एक्स्प्लोर

Tauktae Cyclone : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत उद्या कडक संचारबंदी, जीवनाश्यक दुकानंही बंद राहणार

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या जिल्ह्यात कडक संचार बंदी अर्थात कर्फ्यू असणार आहे.

रत्नागिरी : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोकण किनारपट्टीला या वादळाचा थेट धोका नसला तरी त्याचे परिणाम मात्र कोकण किनारपट्टीला जाणवणार आहे. सध्या वातावरणात बदल झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. जोडीला वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट देखील आहे. जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये सध्या पावसानं हजेरी लावली आहे. सध्या जिल्ह्यातील वातावरण पाहता आणि चक्रीवादळाची गती आणि त्याचा जिल्ह्यावर होणारा परिणाम पाहता जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू केली आहे. कोणत्याही कारणास्तव नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. यावेळी अत्यावश्यक सेवेतील दुकानं देखील बंद राहणार आहेत. वादळाचा प्रभाव ओसरलेपर्यंत किंवा जोर कमी होईपर्यंत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय काय?

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या जिल्ह्यात कडक संचार बंदी अर्थात कर्फ्यू असणार आहे. यावेळी नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई असून अत्यावश्यक सेवेतील दुकानं देखील बंद आहेत. तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव ओसरेपर्यत जिल्ह्यात हा नियम लागू असे. दरम्यान, एकंदरीत वादळाचा अंदाज पाहता उद्याचं लसीकरण देखील बंद असणार आहे. किनारपट्टी लगतच्या ज्या भागामध्ये संभाव्य धोका आहे अशा ठिकाणाहून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जाणार आहे. यावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. 

खुशखबर! एकदिवस अगोदर मान्सून केरळात दाखल होणार! तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सज्ज

कोरोना रूग्णांबाबत पूर्णता खबरदारी घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. चक्रीवादळ उद्या सकाळी राजापूर, आंबोळगड येथून 11 वाजता जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा प्रवास दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्णगड, सायंकाळी 5 वाजेपर्यंत रत्नागिरी असा असणार आहे. या वादळाचा राजापूरमध्ये जास्त धोका आहे. वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी असणार असून सोसाट्याचा वारा 80 ते 90 गतीने जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. 

मागील वेळेस आलेल्या निसर्ग चक्रीवादळात वाऱ्याची गती 120 इतकी होती. यावेळी समुद्र किनाऱ्यावर असणारी विशेष करून राजापूर, आंबोळगड येथील नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव हलवण्यात आले आहे. मच्छिमारी करणाऱ्या सर्व नौका किनाऱ्यावर पोहोचल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. पर राज्यातील बोटी देखील किनाऱ्यावर आश्रयाला आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget