एक्स्प्लोर

Uddhav Thackeray In Marathwada: शेतकऱ्यांनो शेतकरी म्हणून एकवट व्हा, जोपर्यंत तुम्ही एकवटत नाही, तोपर्यंत कोणी न्याय देणार नाही; उद्धव ठाकरेंची बांधावरून आर्त साद

Uddhav Thackeray In Marathwada: जेव्हा आंदोलनासाठी हाक दिली जाईल, तेव्हा प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरा. हाच न्याय मिळवण्याचा एकमेव मार्ग असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray In Marathwada: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (5 नोव्हेंबर) मराठवाड्यातील दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला आणि शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन केले. “आडल्यानडल्या शेतकऱ्याला आता जर या संकटाच्या खाईतून बाहेर काढले नाही, तर तो पुन्हा उभा राहणार नाही,” असा इशारा देत उद्धव ठाकरेंनी सरकारवर थेट हल्लाबोल केला. ठाकरेंनी ठामपणे सांगितले की, “शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. जोपर्यंत शेतकरी म्हणून एकवटत नाही, तोपर्यंत कुणीही न्याय देणार नाही. शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून द्यावी, जर मातीला कोंब फोडता, तर सरकारच्याही अन्यायाविरोधात पाझर फोडू शकत नाही का?” अशी विचारणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, “जेव्हा आंदोलनासाठी हाक दिली जाईल, तेव्हा प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरा. हाच न्याय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे.”

मदत पॅकेज आणि पीक विम्यावर हल्लाबोल (Uddhav Thackeray on Farmer Help) 

“सरकारने जाहीर केलेलं पॅकेज अर्धवट आहे, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे,” असे उद्धव ठाकरेंनी संतप्तपणे म्हटले. “पीक विम्याचे पैसे मिळायला लागलेत, पण अकोल्यात 2 रुपये, 30 रुपये, तर पालघर आणि ठाण्यात 2 रुपये 30 पैसे इतकी रक्कम मिळतेय, ही थट्टा असल्याचे ते म्हणाले. “ज्याची जमीन खरडून गेली, तो शेतकरी कर्जापेक्षा आधी माती मागतोय. जर जूनमध्ये कर्जमाफी करणार असाल, तर आताचे हप्ते शेतकऱ्यांनी फेडायचे की नाही, हे स्पष्ट सांगावं,” अशी मागणी ठाकरेंनी केली. “दिवाळीच्या आत मदत मिळणार म्हणाले होते, पण दिवाळी गेली, तुळशीचं लग्नही झालं, तरी सरकार फक्त पंचांग आणि मुहूर्त बघतंय, मदत मात्र ठणठणाट!” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. कर्जमुक्तीबाबत ठाकरे यांनी सरकारच्या अभ्यास धोरणावर चांगलेच खडे बोल सुनावले. “कसला अभ्यास करता? मी मुख्यमंत्री असताना महात्मा फुले यांच्या नावाने शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती. तेव्हा कोणतीही समिती नव्हती, ती आमची जबाबदारी होती,” असं ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर थेट टीका (Uddhav Thackeray on Devendra Fadnavis

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “आज मी मराठवाड्यात फिरत आहे आणि मुख्यमंत्री कुठे आहेत? ते बिहारला आहेत,” असा प्रश्न त्यांनी केला. “मुख्यमंत्री तिकडे सांगतात की पंतप्रधानांना सगळ्या राज्यांवर प्रेम आहे, पण सगळ्यात जास्त प्रेम बिहारवर आहे. अशा पक्षाच्या हातात आपण आपला महाराष्ट्र दिला आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे,” अशी खोचक टीका त्यांनी केली.

जूनच्या मुदती’वर आणि केंद्रीय पथकावरही निशाणा (Uddhav Thackeray on Loan Waiver)

उद्धव ठाकरेंनी सरकारच्या ‘जूनच्या मुदती’वर आणि केंद्रीय पथकावरही निशाणा साधला. “जूनपर्यंतची मुदत ही केवळ नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी वेळकाढूपणा आहे. केंद्रीय पथक रात्री टॉर्च मारून पाहणी करतंय, अहवाल देईल, आणि निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान मोठं पॅकेज जाहीर करून कोपऱ्याला गूळ लावतील,” असा आरोप त्यांनी केला. “या सरकारमध्ये खोटं बोलणं आणि मत चोरी चालली आहे. खोट्या थापा मारून मतं चोरली जातायत, याद्यांमध्ये फेरफार करून मतांची चोरी केली जात आहे,” असा आरोप ठाकरे यांनी केला. अजित पवारांच्या विधानावरही त्यांनी जोरदार प्रहार केला. “अजित पवार बेधडक सांगतात, ‘आम्हाला जिंकायचं होतं म्हणून कर्जमाफी बोललो.’ हा अन्नदात्याचा अपमान आहे,” असं ठाकरे म्हणाले. “आमदारकीच्या निवडणुकीत आमचा पराभव बाहेरून 20,000 मतदार आणून केला गेला,” असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget