एक्स्प्लोर

नव्या वर्षात वाहनधारकांच्या खिशाला लागणार कात्री? टोलच्या रकमेत होणार वाढ?

एकीकडे टोलमध्ये होणारी वाढ आणि दुसरीकडे रस्त्याची असणारी दुरावस्था, हे चित्र वर्षानुवर्षे पाहिला मिळत आहे. त्यामुळे टोलवाढीबाबत वाहनधारकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

पुणे / नाशिक :  आधीच पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना नवीन वर्षात वाहन धारकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण टोलमध्ये आणखी वाढ करण्याचा प्रस्ताव सरकार समोर ठेवण्यात आला आहे. टोल वाढवण्यासाठी देण्यात येणारं कारणही आर्श्‍चयकारक देण्यात आलं आहे. सुट्या पैशांमुळे टोलनाक्यांवर वादावादी होते. असे कारण टोल वाढीला देण्यात आले आहे. परंतु, सुट्या पैशांचे टोलवाढीसाठी कारण असले तरी अलिकडे फास्ट टॅग बंधणकारक करण्यात आल्यामुळे सुट्टे पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही तर मग ही टोलवाढ कशासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

एकीकडे टोलमध्ये होणारी वाढ आणि दुसरीकडे रस्त्याची असणारी दुरावस्था, हे चित्र वर्षानुवर्षे पाहिला मिळत आहे. त्यामुळे टोलवाढीबाबत वाहनधारकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

सरकार आणि टोल कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार तीन ते चार टक्के दरवाढ केली जाते. परंतु, आता सुट्या पैशांचे कारण देत टोल वाढ करावी अशी मागणी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. आधीचा टोल 67, 73, 82 रुपयांच्या स्वरूपात असेल तर तो यापुढे 70,  80,  90 असा असेल. त्यामुळे सुट्या पैशांमुळे वाद होणार नाहीत असे सरकारने टोलवाढीबाबत नियुक्त केलेल्या समितिने म्हटले आहे. सरकारने या समितीच्या अहवालानुसार टोलवाढ केली तर परत एकदा वाहनचालकांची  लूट होणार आहे. 

खराब रस्ते, सोयीसुविधांचा अभाव असताना देखील वाहनचालकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. टोल वसुली जोमात होत असली तरी रस्त्याची कामे मात्र वर्षोनुवर्षे अर्धवट असल्याची अनेक ठिकाणी स्थिती आहे. विधिमंडळ समितीकडून टोल वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. 

टोलनाक्यावर सोयी सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा अभाव, भल्या मोठ्या रांगासारखे प्रश्न जैसे थे असताना टोलमध्ये मात्र वाढ होणार यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. सरकार कोणतंही असो महाराष्ट्राला पडलेला टोलचा विळखा वर्षानुवर्ष कायम आहे. या टोलच्या माध्यमातून जमा होणाऱ्या पैशाची माहिती कधीच पारदर्शकतेने दिली जात नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे टोलच्या नावाखाली अक्षरशः लोकांची लूट सुरू आहे. मोठ-मोठ्या खड्यांतून आदळत वाहने पुढे जातात. त्यामुळे टोल वसुलीतून येणारे कोट्यवधी रुपये जतात तरी कुठे? रस्त्यांची  कामेच होणार नसतील तर टोल का द्यावा? असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करत आहेत.

फास्ट टॅग नसेल तर वाहनधारकांना दुप्पट दंड आकारण्यात येत आहे. असे असले तरी एकीकडे फास्ट टॅग बंधनकारक आणि दुसरीकडे सुट्या पेशांच्या अडचणीमुळे टोल वाढ या दोन्ही विसंगत बाबी आहेत. फास्ट टॅग असेल तर सुट्या पैशांचा प्रश्न येतोच कुठे? त्यामुळे सरकार या प्रस्तावावर काय निर्णय घेणार याकडे वाहधारकांचे लक्ष्य लागले आहे. 

 एकीकडे टोलवाढीचा प्रस्ताव असताना दुसरीकडे रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. फक्त टोलनाका असलेल्या ठिकाणीच रस्ता चांगला असतो परंतु, नंतर सगळीकडेच खड्डे, सर्व्हिस रोड नसणे, वाहतूक कोंडी अशा अनेक असुविधांचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. 

