एक्स्प्लोर

Shivrajyabhishek Din : औरंगजेबाची कानठळी बसवण्यासाठी आणि स्वकीयद्रोह्यांना धडा शिकवण्यासाठी.... शिवरायांनी राज्याभिषेक का केला?

Shivrajyabhishek Din: वयाच्या 16 व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पुढे 30 वर्षांच्या संघर्षानंतर शिवरायांनी राज्याभिषेक करुन घेतला. 

Shivrajyabhishek Din 2023: मराठ्यांच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक.... रयतेच्या राज्याची स्थापना करणारे शिवराय 6 जून 1674 रोजी खऱ्या अर्थाने छत्रपती झाले. केवळ सत्तेसाठी, पदासाठी केलेलं हे बंड नव्हतं...  त्यामागे मराठ्यांच्या सार्वभौम राज्याची स्थापना झाल्याची दवंडी पिटवण्यात आली. पण पाचही शाहींच्या, दिल्लीश्वरांच्या छाताडावर पाय ठेऊन रयतेचं स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांना आपण छत्रपती झालो हे सांगण्याची काय गरज होती? रयत, मावळे आणि सहकारी जीवापाड प्रेम करत असताना शिवरायांना त्यासाठी राज्याभिषेक (Shivrajyabhishek Din)  करून घेण्याची गरज काय होती?

History Of Shivaji Maharaj Coronation : रयतेवर अत्याचार, त्यात स्वकीयांचा समावेश 

महाराष्ट्रातील जनता ही निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह आणि मोघलशाहीच्या घोड्यांच्या टापाखाली चिरडली जात होती. इथल्या रयतेवर अत्याचार होत होता, दिवसाढवळ्या आया-बहिणींची अब्रू लुटली जायची..... आणि विशेष म्हणजे या जुलमामध्ये आप्तस्वकीय मराठा सरदारांचा समावेश असायचा. दिल्लीश्वरांच्या फेकलेल्या तुकड्यावर काही मराठा सरदार त्यांच्यासाठी काम करायचे. हे सर्व समोर असताना शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य आणलं. बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना शिवबा आपले वाटायचे. 

History Of Shivrajyabhishek : अत्याचार करणारा बादशाह... अन् रयतेला वाचवणारा बंडखोर 

शिवरायांनी रयतेचं राज्य आणलं... इथल्या आया-बहिणींची अब्रू वाचवली, इथल्या मंदिरांतील देव सुरक्षित केले खरे.... पण त्यांच्या या कार्याला मान्यता मात्र मिळत नव्हती. आदिलशाह असो वा मुगलशाह, त्यांच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणारे सरदार हे शिवरायांना बंडखोरच म्हणायचे. दख्खनच्या एका सरदाराचं बंडखोर पोर... असंच त्यांना ओळखलं जायचं. 

दिल्ली असो वा विजापूर.... इथल्या शाह्या या लोकांना लुटायच्या, त्यांच्यावर अत्याचार करायचे, तरीही ते सम्राट, महाराज किंवा राजा. औरंगजेबाने कितीही अत्याचार केला तरी त्याला इथलेच लोक बादशाह म्हणायचे... आणि शिवराय रयतेसाठी, धर्मासाठी काम करत असूनही त्यांना बंडखोर म्हटलं जायचं. मराठा सरदार हे स्वतःता आदिलशाह, औरंगजेबाचे निष्ठावंत सेवक मानायचे, मात्र शिवरायांच्या कामाला मान्यता द्यायचे नाही. नेमकं हेच चित्र बदलण्यासाठी शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. 

राज्याभिषेक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे इतर राज्यांकडून मिळणारी राजमान्यता. त्यामुळे शिवरायांच्या वटहुकूमांना, त्यांच्या निर्णयाला कायदेशीर मान्यता मिळणार होती. इतर राज्यांशी तह किंवा वाटाघाटी करताना, संवाद साधताना मान्यता मिळणार होती. 

Chhatrapati Shivaji Maharaj Coronation:  शिवराय छत्रपती झाले

दिल्लीच्या औंरग्याच्या छाताडावर बसून रयतेचं राज्य स्थापन करणारा आपला शिवबा राजा व्हावा असं आऊसाहेबांना वाटायचं, लहान का असेना पण आपलं स्वतंत्र्य राज्य असावं असं शिवरायांच्या सहकाऱ्यांना वाटायचं. त्यामुळे अखेर शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. 

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी, 26 एप्रिल 1645 रोजी शिवरायांनी आपल्या सवंडगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली होती. त्यानंतर 30 वर्षांच्या धगघगत्या संघर्षानंतर 6 जून 1674 रोजी शिवरायांनी राज्याभिषेक करुन घेतला आणि स्वतःला छत्रपती म्हणून घोषित केलं. आज या क्रांतिकारी घटनेला 349 वर्षे पूर्ण होत आहेत. साडेतीनशे वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेचा दूरगामी परिणाम आजही होत असल्याचं जाणवतं. 

ही बातमी वाचा :

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.
Nagar Parishad Nagar Panchayat Election : 22 Dec 2025 : धुरळा निवडणुकीचा Superfast News : ABP Majha
Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
फळे रसाळ गोमटी! लोणावळ्यात फळ विक्रेतीचं भाग्य उजळलं, 24 तासांतच फळांच्या गाडीवर परतली नगरसेविका
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
आम्हाला कधी मस्ती आली नाही, अहंकार दाखवला नाही, आमच्या बापजाद्यांमध्ये कोणी खासदार, आमदार नव्हतं; 'हिटलर'वरून मुश्रीफांनी संजय मंडलिकांची कुंडलीच मांडली
Parli Nagarparishad Election Result 2025: चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका; परळीतील दारूण पराभवानंतर शरद पवार गटाच्या नेत्याने बजरंग सोनवणेंना सुनावलं
BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Maharashtra Local Body Election: राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगराध्यक्षाची भलतीच चर्चा, पण दुर्दैवाने फक्त एका मताने हार नशिबी आलेला तो 'कमनशीबी' उमेदवार कोण?
राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगराध्यक्षाची भलतीच चर्चा, पण दुर्दैवाने फक्त एका मताने हार नशिबी आलेला तो 'कमनशीबी' उमेदवार कोण?
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
Sunil Shelke : माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी सुनील शेळकेंनी शड्डू ठोकला? म्हणाले, प्रत्येकाची महत्वाकांक्षा...
माणिकराव कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी सुनील शेळकेंनी शड्डू ठोकला? म्हणाले, प्रत्येकाची महत्वाकांक्षा...
WTC Latest Points Table: भारत, इंग्लंड OUT...ऑस्ट्रेलियाचा सलग 3 कसोटी सामन्यात विजय, WTC च्या Points Table मध्ये उलथापालथ
भारत, इंग्लंड OUT...ऑस्ट्रेलियाचा सलग 3 कसोटी सामन्यात विजय, WTC च्या Points Table मध्ये उलथापालथ
Embed widget