एक्स्प्लोर

Work Hours: आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम; मंत्रिमंडळाची मान्यता, सुट्टीचेही बदलले निकष, जाणून घ्या सविस्तर

Work Hours: शासन मान्यतेशिवाय वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही. कामगारांनी जास्तीचे काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि पगारी सुट्या देण्याबाबत बदल करण्यात आला आहे.

मुंबई: कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती समोर आली आहे. आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार आहे. विश्रांती कालावधीमध्ये बदल करून ५ तासांनंतर ३० मिनिटे आणि ६ तासांनंतर पुन्हा ३० मिनिटे विश्रांतीसाठी वेळ देण्यात आला आहे.आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ तासांवरून ६० तासांपर्यंत वाढवण्यात आले आहे. कामगारांच्या अतिरिक्त वेळेत (ओव्हरटाईम) आता कमाल मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार आहे. शासन मान्यतेशिवाय वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही. कामगारांनी जास्तीचे काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि पगारी सुट्या देण्याबाबत बदल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यांमधील कामगारांच्या काम करण्याची मर्यादा ९ तासांवरून १२ तास करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने काल (बुधवारी) घेतला. दुकाने आणि आस्थापनांमधील कामांच्या तासांची मर्यादा ही ९ तासांवरून १० तास करण्यात आली आहे.  तासांची मर्यादा वाढवली असली तरीदेखील कारखान्यांमधील तर कामगारांना एका आठवड्यात (एक दिवसाची रजा वगळता) जास्तीतजास्त ४८ तासच काम देता येते. ही मर्यादा कायम राहणार आहे. याचा अर्थ सरासरी दररोज आठच तास काम कामगारांकडून करून घेता येईल. आधी दररोजच्या कामाच्या तासांची मर्यादा ही नऊ तास इतकी होती. आता ती १२ तास करताना ८ तासांपेक्षा कितीही जास्तीचे काम करवून घेतले कामगारांना ओव्हरटाइमचे पैसे द्यावे लागतील. तसेच, ४८ तासांऐवजी आठवड्यात ५६ तास काम करवून घेतलेले असेल तर एक बदली रजा द्यावी लागेल. त्यापेक्षाही अधिक काम करवून घेतले तर त्या प्रमाणात जादा बदली रजा द्याव्या लागतील. कामगारांकडून जादा तास काम करवून घेतले जाणार असेल तर त्यासाठी संबंधित शासकीय विभागांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.

कारखाने, दुकाने अधिनियमात सुधारणा

राज्यात गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच रोजगार संधी वाढीसाठी कारखाने अधिनियम १९४८ आणि महाराष्ट्र दुकाने तसेच आस्थापना अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा २ तासांवरून १२ तासांपर्यंत होणार आहे. तर दुकाने आणि आस्थापनांमध्ये दैनंदिन कामाचे तास ९ वरून १० होतील. ही सुधारणा २० आणि त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना लागू राहील. 

मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली माहिती

मंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबत माहिती देताना म्हटला की बऱ्याचदा कारखान्यांना जास्त ऑर्डर आल्या किंवा त्यांना त्यांचा उत्पादन जास्त काढायचा असल्यास त्यांना बाहेरून नवीन कामगार बोलवावे लागतात त्या शिफ्टचे शेड्युल असते त्यामुळे त्यामध्ये काही अडथळे येतात त्यामुळे बाकी राज्यांप्रमाणे आणि बाकी देशांप्रमाणे जी लवचिकता कामगारांच्या कामांमध्ये आणि वेळेमध्ये असायला पाहिजे ती लवचिकता आता आपण आपल्या इथे आणतोय यामध्ये कारखाने अधिनियम नुसार 51 कलमानुसार नऊ तासांच्या वर त्यांना काम करता येत नाही त्यामध्ये आपण लवचिकता आणली आहे कोणत्याही कारखान्याला जरासं वाटलं त्याचे उत्पादन वाढलं पाहिजे तर त्यांनी सरकारची परवानगी घेऊन कामगारांची लेखी संमती घेऊन त्यांना कामगारांच्या कामाची वेळ वाढवता येणार आहे पण त्यालाही काही मर्यादा आहेत. कामगारांची परवानगी लागणार आहे सरकारची परवानगी लागणार आहे, सोबतच कामाचे तास आठवड्यातील 48 तासाच्या वर नेता येणार नाहीत आणि जेवढे वाढीव काम आहे त्या वाढीव कामाचे सुद्धा त्यांना मोबदला द्यावा लागणार आहे. याच्यात कामगाराबद्दल पूर्ण सुरक्षा अधिकार लक्षात घेऊन ही लवचिकता आपण आणतो आहे, अशी माहिती मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहे

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोणीही आमदार उठतो आणि आम्ही एकत्र होणार म्हणतो, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरुन गिरीश महाजनांचा सुनील शेळकेंना टोला
कोणीही आमदार उठतो आणि आम्ही एकत्र होणार म्हणतो, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरुन गिरीश महाजनांचा सुनील शेळकेंना टोला
गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
गरीब शेतकरी कसा निवडणार? कर्जमुक्तीची योग्य अंमलबजावणी न झाल्यास बँका डबघाईस येतील, शेतकरी कर्जबाजारी होतील, पटोलेंचा हल्लाबोल
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2026 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2026 | रविवार
राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वत: देव बनण्याचा प्रयत्न करू नका, अमोल मिटकरींचा नाव न घेता सुनील तटकरेंना इशारा
राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वत: देव बनण्याचा प्रयत्न करू नका, अमोल मिटकरींचा नाव न घेता सुनील तटकरेंना इशारा

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी जोरदार हालचाली, काल इराणी राष्ट्राध्यक्षांसोबत एक तास फोनाफोनी; आज सौदी, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादमध्ये पोहोचले, काय घडलं?
Gold Silver Rate : 4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
4 लाखांवर पोहोचलेली चांदी 2 लाखांनी स्वस्त, सोने चादींच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जाणून घ्या नवे दर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्प राजवटीलाच धडकी भरवणारा अमेरिकन जनतेचा एल्गार, सर्व 50 राज्यातील 3300 शहरात 80 लाखांहून अधिक जनता एकटवली
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
काल 'विराट' शो अन् आज रो'हिट' दिसणार! वानखेडेवर मुंबई आणि कोलकातामध्ये हाय-व्होल्टेज थरार; दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 कशी असेल?
Embed widget