एक्स्प्लोर

कोल्हापूर, सांगलीतील पुराचा फटका शहरांना; मुंबई, ठाण्यातील दूध, भाजीपाला आवक घटली

सांगली आणि कोल्हापुरातील महापुराचा फटका आता मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहराला बसायला सुरुवात झाली आहे. शहरातील भाजीपाल्याची आवक घटली असून, दूध पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातली महापुराचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात येणाऱ्या भाजीपाला आणि दुधावर झाला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये भाजीपालाची आवक 200 गाड्यांनी घटली आहे. तर पुरामुळे दुधाचं संकलन थांबल्याने आणि महामार्गावर पाणी साचल्याने शहरातील दुधाचा पुरवठा घटला आहे. भाजीपाल्याची आवक घटली पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर नवी मुंबई, मुंबई, ठाण्यात भाजीपाल्याचा पुरवठा होतो. परंतु सांगली, कोल्हापूर, कर्नाटकमधील पुराचा फटका रस्ते वाहतुकीलाही बसला आहे. त्यामुळे कर्नाटक तसंच पश्चिम महाराष्ट्रातून कालपासून अतिशय कमी प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाली आहे. तसंच पावसामुळे भाजीपापाल पोहोचायला उशीर झाल्याने निम्मा भाजीपाला गाडीतच खराब झाला आहे. परिणामी भाजपाल्याच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढल्या आहेत. एपीएमसीमधील भाजीपाला दर - भाजी               प्रति किलो वांगी               35 ते 40 रुपये गवार              50 ते 60 रुपये वाटाणा           80 ते 90 रुपये टोमॅटो            40 ते 50 रुपये शेवगा शेंग      50 ते 60 रुपये काकडी          30 ते 35 रुपये फ्लॉवर           25 ते 30 रुपये गाजर             35 ते 40 रुपये कारली           35 ते 40 रुपये कोबी             25 ते 30 रुपये भाजी            प्रति जुडी कोथिंबीर      15 ते 20 रुपये मेथी             20 ते 25 रुपये पालक         20 ते 25 रुपये मुंबई, ठाणे, पनवेलमध्ये दुधाचा तुडवडा गोकुळ आणि वारणा, या दोन मोठ्या कंपन्यांचे दूधाचं उत्पादन आणि संकलन प्रामुख्याने सांगली, कोल्हापूर व सातारा या पट्ट्यातून होतं. मुंबईतून या कंपन्यांच्या दुधाची सर्वाधिक मागणी असते. एकट्या गोकुळकडून रोज साडे सात लाख लिटरचा पुरवठा मुंबईला होतो. तर वारणासह अन्य काही छोट्या कंपन्या जवळपास साडे सहा लाख लिटर दुधाचा मुंबईला पुरवठा करतात. मात्र या तिन्ही जिल्ह्यांतील जवळपास प्रत्येक गाव पुराच्या वेढ्यात आहे. त्यामुळे दुधाचं संकलन पूर्णपणे थांबलं आहे. कोल्हापूर-मुंबई महामार्गदेखील पाण्याखाली असल्याने संकलित झालेल्या दुधाचा या कंपन्या पुरवठा करु शकलेल्या नाहीत. अमूल, मदर्स डेअरी आणि महानंदा या तीन कंपन्यांचा जवळपास 20 लाख 70 हजार लिटर दुधाचा पुरवठा सुरळीत आहे. याशिवाय मुंबईतीलच अन्य छोट्या कंपन्या जवळपास 35 लाख लिटर दुधाचा पुरवठा करतात. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस ठाणे, मुंबई, पनवेल या परिसरात दुधाची टंचाई निर्माण होईल, अशी माहिती दूध कंपनीच्या व्यवस्थापनाने दिली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Embed widget