एक्स्प्लोर

पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट : बच्चू कडू

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या महाविकासआघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेसाठी तीन पक्ष एकत्र येणार असले तर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांनी शरद पवारांबाबत यांनी एकप्रकारे अविश्वास व्यक्त केला आहे.

मुंबई : "सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट आहे. फक्त शपथविधी होत नाही, तोपर्यंत आमच्या डोक्यात शरद पवारांची भीती आहे. शरद पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट आहे," असं वक्तव्य प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजपकडून निमंत्रण आल्याचा दावाही त्यांनी केला. बच्चू कडू एबीपी माझाशी बोलत होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या महाविकासआघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेसाठी तीन पक्ष एकत्र येणार असले तर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांनी शरद पवारांबाबत यांनी एकप्रकारे अविश्वास व्यक्त केला आहे. पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट बच्चू कडू म्हणाले की, "सत्ता स्थापनेचं चित्र जवळपास स्पष्ट आहे. फक्त बऱ्याच लोकांच्या डोक्यांवर शरद पवारांची भीती आहे. जोपर्यंत शपथविधी होत नाही, तोपर्यंत आमच्याही डोक्यात भीती आहे. शरद पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट आहे." सत्ता कशी स्थापन करणार हे शिवसेना-भाजपला विचारा असं वक्तव्य करुन शरद पवारांनी यांनी गुगली टाकली होती. त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपकडून आमंत्रण आलं होतं राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर भाजपकडून निमंत्रण आल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. माझे मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केला. पण मी उद्धव ठाकरे यांना शब्द दिला होता, त्यामुळे त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. मातोश्रीवर, मंदिरात शब्द दिला आहे, त्यामुळे खाली पडू देणार नाही," असंही ते म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी नव्हती सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची मानसिकता नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "सुरुवातीला हेच गृहीत धरलं होतं की, शिवसेना-भाजपची सत्ता येईल. त्यादृष्टीने पाठिंबा दिला होता. कालांतराने राजकारण बदललं, त्यामुळे हा बदल स्वीकारावा लागला. हे राजकारण आहे, इथे काहीही होऊ शकते. सुरुवातीला मानसिकता नव्हती. पण जे काही होत आहे, ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी होत असेल हाच विचार करुन पुढे जायचं." उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंदच मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. याविषयी विचारलं असता बच्चू कडू यांनी सांगितलं की, "कोण मुख्यमंत्री होणार, यापेक्षा कोणासाठी मुख्यमंत्री होणार हे पाहायचं आहे. कोणता पक्ष पाहून प्रहार होणार नाही तर शेतकऱ्यांच्या बाजूने होणार. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल."
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा
कोळगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडा, अन्यथा पालकमंत्र्यांना फिरु देणार नाही, माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक, तहसीलवर भव्य मोर्चा

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget