एक्स्प्लोर

परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या ड्रीम प्रोजेक्टला घरघर, शिवशाही बसला उतरती कळा

एसटी महामंडळाच्या शिवशाही बससेवेला विविध कारणांमुळे उतरती कळा लागल्याचं चित्र आहे.

उस्मानाबाद : महामंडळाच्या शिवशाही बससेवेला विविध कारणांमुळे उतरती कळा लागल्याचं चित्र आहे. पाच वर्षाच्या करारावर एसटीने सात कंपन्यांच्या मिळून 576 बस चालवायला घेतल्या होत्या. त्यातील रेन्बो कंपनीने 25, अरोन कंपनीने 100, भागिरथी कंपनीने 88 बसगाड्या न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या स्वत:च्या मालकीच्या 498 बस शिवशाही झाल्या होत्या. एकूण सातपैकी दोन कंपन्यांनी आधीच माघार घेतली. आता आणखी एका कंपनीने शिवशाही बंद केली आहे. एसटीची थकबाकी वेळेवर मिळत नाही, तसंच नियम मोडल्यानंतर होणारे दंड, बँकांची थकलेली देणी, तोटा यामुळे खाजगी कंपन्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. खाजगी शिवशाहींची संख्या आता 576 वरुन 363 झाली आहे. उस्मानाबाद आगारात 4 बसेस आणि तुळजापूर आगारातून आलेल्या 2 बसेस अशा एकूण सहा बसेस उस्मानाबादमधून पुणे मुंबईसह मोठ्या शहरांकडे प्रवासी वाहतूक करत आहे. सुरुवातीला प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली वातानुकूलित शिवशाही आज लोकांना नकोशी वाटत आहे. कारण ही बस इच्छित स्थळी पोहचण्यास जास्त वेळ लावते आणि भाडेही जास्त आकारत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. शिवशाहीला घरघर लागण्याची कारणं 
  1. नियोजनाचा अभाव
  2. ठेकेदाराची मनमानी
  3. अधिकाऱ्यांचे ठेकेदाराशी असलेले हितसंबंध
  4. शिवशाही बसेस देखभाल, दुरुस्ती याकडे ठेकेदाराचं होणार दुर्लक्ष
  5. ठेकेदाराच्या चालकाची मनमानी, कुठेही बस थांबवणे, प्रवाश्यांशी उर्मट भाषेत बोलणे, एसटी कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषा वापरणे.
जिथं शिवशाही बसची खरोखरच आवश्यकता आहे, त्याठिकाणी शिवशाही बस न सोडणे. जिथं आवश्यकता नाही, तिथं शिवशाही बस सोडणं. प्रवाश्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे, अशी विविध कारणं शिवशाही बसला दोनच वर्षात लागलेल्या उतरत्या कळेसाठी कारणीभूत आहेत. शिवशाही कधी सुरु झाली ? 10 जून 2017 ला मुंबई-रत्नागिरी  या मार्गावर एसटीची पहिली शिवशाही सुरु झाली. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. एकूण 2 हजार शिवशाही बसेस घेण्यात येणार आहेत. 1850 सीटर बसेस तर 150 स्लीपर (शयनयान) बसेसचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात एसटीच्या स्वत:च्या मालकीच्या 500 व 7 खासगी मालकांच्या 500+74 (सीटर+ स्लीपर) अशा 1074 शिवशाही बसेस घेण्यात आल्या. त्यापैकी अरहम या खासगी मालकांच्या 100 पैकी 25 बसेस त्याच्यासह पार्टनर रेनबो या कंपनीने आर्थिक डबघाईस आल्यामुळे काढून घेतल्या. त्यानंतर अरान या कंपनीने आपल्या 100 बसेस सहभागीदारांच्यातील अंतर्गत वादामुळे काढून घेतले आहेत. सध्या भागीरथी या तिसऱ्या खाजगी कंपनीने एसटीला तीन महिन्याची नोटीस दिली आहे. त्यांच्या 88 बसेस काढून घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे खाजगी कंपन्या टप्पाटप्प्यात  निघून जात असल्याने, एसटी महामंडळाला नेमके त्यांना कशा पद्धतीने टिकवून ठेवावे, याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दररोज होणाऱ्या आर्थिक तोट्यामुळे खाजगी कंपन्या शिवशाही सोडून जात आहेत. एसटी महामंडळाने नव्याने चारशे खाजगी शिवशाही बसेसची  निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. परंतु दोनदा मुदतवाढ देऊनही त्यामध्ये खाजगी बस पुरवठादारांनी रस दाखवला नाही. यावरून एसटीच्या शिवशाहीचं महत्व किती कमी झालंय हे स्पष्ट होतंय.

महत्त्वाच्या बातम्या

कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जुलै 2026 | शनिवार
Uddhav Thackeray: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: 'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली
'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
Embed widget