एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: तुमच्याच पत्रावर माझं नाव टाकून देतो, शेतकऱ्यांना मदत करा; ओला दुष्काळ शब्द नाही म्हणणाऱ्या सीएम फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच पत्राची आठवून करून दिली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली. ‘ओला दुष्काळ’ ही संज्ञा नाही असे म्हणणाऱ्या सरकारवर फडणवीस यांच्या 2020 च्या पत्राचा दाखला दिला.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: विरोधकांकडून मागणी होत असताना 'ओला दुष्काळ' ही संज्ञा नाही, असे म्हणणाऱ्या सरकारवर टीका करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray criticism on CM Devendra Fadnavis) सीएम देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये विरोधी पक्षनेते असताना लिहिलेल्या पत्राचा (Devendra Fadnavis 2020 letter Ola Dushkal) दाखला दिला. ठाकरे म्हणाले, "त्यांच्या (देवेंद्र फडणवीस) पत्रातल्या चार ओळी मी वाचतो, 'ओला दुष्काळ (Uddhav Thackeray on Ola Dushkal term) जाहीर करून, मदत दिली गेली पाहिजे' त्यावेळेला संज्ञा होती आणि मग तुमची संज्ञा काढली का?" अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना केली. 

बिहार आणि महाराष्ट्रात भेदभावाचा आरोप (Bihar Maharashtra discrimination aid) 

उद्धव ठाकरे म्हणाले की, बिहारमध्ये निवडणुकीमुळे महिलांना 10 हजार रुपये दिले जातात, पण महाराष्ट्रात संकट असताना मदत दिली जात नाही, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून तिकडं लक्ष आहे आणि महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला तयार नाहीत हा अन्याय आहे. महाराष्ट्र भोळा भाबडा म्हणून तुम्ही त्याच्यावर वेडावाकडा अन्याय करू नका, असेही ते म्हणाले.

सरकारच्या मदतीतील दिरंगाईवरून हल्लाबोल (Farmer aid delay Maharashtra politics) 

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री त्यांच्या जाहिरातीमध्ये व्यस्त आहेत, दुसरे मुख्यमंत्री मदतीच्या पाकिटावरती सुद्धा स्वतःचे फोटो छापून वाटण्यामध्ये मग्न आहेत आणि तिसरे उपमुख्यमंत्र्यांकडून जनतेला मदत करणं तर दूरच राहिलं. उद्धव ठाकरे यांनी आरोप केला की भाजपमध्ये गेलेल्या साखर सम्राटांच्या शेकडो कोटी रुपयांच्या कर्जाची हमी सरकार घेते, पण गोरगरीब शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी सरकार घेत नाही. ते म्हणाले, "जर का साखर सम्राट भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल... तर ह्यांनी (शेतकऱ्यांनी) सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची वाट भाजप प्रणित सरकार बघतय का?"

शेतकऱ्यांकडूनच मदतीसाठी पैसे कपात (BJP sugar barons loan guarantee controversy) 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडूनच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन 15 रुपये कपात करण्याच्या निर्णयावर त्यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "खड्ड्यात गेलेले शेतकरी त्याला आणखी खड्ड्यात घातलं तर त्याच्यात गैर काय अशी या सरकारची धारणा झालेली आहे". ठाकरे यांनी सरकारकडे स्पष्ट मागणी केली की, "शेतकऱ्याला तातडीने हेक्टरी 50 हजार रुपये दिले गेले पाहिजेत आणि त्याच कर्ज माफ झालं पाहिजे." पंचनाम्यांची वाट न बघता सरकारने ही मदत तत्काळ जाहीर करावी. "पंचनामे कसले करताय? डोळ्या देखत दिसतय शेतकरी रडतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, पीक पाण्यात सडून गेले, आता काय हालत झाली असेल" असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget