एक्स्प्लोर

मी कधीही सहज बोलत नाही : शरद पवार

सोलापूर : मी कधीही सहज बोलत नाही, माझी विधानं विचारपूर्वक केलेली असतात, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छत्रपती संभाजीराजेंबद्दल केलेल्या वक्तव्यांबाबत म्हटलं आहे. ते बार्शीत एका खाजगी कार्यक्रमाला आल्यावर बोलत होते.     छत्रपती शाहू महाराजांचे वंशज कोल्हापूरचे छत्रपती संभाजी यांची भाजपकडून राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड झाली. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, आधी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करायचे मात्र आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करतात, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला जातीय संदर्भ असल्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.     त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, मी फक्त छत्रपतींचा सेवक आहे.  

मी केवळ छत्रपतींचा सेवक, फडणवीसांचं पवारांना उत्तर

  शरद पवारांच्या छत्रपती आणि पेशवे यांच्याबाबतच्या विधानाचे राजकीय अर्थ काढले जात असले तरी, तेव्हा समर्थकांनी पवाराचं वक्तव्य हे मिश्कील असल्याचं म्हटलं होतं. त्या विधानाचं जातीय विश्लेषण करु नये, असंही सांगितलं होतं. मात्र आज शरद पवारांनी बार्शीमध्ये दिलेल्या स्पष्टीकरणानंतर पेशवे आणि छत्रपती हे वक्तव्य हे मिश्कील नव्हतं तर विचारपूर्वक केलेलं गंभीर वक्तव्य होतं, हे ही स्पष्ट होतं.     आपण कधीही सहज बोलत नाही, या पवारांच्या वक्तव्याला एक स्थानिक संदर्भही असण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी बार्शीचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सांगलीमध्ये केलेलं भाषण सोशल मीडियावर बरंच व्हायरल झालं होतं. त्यावर बरीच टीका झाल्यानंतर सोपलांनी आपलं सांगलीमधील भाषण सहज केलेलं आणि कार्यकर्त्यांमध्ये हास्य पेरण्यासाठी केलेलं असल्याचा दावा केला होता. त्यामुळे आता शरद पवारांनी बार्शीत येऊन आपण कधीही सहज बोलत नाही, विचारपूर्वक बोलतो, असं सांगितलं.     बार्शीतीलच या कार्यक्रमात त्यांनी, आंबेडकर भवन प्रकरणातील वस्तुस्थिती सर्वांसमोर येणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. आंबेडकर भवनावरुन सुरू झालेला वाद मिटला पाहिजे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.  

राज्यसभेसाठी भाजपकडून सहस्त्रबुद्धेंना तिकीट, महात्मेंची सरप्राईज एण्ट्री

  सत्ताधारी युतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेचा वाद हा नाटकी असल्याचं सांगत हे पक्ष कामही करणार नाहीत आणि सत्ताही सोडणार नाहीत, असं ते म्हणाले.  दुष्काळी परिस्थिती चिंताजनक असताना राज्य सरकार पुरेसं गंभीर नाही. दुष्काळ निवारणात फडणवीस सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.   आगामी निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा तूर्त तरी विचार नाही, असं स्पष्टीकरण पवार यांनी दिलं.   पवार काय म्हणाले होते?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget