एक्स्प्लोर

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग आठ पदरी करा, पण शक्तीपीठ महामार्ग जनतेच्या माथी नको, राजू शेट्टींनी घेतली गडकरींची भेट, नेमकी काय झाली चर्चा?  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आज केंद्रीय मंत्री नितन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्गासंदर्भात चर्चा केली आहे.

Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आज केंद्रीय मंत्री नितन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्गासंदर्भात चर्चा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्गाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी किंवा आठ पदरी करावा. तसेच राज्य सरकारवर पडणारा शक्तीपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा अशी मागणी  राजू शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. पण शक्तिपीठ महामार्ग नको असे शेट्टी म्हणाले.  

गरज पडल्यास रत्नागिरी -नागपूर हा महामार्गाचे  रुंदीकरण  करण्यास अडचण नाही : गडकरी

सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी -नागपूर हा महामार्ग कमी रहदारीचा असल्याने तोट्यात चाललेला आहे. भविष्यात गरज पडल्यास केंद्र सरकार या महामार्गाचे रुंदीकरण  करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. सध्या या महामार्गावर बऱ्याच ठिकाणी सहा पदरी व आठ पदरीच्या अनुषंगाने जमीन संपादनही झालेली आहे. केंद्र सरकारने लगेचच या महामार्गाचे सहापदरी किंवा आठ पदरी केल्यास जनतेवर टोलचा बोजा पडणार असल्याची माहिती केंद्रीय  मंत्री गडकरी यांनी दिली. 

शक्तीपीठ महामार्ग हा फक्त गडचिरोलीच्या खाणीमधील बॅाक्साईट गोव्यात घेऊन जाण्यासाठी केला जातोय

राज्य सरकारने कुठल्याही देवस्थान समिती अथवा भक्तांनी मागणी केली नसताना शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. पवनार ते पत्रादेवी पर्यंत असणारे सर्व देवस्थान हे रत्नागिरी -नागपूर या सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गालगत आहेत. कोणत्याही देवस्थानला दर्शनासाठी जात असताना वाहतूकीची कोंडी होत नाही. शक्तीपीठ महामार्ग हा फक्त गडचिरोलीच्या खाणीमधील बॅाक्साईट गोवा याठिकाणी घेऊन जाण्यासाठी होणार असल्याने सामान्य जनतेला याचा कोणताच लाभ होणार नसून याऊलट जनतेच्या डोक्यावर टोलचा भुर्दंड पडणार आहे.

शक्तीपीठ महामार्गातून किमान 50 हजार कोटी ढापले जाणार

केंद्र सरकार करत असेलेले रस्ते व राज्य सरकार करत असलेले रस्ते या प्रकल्प किमतीत मोठी तफावत आहे. केंद्र सरकारपेक्षा तिप्पटीने प्रकल्पाची किंमत जादा आहे. शक्तीपीठ महामार्गातून किमान 50 हजार कोटीचा ढापले पाडला जाणार असून हा बोजा राज्यातील जनतेच्या माथी पडणार आहे. यामुळे राज्य सरकारने सदर बाबीचा गांभीर्याने विचार करून शक्तीपीठ महामार्गास स्थगिती देणे गरजेचे असल्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Raju Shetti on Devendra Fadnavis: मुख्यमंत्री महोदय तुमच्या कर्माची फळ सामान्य जनता भोगू लागली, तुमच्या धोरणामुळे कुंकू पुसण्याचे पाप; सरकारी ठेकेदारानं गळ्याला दोरी लावताच राजू शेट्टींचा हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Railway Fare: मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
Girija Oak On Father Girish Oak, Mother Padmashree Phatak Divorce: 'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत गिरीजाचा खुलासा, गिरीश ओक यांच्याबाबत म्हणाली...
'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत पहिल्यांदाच गिरीजाचा खुलासा
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज यांचं नाव निश्चित, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Railway Fare: मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ; मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा
Girija Oak On Father Girish Oak, Mother Padmashree Phatak Divorce: 'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत गिरीजाचा खुलासा, गिरीश ओक यांच्याबाबत म्हणाली...
'घटस्फोटीत आई-वडीलांची मुलगी म्हणून जगत होते...'; आई-वडिलांच्या नात्याबाबत पहिल्यांदाच गिरीजाचा खुलासा
BMC Election 2026: मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
मुंबईत मनसे-ठाकरे गटाचं जागावाटप अडलं, 'या' 4 ठिकाणी रस्सीखेच; राज ठाकरेंनी संजय राऊत-परबांना संदेश धाडला
Dhurandhar Box Office Collection Day 17: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; तिसरा विकेंडही गाजवला, विक्की कौशलच्या 'छावा'सोबत काँटे की टक्कर, कोण जिंकणार?
Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
पाकिस्तानकडून धुरंधरच्या गाण्यावर सेलिब्रेशन; टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर नको नको ते केलं, नेमकं काय घडलं?, VIDEO
Samantha Ruth Prabhu Mobbed By Fans: निधी अग्रवालप्रमाणेच चाहत्यांच्या गर्दीत अडकली समंथा प्रभू, जंगली श्वापदासारखे बेकाबू फॅन्स, कुणी ओढला पदर, तर कुणी ढकललं, नेमकं काय घडलं?
निधी अग्रवालप्रमाणेच चाहत्यांच्या गर्दीत अडकली समंथा प्रभू, जंगली श्वापदासारखे बेकाबू फॅन्स, कुणी ओढला पदर, तर कुणी ढकललं अन्... VIDEO
Mohsin Naqvi Ind vs Pak U19 Asia Cup 2025 Final: मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, नेमकं काय घडलं?
मोहसीन नक्वीला टीम इंडिया पुन्हा नडली; आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा राडा, काय घडलं?
Embed widget