एक्स्प्लोर

पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट : बच्चू कडू

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या महाविकासआघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेसाठी तीन पक्ष एकत्र येणार असले तर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांनी शरद पवारांबाबत यांनी एकप्रकारे अविश्वास व्यक्त केला आहे.

मुंबई : "सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट आहे. फक्त शपथविधी होत नाही, तोपर्यंत आमच्या डोक्यात शरद पवारांची भीती आहे. शरद पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट आहे," असं वक्तव्य प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजपकडून निमंत्रण आल्याचा दावाही त्यांनी केला. बच्चू कडू एबीपी माझाशी बोलत होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या महाविकासआघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेसाठी तीन पक्ष एकत्र येणार असले तर शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांनी शरद पवारांबाबत यांनी एकप्रकारे अविश्वास व्यक्त केला आहे. पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट बच्चू कडू म्हणाले की, "सत्ता स्थापनेचं चित्र जवळपास स्पष्ट आहे. फक्त बऱ्याच लोकांच्या डोक्यांवर शरद पवारांची भीती आहे. जोपर्यंत शपथविधी होत नाही, तोपर्यंत आमच्याही डोक्यात भीती आहे. शरद पवार काय करतील हे अजितदादांना समजलं नाही मला तर दूरची गोष्ट आहे." सत्ता कशी स्थापन करणार हे शिवसेना-भाजपला विचारा असं वक्तव्य करुन शरद पवारांनी यांनी गुगली टाकली होती. त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपकडून आमंत्रण आलं होतं राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर भाजपकडून निमंत्रण आल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. माझे मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केला. पण मी उद्धव ठाकरे यांना शब्द दिला होता, त्यामुळे त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. मातोश्रीवर, मंदिरात शब्द दिला आहे, त्यामुळे खाली पडू देणार नाही," असंही ते म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची तयारी नव्हती सुरुवातीला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची मानसिकता नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "सुरुवातीला हेच गृहीत धरलं होतं की, शिवसेना-भाजपची सत्ता येईल. त्यादृष्टीने पाठिंबा दिला होता. कालांतराने राजकारण बदललं, त्यामुळे हा बदल स्वीकारावा लागला. हे राजकारण आहे, इथे काहीही होऊ शकते. सुरुवातीला मानसिकता नव्हती. पण जे काही होत आहे, ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी होत असेल हाच विचार करुन पुढे जायचं." उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंदच मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत. याविषयी विचारलं असता बच्चू कडू यांनी सांगितलं की, "कोण मुख्यमंत्री होणार, यापेक्षा कोणासाठी मुख्यमंत्री होणार हे पाहायचं आहे. कोणता पक्ष पाहून प्रहार होणार नाही तर शेतकऱ्यांच्या बाजूने होणार. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल."

महत्त्वाच्या बातम्या

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget