एक्स्प्लोर

लातूरमध्ये गणेश विसर्जनाला दुष्काळाचा फटका, गणेशमूर्ती विसर्जित न करता दान करण्याचा मंडळांचा निर्णय

गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जित न करता दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या गणेशमूर्ती त्याच बरोबर मानाच्या गणेशमूर्ती या लातूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात ठेवण्यात येणार आहेत.

लातूर : जिल्ह्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाण्याची प्रचंड टंचाई आहे. जिल्ह्यातील सर्व नदी नाले आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन कुठे करावे असा जटिल प्रश्न आहे. याबाबत आज लातूर शहरात शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीला लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांच्यासह शहरातील अनेक गणेशमंडळाचे पदाधिकारी हजर होते. या सर्वांसमोर एकच प्रश्न होता कि यावर्षी गणेश विसर्जन कुठे आणि कसे करावे? यावर तोडगा काढत मोठ्या गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जित न करता दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोठ्या गणेशमूर्ती त्याच बरोबर मानाच्या गणेशमूर्ती या लातूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात ठेवण्यात येणार आहेत. पाणी टंचाईमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला गणेश मंडळांनी सहकार्य करावे आणि त्याच जोशात सण साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशमूर्ती विसर्जनाऐवजी हे आहेत उपाय सुचवण्यात आले आहेत :
  • गणेशमूर्ती मंदिरात ठेवणे
  • गणेशमूर्ती दान करणे
  • मंडळाकडे जागा असल्यास जतन करून ठवणे
  • घरगुती गणेशमूर्ती घरातच पाण्यात विसर्जन करणे
प्रशासनाने शहरात पाच ठिकाणी मूर्ती दान करण्यासाठी ठिकाणं निश्चित केली आहेत. याच ठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती आणून देण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे. शहरातील गणेश मंडळांनी काय घेतला निर्णय ? शहरात एकूण 317 मोठी गणेश मंडळं आहेत. यापैकी 59 मंडळांनी एकवर्ष मूर्ती जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 मंडळांनी मूर्तिकारास गणेशमूर्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. 207 गणेश मंडळं प्रशासनास मूर्ती दान करणार आहेत. तर 39 गणेश मंडळांनी जिल्ह्याबाहेर मूर्ती विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर शहरातील सर्व गणपती मंडळांनी प्रशासनास सहकार्य करून एकमुखाने ज्या उपाय योजना ठरवल्या आहेत त्यावर अंलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी देखील त्यांच्या गणपतीचे घरातच विसर्जन करणार असल्याचे सांगितले आहे. मागील पंचवीस वर्षापासून असलेल्या लातूरचा राजा गणपती मंडळाने या वर्षी गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. कायमच भव्य मूर्ती असलेले हे मंडळ आहे. मात्र पाण्याच्या अभावामुळे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाबरोबर आम्ही आहोत. - शाम जाधव (अध्यक्ष, लातूरचा राजा गणेश मंडळ) मागील अठरा वर्षापासून औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाने फायबरची मूर्ती स्थापन केली आहे. त्यावेळपासून आम्ही दरवर्षी एक ते सव्वा फुटाच्या विसर्जनासाठीच्या मूर्तीची स्थापना करत आलो आहोत. अश्याच प्रकारे इतरही गणेश मंडळाने केल्यास भविष्यात अशी समस्या उद्भावणार नाही, असे मत मंडळाचे मार्गदर्शक नागेश कानडे यांनी व्यक्त केले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
राज्यात उन्हाचा चटका कायम, तापमानाचा पारा 45 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
राज्यात उन्हाचा चटका कायम, तापमानाचा पारा 45 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2026 | सोमवार

व्हिडीओ

PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
Embed widget