एक्स्प्लोर

राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीची मदत करावी : देवेंद्र फडणवीस

नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारकडून जी काही तातडीची मदत यायला हवी होती ती अद्याप आलेली नाही, असे फडणवीस म्हणाले.

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर पूरपरिस्थितीचा पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. दोघांनीही कोल्हापुरातील विविध पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली.  "मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसून मदत जाहीर करणारा मुख्यमंत्री आहे" असा टोला फडणवीसांना लगावला. त्यानंतर फडणवीसांनी देखील या वर प्रतिक्रिया दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मदतीला पॅकेज म्हणावं की मदत हा त्यांचा प्रश्न आहे. पण जे पण असेल त्याची  घोषणा लवकर करावी. सामन्य माणसाला मदत लवकरात लवकर मिळाली पाहिजे.  माझ्या दौऱ्यादरम्यान बऱ्याच लोकांकडून 2019 च्या मदतीची आठवण करण्यात आली. पाच हजार, 10 हजार किंवा आणखी काही ही तातडीची मदत गरजेची असते.  पूर ओसरल्यानंतर तातडीच्या मदतीच्या प्रतीक्षेत लोक असतात. व्यापाऱ्यांना देखील आता सरकारने मदत केली पाहिजे. सरकारने नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत करावी ही आमची मागणी आहे. 


तातडीची मदत यायला उशीर  झाला 

अलमट्टी आणि राधानागरीचाही विसर्ग मोठा नाही. काही ठिकाणची उच्चपुर रेषा ही 2019 पेक्षा जास्त असल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापुरात जवळजवळ 396 गाव पुराने बाधित आहेत. दोन लाखांच्या पेक्षा जास्त लोकांवर परिणाम झाला आहे. प्रशासकीय इमारती, शाळा, घरे दुकाने यांचाही मोठं नुकसान झाले आहे. हे सगळं नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारकडून जी काही तातडीची मदत यायला हवी होती ती अद्याप आलेली नाही. लोक सातत्याने मदतीची विचारणा करत आहे. 

पिकांची नुकसान भरपाई द्यावी 

महावितरण नवीन मीटर स्वतः लोकांना आणायला सांगत आहे तसे न होता महावितरणने स्वतः ते बसवायला हवं. शेतीचही मोठं नुकसान झालेल आहे. पिकांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. पूरग्रस्त भागाच मागच्या वेळी कर्जमाफ केलं होतं तसच यावेळीही करायला हवं, सध्याची परिस्थिती पाहता सरकारने तात्काळ दिलासा द्यावा. कुंभार समाज जो गणेशमूर्ती बनवतो त्यांचंही मोठं नुकसान झालं. सात हजार मुर्त्या खराब झाल्या आहेत. त्यांना मदत करून बिनव्याजी कर्ज कस देता येईल याकडेही सरकारने लक्ष द्यावे. फक्त कुंभार समाज नाही तर इतरही काही घटक आहे त्यांनाही दिलासा हवा, असे देखील फडणवीस म्हणाले. 

फडणवीस म्हणाले,  नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं त्याचा आढावा घेण्याकरता आणि लोकांशी बोलण्याकरता आम्ही तीन दिवसांचा दौरा केला. नंतर आम्हाला चंद्रकांतदादा पाटील देखील या दौऱ्यात सहभागी  झाले  या तीन जिल्ह्यातल्या 22 ठिकाणी आम्ही भेट दिली आणि लोकांशी बोललो. भूस्खलन होत तिथे गेलो, पाणी भरलं होत तिथे गेलो.  सामान्य लोकांच्या अडचणी समजावून घेतल्या. ही परिस्थिती पाहिल्यावर वाटत की याचा विशेष अभ्यास करावा लागेल. 2005 साली जो पाऊस झाला होता. तो खुप मोठा होता जो 21 दिवसात पडला होता.2019 साली देखील तीच परिस्थिती होती. यावेळचा पाऊस जास्त पडला आणि तेही फक्त 5 दिवसात पडला. सरासरीपेक्षा 50 टक्के जास्त पाऊस पडला आहे.  मागच्या वेळी 2019 ला ज्यावेळी पूर आला त्यावेळी अभ्यास करून 22 छोट्यामोठ्या ब्रिजचा आराखडा तयार करण्यात आला होता. चंद्रकांत पाटील आणि महाडिक यांनी मेहनत घेऊन तो तयार केला होता. तोही इथे गरजेचा पडेल त्याचाही विचार करावा.

संबंधित बातम्या :

पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीत राजकारण नको, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आवाहन

मुख्यमंत्री ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात एकाच ठिकाणी पाहणीला, हे कसं घडलं, वाचा इनसाईड स्टोरी

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना मोदींना बदनाम करून पदावरून हटवायचंय, त्यांना स्वतः पंतप्रधान व्हायचंय'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
'अमित शाहांना मोदींना बदनाम करून पदावरून हटवायचंय, त्यांना स्वतः पंतप्रधान व्हायचंय'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Akhilesh Yadav: 'यांची हिम्मत तर बघा, भाजपकडून इतिहासाची पुनरावृत्ती, विद्यार्थ्यांना पुन्हा अमानुष मारहाण'; अखिलेश यादवांकडून व्हिडीओ पोस्ट करत संताप, संजय राऊतांसह रोहित पवारही भडकले
'यांची हिम्मत तर बघा, भाजपकडून इतिहासाची पुनरावृत्ती, विद्यार्थ्यांना पुन्हा अमानुष मारहाण'; अखिलेश यादवांकडून व्हिडीओ पोस्ट करत संताप, संजय राऊतांसह रोहित पवारही भडकले
Uddhav Thackeray: राजकारणाला जडलेला गद्दारीचा रोग कसा संपणार? उद्धव ठाकरेंचं बेधडक भाष्य; म्हणाले, 'विद्यार्थ्यांच्या रूपाने विष्णूचा अवतार...'
राजकारणाला जडलेला गद्दारीचा रोग कसा संपणार? उद्धव ठाकरेंचं बेधडक भाष्य; म्हणाले, 'विद्यार्थ्यांच्या रूपाने विष्णूचा अवतार...'

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीच सावट
PM Modi and Sandeep Deshpande: हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
हिटलर का बेटा झुटलर! मनसेच्या संदीप देशपांडेंचं मोर्चासाठी खास टी-शर्ट, फोटो व्हायरल
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Embed widget