एक्स्प्लोर

Sangli News: सांगलीत अजूनही समाधानकारक पाऊस नाहीच, जत तालुक्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचं सावट

Sangli News: जुलैचा पंधरवडा उलटला तरी सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. तसेच दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यावर दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे.

Sangli News:  सांगली (Sangli) जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे.  सांगलीतील अनेक तालुक्यात पेरणी झाली नाही आणि जिथे पेरणी झालीय त्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत (Jat) तालुक्यात तर अजिबातच पाऊस पडला नाही. त्यामुळे  जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न अधिकच गंभीर होत असल्याचं चित्र सध्या आहे.  

दुसरीकडे शेतीला देखील पाणी नसल्याने आणि वरुणराजा कृपावृष्टी न झाल्याने जत तालुक्यावरील दुष्काळाचं संकट अधिकच गडद होत चाललं आहे. ज्या कृष्णा नदीची पाणी पातळी जुलैमध्ये  20 फुटाच्या आसपास असते तिथे सध्या कृष्णा नदी पाणी पातळी  अवघ्या 6 ते 7 फुटावर आली आहे. यामध्ये  दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती अधिकच गडद बनत चालली आहे.

आता जत तालुक्यावर  दुष्काळाचे काळेकुट्ट ढग दाटून आले आहेत. कारण आतापर्यंत तालुक्यात फक्त 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कृष्णा नदीतून कर्नाटकात जाणारे  पाणी जत तालुक्यातील पाणी नसलेल्या गावांना द्यावं, ही मागणी  जोर धरत आहे. त्याचप्रमाणे जत येथील म्हैसाळच्या सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे, जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि जत तालुक्यात चारा छावण्या आणि टँकरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा अनेक मागण्या करण्यात येत आहे. त्यासाठी नागरीकांकडून आंदोलन देखील करण्यात येत आहे. 

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात म्हणजेच जत,आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्यात प्रामुख्याने कडधान्य, ज्वारी, बाजरी ही पिकं घेतली जातात.परंतु या तालुक्यात या पिकांच्या पेरणीसाठी पाऊसच झाला नाही. त्यामुळे या पिकांची पेरणी देखील अद्याप झालेली नाही. त्यामुळे या पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने  खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांची उगवण खूंटली असल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडल्याचं चित्र सध्या सांगली जिल्ह्यात आहे. 

दुसरीकडे कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर, तासगाव, मिरज या पूर्वेकडील तालुक्यात देखील भीषण परिस्थिती काही दिवसात निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीवर प्रशासनाने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तसेच जर 15 जुलै नंतरही समाधानकारक पाऊस पडला नाही तर जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्यात येणार आहे.

पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यापासून सर्व उपाययोजना तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही सूचना पालकमंत्री सुरेश खाडे  जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यानुसार जत तालुक्यातील सध्याच्या घडीला 12 ते 15 गावामधून टँकरची मागणी होत आहे. तसेच सीमेवरील आठ गावातील वाड्या वस्त्यांमध्ये  सोमवारपासून पासून टँकर सुरू करण्यात येणार आहेत.

या सगळया भागावर प्रशासन लक्ष ठेवून असून 15 जुलै नंतर देखील पाऊस पडला नाही तर प्रामुख्याने जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यापासून सर्व उपाययोजना तात्काळ सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यानुसार जत तालुक्यातील सध्या 12 ते 15 गावामधून टँकरची मागणी होऊ लागली असून यातील सीमेवरील  8 गावातील वाड्या-वस्त्यांवर  सोमवारपासून पासून टँकर सुरू करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा : 

IMD Rain Update : राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा; विदर्भात यलो अलर्ट तर कोकणातही जोर वाढणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
Embed widget