावाला विरोध, तरीही विधान परिषदेसाठी नीलम गोऱ्हेंना उमेदवारी; एकनाथ शिंदे म्हणाले, मालकांचा...

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
Donald Trump: 'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Embed widget