एक्स्प्लोर
औरंगाबादेत गॅस्ट्रोचं थैमान, तब्बल 2612 जणांना लागण
ड्रेनेजचं पाणी मिसळल्याने गॅस्ट्रोची साथ पसरल्याची शक्यता असल्याचं औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद : खराब पाण्यामुळे औरंगाबाद शहरात 2612 जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ड्रेनेजचं पाणी मिसळल्याने गॅस्ट्रोची साथ पसरल्याची शक्यता असल्याचं औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी म्हटलं आहे. ड्रेनेजचं पाणी कुणाच्या चुकीमुळे पसरलं, याची चौकशी करणार असल्याचं महापौर घोडेले यांनी सांगितलं. सरकारी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची प्रचंड गर्दी झाली आहे. अनेकांवर उपचार करुन सोडण्यात आलं आहे, तर हजारो रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. औरंगाबादमधल्या छावणी परिसरातून या रोगाची सुरुवात झाली. छावणीतील विविध भागांतील अनेक नागरिकांना मध्यरात्रीनंतर अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता या त्रासाने संपूर्ण छावणी परिसराला वेढा घातला. लहान मुले, महिला-पुरुष, युवक-युवती, ज्येष्ठ अशा सर्वांना या आजाराने वेढले असल्यामुळे उपचारासाठी नागरिकांनी छावणी सामान्य रुग्णालयात धाव घेतली.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















