एक्स्प्लोर

पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट : बच्चू कडू

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या महाविकासआघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेसाठी तीन पक्ष एकत्र येणार असले तर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांनी शरद पवारांबाबत यांनी एकप्रकारे अविश्वास व्यक्त केला आहे.

मुंबई : "सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट आहे. फक्त शपथविधी होत नाही, तोपर्यंत आमच्या डोक्यात शरद पवारांची भीती आहे. शरद पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट आहे," असं वक्तव्य प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजपकडून निमंत्रण आल्याचा दावाही त्यांनी केला. बच्चू कडू एबीपी माझाशी बोलत होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या महाविकासआघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेसाठी तीन पक्ष एकत्र येणार असले तर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांनी शरद पवारांबाबत यांनी एकप्रकारे अविश्वास व्यक्त केला आहे. पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट बच्चू कडू म्हणाले की, "सत्ता स्थापनेचं चित्र जवळपास स्पष्ट आहे. फक्त बऱ्याच लोकांच्या डोक्यांवर शरद पवारांची भीती आहे. जोपर्यंत शपथविधी होत नाही, तोपर्यंत आमच्याही डोक्यात भीती आहे. शरद पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट आहे." सत्ता कशी स्थापन करणार हे शिवसेना-भाजपला विचारा असं वक्तव्य करुन शरद पवारांनी यांनी गुगली टाकली होती. त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपकडून आमंत्रण आलं होतं राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर भाजपकडून निमंत्रण आल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. माझे मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केला. पण मी उद्धव ठाकरे यांना शब्द दिला होता, त्यामुळे त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. मातोश्रीवर, मंदिरात शब्द दिला आहे, त्यामुळे खाली पडू देणार नाही," असंही ते म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी नव्हती सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची मानसिकता नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "सुरुवातीला हेच गृहीत धरलं होतं की, शिवसेना-भाजपची सत्ता येईल. त्यादृष्टीने पाठिंबा दिला होता. कालांतराने राजकारण बदललं, त्यामुळे हा बदल स्वीकारावा लागला. हे राजकारण आहे, इथे काहीही होऊ शकते. सुरुवातीला मानसिकता नव्हती. पण जे काही होत आहे, ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी होत असेल हाच विचार करुन पुढे जायचं." उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंदच मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. याविषयी विचारलं असता बच्चू कडू यांनी सांगितलं की, "कोण मुख्यमंत्री होणार, यापेक्षा कोणासाठी मुख्यमंत्री होणार हे पाहायचं आहे. कोणता पक्ष पाहून प्रहार होणार नाही तर शेतकऱ्यांच्या बाजूने होणार. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल."
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: डोनाल्ड ट्रम्प थोड्याच वेळात अमेरिकेला संबोधित करणार
Live Blog Updates: डोनाल्ड ट्रम्प थोड्याच वेळात अमेरिकेला संबोधित करणार
Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
Konkan Railway ratnagiri diva passenger: रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार
Sushma Andhare: अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स
अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Embed widget