एक्स्प्लोर

Tauktae Cyclone : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत उद्या कडक संचारबंदी, जीवनाश्यक दुकानंही बंद राहणार

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या जिल्ह्यात कडक संचार बंदी अर्थात कर्फ्यू असणार आहे.

रत्नागिरी : तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोकण किनारपट्टीला या वादळाचा थेट धोका नसला तरी त्याचे परिणाम मात्र कोकण किनारपट्टीला जाणवणार आहे. सध्या वातावरणात बदल झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. जोडीला वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट देखील आहे. जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये सध्या पावसानं हजेरी लावली आहे. सध्या जिल्ह्यातील वातावरण पाहता आणि चक्रीवादळाची गती आणि त्याचा जिल्ह्यावर होणारा परिणाम पाहता जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू केली आहे. कोणत्याही कारणास्तव नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. यावेळी अत्यावश्यक सेवेतील दुकानं देखील बंद राहणार आहेत. वादळाचा प्रभाव ओसरलेपर्यंत किंवा जोर कमी होईपर्यंत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय काय?

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या जिल्ह्यात कडक संचार बंदी अर्थात कर्फ्यू असणार आहे. यावेळी नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई असून अत्यावश्यक सेवेतील दुकानं देखील बंद आहेत. तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव ओसरेपर्यत जिल्ह्यात हा नियम लागू असे. दरम्यान, एकंदरीत वादळाचा अंदाज पाहता उद्याचं लसीकरण देखील बंद असणार आहे. किनारपट्टी लगतच्या ज्या भागामध्ये संभाव्य धोका आहे अशा ठिकाणाहून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जाणार आहे. यावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. 

खुशखबर! एकदिवस अगोदर मान्सून केरळात दाखल होणार! तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सज्ज

कोरोना रूग्णांबाबत पूर्णता खबरदारी घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. चक्रीवादळ उद्या सकाळी राजापूर, आंबोळगड येथून 11 वाजता जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा प्रवास दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्णगड, सायंकाळी 5 वाजेपर्यंत रत्नागिरी असा असणार आहे. या वादळाचा राजापूरमध्ये जास्त धोका आहे. वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी असणार असून सोसाट्याचा वारा 80 ते 90 गतीने जाण्याची शक्यता आहे. प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. 

मागील वेळेस आलेल्या निसर्ग चक्रीवादळात वाऱ्याची गती 120 इतकी होती. यावेळी समुद्र किनाऱ्यावर असणारी विशेष करून राजापूर, आंबोळगड येथील नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव हलवण्यात आले आहे. मच्छिमारी करणाऱ्या सर्व नौका किनाऱ्यावर पोहोचल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे. पर राज्यातील बोटी देखील किनाऱ्यावर आश्रयाला आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nishikant Dubey: निशिकांत दुबे हाजीर हो...; मराठी माणसांना 'पटक-पटक के मारेंगे' म्हणणाऱ्या भाजप खासदारांना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश
निशिकांत दुबे हाजीर हो...; मराठी माणसांना 'पटक-पटक के मारेंगे' म्हणणाऱ्या भाजप खासदारांना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Narhari Zirwal: नरहरी झिरवळ व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई; ट्रान्सजेंडरच्या भावविरोधात गुन्हा दाखल, नोकरी लावण्याची मागणी अन् व्हिडीओ व्हायरल, मोठी माहिती समोर
नरहरी झिरवळ व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई; ट्रान्सजेंडरच्या भावविरोधात गुन्हा दाखल, नोकरी लावण्याची मागणी अन् व्हिडीओ व्हायरल, मोठी माहिती समोर
Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार? खडसेंसह कन्येवर गुन्हा दाखल, 25 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाची तक्रार, नेमकं प्रकरण काय?
एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार? खडसेंसह कन्येवर गुन्हा दाखल, 25 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाची तक्रार, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report
Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Credit Score : क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, नेमका काय फायदा होणार?   
क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, काय बदल होणार?
Embed widget