![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरी, 37 लाख 84 हजार रुपयांचे साहित्य लंपास
पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात लॉकडाऊनदरम्यान चोरी झाल्याचं उघड झालं आहे. यामध्ये 37 लाख 84 हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेलं आहे.
![पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरी, 37 लाख 84 हजार रुपयांचे साहित्य लंपास Theft at Pankaja Mundes Vaidyanath Co-operative Sugar factory in Beed पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरी, 37 लाख 84 हजार रुपयांचे साहित्य लंपास](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/23182750/Vaidyanath-Sugar-Factory.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळी जवळच्या पांगरी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये दोन महिन्यापूर्वी तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचे समोर आले आहे. या चोरी प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी बंद होता. त्यानंतर कोरोनोमुळे लॉकडाऊन झाले आणि याच दरम्यान वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये चोरी झाली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोअर गोडाऊन आणि एक वर्कशॉप गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये 17 ऑक्टोबर 2020 ला चोरी झाली होती. त्याची माहिती स्टोअर कीपर जी.टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक आणि लीगल इन्चार्ज जमीन शेख यांना कळवण्यात आली. त्यानंतर लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचं शटर उचकटल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं.
चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर साखर कारखाना प्रशासनाकडून तपास सुरु होता. नेमके कोणकोणते साहित्य चोरीला गेली याची माहिती मिळवणे सुरु होते.
साखर कारखान्यातून काय काय चोरीला गेले?
- वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातून जी चोरी झाली आहे त्यामध्ये बऱ्याच मोठ्या वस्तू होत्या. कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. चोरीच्या या घटनेत एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य लंपास करण्यात आलं आहे.
- 24 तास साखर कारखान्यावर सुरक्षारक्षक नेमलेले असतानाही ही नेमकी चोरी कशी झाली? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र साखर कारखाना बंद असल्याचा फायदा घेऊन एवढी मोठी चोरी घडली कशी असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)