टोलचे देईपर्यंत होते भाजी खरेदी
टोलवर लागणाऱ्या लांबच्या लांब रांगांमुळे टोलनाक्यांजवळ पेरू, सफरचंद, काकडी एवढेच नाही तर आठवड्याचा भाजीपाला ही खरेदी होईल. कारण भाजी विक्रेत्यांनाही आता माहित झाले आहे की, टोलवर मोठ्या रांगा लागतात आणि त्या कमी होण्यास वेळ लागतो. तोपर्यंत वाहनधारक भाजीपाला खरेदी करू शकतात, असा संताप वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे.  
महत्वाच्या बातम्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: देवेंद्र फडणवीसांनी बोलावली आज महत्वपूर्ण बैठक, मान्सूनपूर्व तयारीचा घेणार आढावा 
Maharashtra Live Blog Updates: देवेंद्र फडणवीसांनी बोलावली आज महत्वपूर्ण बैठक, मान्सूनपूर्व तयारीचा घेणार आढावा 
Mahavitran : वीजगळती रोखण्यात महावितरणला अपयश, तब्बल 700 ते 800 कोटींचा फटका; भुर्दंड मात्र सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूलणार?
वीजगळती रोखण्यात महावितरणला अपयश, तब्बल 700 ते 800 कोटींचा फटका; भुर्दंड मात्र सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूलणार?
Prasad Lad Meet Manoj Jarange: प्रसाद लाड यांना पहिले धमकीचा फोन, मग हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न; मनोज जरांगेंच्या भेटीआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडलं?
प्रसाद लाड यांना पहिले धमकीचा फोन, मग हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न; मनोज जरांगेंच्या भेटीआधी काय घडलं?
Election Commission: मविआच्या 32 हरकती आणि 'त्या' इशाऱ्यानंतर निवडणूक आयोग उत्तर देणार; चोक्कलिंगम यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष
मविआच्या 32 हरकती आणि 'त्या' इशाऱ्यानंतर निवडणूक आयोग उत्तर देणार; चोक्कलिंगम यांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak Latur News: दोन चित्र, दोन्ही विदारक… NEET पेपरफुटीनंतर लातूरमधील भयानक वास्तव समोर, काळीज पिळवटून निघेल!
दोन चित्र, दोन्ही विदारक… NEET पेपरफुटीनंतर लातूरमधील भयानक वास्तव समोर, काळीज पिळवटून निघेल!
Cockroach Janta Party Abhijeet Dipke: राजकारणात नको, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही; अभिजीत दीपकेचे आई-वडील काय काय म्हणाले?, संजय राऊत, संजय सिंग यांचंही नाव घेतलं!
राजकारणात नको, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही; अभिजीत दीपकेचे आई-वडील काय काय म्हणाले?, संजय राऊत, संजय सिंग यांचंही नाव घेतलं!
Tumbadchi Manjula Trailer: कोकणातलं हसतं-खेळतं गाव, पण 'ती' येतं अन् थरकार उडतो; थ्रील-कॉमेडीचा तडका असलेला 'तुंबाडची मंजुळा'चा ट्रेलर
कोकणातलं हसतं-खेळतं गाव, पण 'ती' येतं अन् थरकार उडतो; थ्रील-कॉमेडीचा तडका असलेला 'तुंबाडची मंजुळा'चा Trailer
Abhijeet Dipake : अभिजीतने चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, अभिजीतच्या चिंतेने आई-वडील गहिवरले
चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, भारतात येऊन नोकरी करावी, अभिजीतच्या चिंतेने आई-वडील गहिवरले
Dhurandhar Singer Jasmine Sandlas Concert Accident: 'धुरंधर' फेम गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये अपघात, अचानक बॅरिकेट्स कोसळल्यानं एकच गदारोळ, धडाधड पडले प्रेक्षक VIDEO
'धुरंधर' फेम गायिकेच्या कॉन्सर्टमध्ये अपघात, अचानक बॅरिकेट्स कोसळल्यानं एकच गदारोळ VIDEO
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Embed widget