एक्स्प्लोर

पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट : बच्चू कडू

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या महाविकासआघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेसाठी तीन पक्ष एकत्र येणार असले तर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांनी शरद पवारांबाबत यांनी एकप्रकारे अविश्वास व्यक्त केला आहे.

मुंबई : "सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट आहे. फक्त शपथविधी होत नाही, तोपर्यंत आमच्या डोक्यात शरद पवारांची भीती आहे. शरद पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट आहे," असं वक्तव्य प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजपकडून निमंत्रण आल्याचा दावाही त्यांनी केला. बच्चू कडू एबीपी माझाशी बोलत होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या महाविकासआघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेसाठी तीन पक्ष एकत्र येणार असले तर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांनी शरद पवारांबाबत यांनी एकप्रकारे अविश्वास व्यक्त केला आहे. पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट बच्चू कडू म्हणाले की, "सत्ता स्थापनेचं चित्र जवळपास स्पष्ट आहे. फक्त बऱ्याच लोकांच्या डोक्यांवर शरद पवारांची भीती आहे. जोपर्यंत शपथविधी होत नाही, तोपर्यंत आमच्याही डोक्यात भीती आहे. शरद पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट आहे." सत्ता कशी स्थापन करणार हे शिवसेना-भाजपला विचारा असं वक्तव्य करुन शरद पवारांनी यांनी गुगली टाकली होती. त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपकडून आमंत्रण आलं होतं राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर भाजपकडून निमंत्रण आल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. माझे मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केला. पण मी उद्धव ठाकरे यांना शब्द दिला होता, त्यामुळे त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. मातोश्रीवर, मंदिरात शब्द दिला आहे, त्यामुळे खाली पडू देणार नाही," असंही ते म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी नव्हती सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची मानसिकता नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "सुरुवातीला हेच गृहीत धरलं होतं की, शिवसेना-भाजपची सत्ता येईल. त्यादृष्टीने पाठिंबा दिला होता. कालांतराने राजकारण बदललं, त्यामुळे हा बदल स्वीकारावा लागला. हे राजकारण आहे, इथे काहीही होऊ शकते. सुरुवातीला मानसिकता नव्हती. पण जे काही होत आहे, ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी होत असेल हाच विचार करुन पुढे जायचं." उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंदच मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. याविषयी विचारलं असता बच्चू कडू यांनी सांगितलं की, "कोण मुख्यमंत्री होणार, यापेक्षा कोणासाठी मुख्यमंत्री होणार हे पाहायचं आहे. कोणता पक्ष पाहून प्रहार होणार नाही तर शेतकऱ्यांच्या बाजूने होणार. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल."
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2026 | शुक्रवार
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
Pimpri-Pune Liquor Poisoning: योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Pimpri-Pune Liquor Poisoning: योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
Embed widget