एक्स्प्लोर

दारुबंदीसाठी वडगाव सिद्देश्वरमध्ये विराट मोर्चा, आक्रमक महिलांकडून दारुचे अड्डे उद्धवस्त

वारंवार तक्रार करुनही पोलिस प्रशासन किंवा ग्रामपंचायत काहीही कारवाई करत नव्हती त्यानंतर महिलांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतला. विराट मोर्चा काढून दारुचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव सिद्धेश्वरमध्ये दारुबंदीसाठी विराट मोर्चा काढण्यात आला. वारंवार तक्रार करुनही पोलिस प्रशासन किंवा ग्रामपंचायत काहीही कारवाई करत नव्हतं. त्यामुळं महिलांनी स्वत: दारु विक्रेत्यांना दारु बंद करण्यासाठी बजावलं. पण दारु विक्रेत्यांकडून महिलांना उद्धट उत्तरं मिळाली. त्यानंतर आक्रमक झालेल्या महिलांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतला. विराट मोर्चा काढून दारुचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. अवैध दारूबंदीसाठी पुढे येवून गावातील महिलांनी मोर्चा काढला पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत काहीही कारवाई करत नाही याचा पहिला राग होता. सरपंच अंकिता अंकुश मोरे यांना आज निवेदन दिले तसेच या आशयाचे निवेदन उस्मानाबाद पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनाही देण्यात आले. गावातील महिलांनी दारूबंदीसाठी एकजूट होऊन दारूबंदीसाठी ग्रामपंचायत धडक मोर्चा काढला. अवैध दारूविक्री करणाऱ्या व्यक्तीची भेटी घेऊन दारू विक्री न करण्याबाबत समज दिली. त्यावेळी दारू विक्रेत्यांनी गावातील महिलांशी अरेरावी उद्धटपणे बोलल्यामुळे दारूबंदीसाठी पुढाकार घेतल्याने अवैध धंदे करणारे धमकावून अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्या ठिकाणाची महिलांनी दारूची अड्डे उध्वस्त करून तोडफोड करून दारू जप्त करून विल्हेवाट केली. यामुळे गावामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. वडगाव सिद्धेश्वर आणि परिसरात अनधिकृत व बेकायदेशीर अवैध दारू विक्री वाढलेली आहे. यामुळे परिसरातील व गावातील कित्येक तरुण पिढी यामुळे व्यसनाधीन झालेली आहेत. परिसरातील उत्तमी कायापुर, पळसवाडी, वरवंठी आदी गावातील नागरिक वडगाव याठिकाणी दारू पिण्यासाठी येत आहेत. दारू पिल्यानंतर एकमेकांना शिव्या देणे,भांडण तंटा करणे आदी प्रकार सर्रास होऊ लागले आहेत. त्यामुळे परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांवर,महिलावर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे.तसेच या परिसरातील तरुण पिढी व्यसनाधीन झालेली आहे. तसेच या भागातील दारूविक्री ताबडतोब बंद करण्यात यावी तसेच भेसळयुक्त दारू विकणाऱ्यांवरही कारवाई व्हावी अशी मागणीही यावेळी महिलांनी निवेदनाद्वारे केली. सुट्टीच्या दिवशी शाळेच्या आवारात तसेच अंगणवाडीच्या आवारात लोक दारूपीत बसतात याचा त्रास मात्र दुसर्‍या दिवशी शाळकरी मुलांना होत असल्याचा आरोपही महिलांनी केला.यामुळे शाळेतील मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे तसेच महिलांचे संसारही उघड्यावर आलेले आहेत याचा बंदोबस्त पोलिस प्रशासनाने तत्काळ करावा अन्यथा या महिलांनी आत्मदहन करण्यासाठी यावेळी इशारा दिला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Embed widget