एक्स्प्लोर
Advertisement
10 वर्षांनंतर पहिल्यांदाच 49 दिवस उजनीचे दरवाजे खुले
यंदाच्या पावसामुळे धरणातून जेवढे पाणी सोडावे लागले आहे, त्या पाण्यात उजनी धरण दीड पट भरले असते.
बारामती : उजनी धरणाच्या निर्मितीनंतर अनेक पावसाळे व दुष्काळ उजनीने पाहिले आहेत. अनेक सुकाळ व दुष्काळ आले. अनेक वेळा उजनीच्या पाण्यावरुन जिल्ह्या-जिल्ह्यात वाद झाले. त्यामुळे उजनी धरण नेहमीच चर्चेत राहिले. पण यंदाच्या दमदार पावसामुळे मागील दहा वर्षाच्या इतिहासात उजनीने विक्रम केला आहे.
यंदाच्या दमदार पावसामुळे 49 दिवस उजनीचे दरवाजे उघडे ठेवावे लागले आहेत. 28 ऑगस्ट 2017 पासून ते (काही अपवाद वगळता) कालपर्यंत 23 ऑक्टोबर 2017 पर्यंत म्हणजेच 49 दिवस उजनीचे दरवाजे उघडे राहिले असून, यातून तब्बल 89.10 TMC पाणी सोडावे लागले आहे.
यंदाच्या पावसामुळे धरणातून जेवढे पाणी सोडावे लागले आहे, त्या पाण्यात उजनी धरण दीड पट भरले असते.
या अगोदर 2006-07 साली झालेल्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलेला होता, त्यावेळीही धरणातून तब्बल 300 TMC पाणी सोडावे लागले होते. त्यावेळीही 67 दिवस दरवाजे उघडे ठेवावे लागले होते.
उजनीच्या इतिहासात सर्वात निचांकी पातळी ही 2017-2015 ला झाली होती. त्यावेळी उजनीत वजा (मायनस) 53.74 % टक्के पाणी शिल्लक राहिले होते. सर्वात कमी म्हणजे निचांकी पातळी यावेळी उजनी धरणाची झाली होती.
आज उजनी धरणात 123.28 TMC पाणी असून उजनी 111.28 % टक्के भरले आहे. उजनीच्या या पाण्याचे योग्य नियोजन केले तर हे पाणी नक्कीच काही काळ टिकून राहिल आणि धरणावर अवलंबून असणारे शेतकरी वर्गासह अनेक पाणीवापर संस्था सुरळीत चालतील.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement