एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री! महाविकासआघाडीच्या बैठकीत सर्वसंमती
नेहरु केंद्रात सुरु महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता.
![उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री! महाविकासआघाडीच्या बैठकीत सर्वसंमती Sharad Pawar Says Uddhav Thackeray will be chief minister of Maharashtra उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री! महाविकासआघाडीच्या बैठकीत सर्वसंमती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/11/22132740/Uddhav-Thackeray-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेसाठी वेगाने हालचाली होऊ लागल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची वरळी येथील नेहरु विज्ञान केंद्रात महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. ही बैठक अद्याप सुरु आहे. परंतु काही महत्त्वाच्या कामानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बाहेर पडले. नेहरु केंद्राबाहेर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी माध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे.
नेहरु केंद्रात सुरु असलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता, अशी माहिती मिळत आहे. तेसच महाविकासआघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनीच करावं, असा सूर या बैठकीत पाहायला मिळाला.
मुख्यमंत्री हा महाविकासआघाडीमधील सर्व पक्षांच्या आमदारांचे, गटनेत्यांचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना असे वाटते की, उद्धव ठाकरे यांनीच महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे. महाविकासआघाडीच्या मंत्रीमंडळात दोन माजी मुख्यमंत्री, दोन माजी उपमुख्यमंत्री, तसेच आतापर्यंत अनेकवेळा कॅबिनेट मंत्रीपदं भूषवलेले नेते असणार आहेत. त्यामुळे अशा नेत्यांचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ उद्धव ठाकरेंमध्येच आहे, असे आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सर्वसंमती झाली आहे.
दरम्यान, ठाकरे कटुंबांच्या आतापर्यंतच्या इतिहासात ठाकरे घरातील कोणत्याही व्यक्तीने कधीही मंत्रीपद भूषवलेले नाही. ठाकरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती नेहमीच मंत्रीपदापासून दूर राहात आलेली आहे. परंतु ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती पहिल्यांदाच मंत्रीपदावर विराजमान होणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कुठल्या नेत्याला कोणतं मंत्रीपद? | एबीपी माझा
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion