एक्स्प्लोर

Uddhav Thackeray In Marathwada: शेतकऱ्यांनो शेतकरी म्हणून एकवट व्हा, जोपर्यंत तुम्ही एकवटत नाही, तोपर्यंत कोणी न्याय देणार नाही; उद्धव ठाकरेंची बांधावरून आर्त साद

Uddhav Thackeray In Marathwada: जेव्हा आंदोलनासाठी हाक दिली जाईल, तेव्हा प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरा. हाच न्याय मिळवण्याचा एकमेव मार्ग असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray In Marathwada: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (5 नोव्हेंबर) मराठवाड्यातील दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला आणि शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन केले. “आडल्यानडल्या शेतकऱ्याला आता जर या संकटाच्या खाईतून बाहेर काढले नाही, तर तो पुन्हा उभा राहणार नाही,” असा इशारा देत उद्धव ठाकरेंनी सरकारवर थेट हल्लाबोल केला. ठाकरेंनी ठामपणे सांगितले की, “शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. जोपर्यंत शेतकरी म्हणून एकवटत नाही, तोपर्यंत कुणीही न्याय देणार नाही. शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून द्यावी, जर मातीला कोंब फोडता, तर सरकारच्याही अन्यायाविरोधात पाझर फोडू शकत नाही का?” अशी विचारणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, “जेव्हा आंदोलनासाठी हाक दिली जाईल, तेव्हा प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरा. हाच न्याय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे.”

मदत पॅकेज आणि पीक विम्यावर हल्लाबोल (Uddhav Thackeray on Farmer Help) 

“सरकारने जाहीर केलेलं पॅकेज अर्धवट आहे, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे,” असे उद्धव ठाकरेंनी संतप्तपणे म्हटले. “पीक विम्याचे पैसे मिळायला लागलेत, पण अकोल्यात 2 रुपये, 30 रुपये, तर पालघर आणि ठाण्यात 2 रुपये 30 पैसे इतकी रक्कम मिळतेय, ही थट्टा असल्याचे ते म्हणाले. “ज्याची जमीन खरडून गेली, तो शेतकरी कर्जापेक्षा आधी माती मागतोय. जर जूनमध्ये कर्जमाफी करणार असाल, तर आताचे हप्ते शेतकऱ्यांनी फेडायचे की नाही, हे स्पष्ट सांगावं,” अशी मागणी ठाकरेंनी केली. “दिवाळीच्या आत मदत मिळणार म्हणाले होते, पण दिवाळी गेली, तुळशीचं लग्नही झालं, तरी सरकार फक्त पंचांग आणि मुहूर्त बघतंय, मदत मात्र ठणठणाट!” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. कर्जमुक्तीबाबत ठाकरे यांनी सरकारच्या अभ्यास धोरणावर चांगलेच खडे बोल सुनावले. “कसला अभ्यास करता? मी मुख्यमंत्री असताना महात्मा फुले यांच्या नावाने शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती. तेव्हा कोणतीही समिती नव्हती, ती आमची जबाबदारी होती,” असं ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर थेट टीका (Uddhav Thackeray on Devendra Fadnavis

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “आज मी मराठवाड्यात फिरत आहे आणि मुख्यमंत्री कुठे आहेत? ते बिहारला आहेत,” असा प्रश्न त्यांनी केला. “मुख्यमंत्री तिकडे सांगतात की पंतप्रधानांना सगळ्या राज्यांवर प्रेम आहे, पण सगळ्यात जास्त प्रेम बिहारवर आहे. अशा पक्षाच्या हातात आपण आपला महाराष्ट्र दिला आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे,” अशी खोचक टीका त्यांनी केली.

जूनच्या मुदती’वर आणि केंद्रीय पथकावरही निशाणा (Uddhav Thackeray on Loan Waiver)

उद्धव ठाकरेंनी सरकारच्या ‘जूनच्या मुदती’वर आणि केंद्रीय पथकावरही निशाणा साधला. “जूनपर्यंतची मुदत ही केवळ नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी वेळकाढूपणा आहे. केंद्रीय पथक रात्री टॉर्च मारून पाहणी करतंय, अहवाल देईल, आणि निवडणुकांच्या वेळी पंतप्रधान मोठं पॅकेज जाहीर करून कोपऱ्याला गूळ लावतील,” असा आरोप त्यांनी केला. “या सरकारमध्ये खोटं बोलणं आणि मत चोरी चालली आहे. खोट्या थापा मारून मतं चोरली जातायत, याद्यांमध्ये फेरफार करून मतांची चोरी केली जात आहे,” असा आरोप ठाकरे यांनी केला. अजित पवारांच्या विधानावरही त्यांनी जोरदार प्रहार केला. “अजित पवार बेधडक सांगतात, ‘आम्हाला जिंकायचं होतं म्हणून कर्जमाफी बोललो.’ हा अन्नदात्याचा अपमान आहे,” असं ठाकरे म्हणाले. “आमदारकीच्या निवडणुकीत आमचा पराभव बाहेरून 20,000 मतदार आणून केला गेला,” असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Embed widget