एक्स्प्लोर

तळई गावाचा पुनर्विकास लवकरच होणार; पुनर्विकासासाठी नवीन तंत्रज्ञान असलेली घरं कशी असणार?

प्रत्येक घरावर सोलर पॅनल आणि वॉटर हार्वेस्टिंगसाठी पाण्याच्या टाक्या असणार आहेत. फायर प्रूफ आणि आयसोलेशन असलेल्या घराच्या भिंतीसोबत छत ही कोकणातील परिस्थिती लक्षात घेऊन बनवण्याचं काम सुरू आहे.

मुंबई : अतिवृष्टीमुळे रायगडमधील तळई गावावर दरड कोसळल्याने हे संपूर्ण गाव होत्याचं नव्हतं झालं. या तळई गावाचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार आहे. अतिशय कमी वेळेत नव्या तंत्रज्ञानाने उभी राहणारी आणि दीर्घकाळ टिकणारी घरे इथे तयार केली जात आहेत. ही घरं बनवण्याचं काम गुजरातच्या भूजमध्ये सुरू आहे. अतिशय युद्धपातळीवर ही घरं तयार करण्याच काम भुजच्या सिटेक इंजिनीअरिंग कंपनीमध्ये सुरू आहे. अवघ्या आठ दिवसात उभी राहणाऱ्या आणि कमी खर्चात तयार होणाऱ्या या घरांची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

या कारखान्यात कामगारांची रात्र-दिवस धावपळ सुरू आहे. तळई गावच्या पुनर्विकासासाठी आणि या दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांचे अश्रू पुसून त्यांच्या डोक्यावरील हिरवलेलं छत पुन्हा निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर ही घरे निर्माण केली जात आहेत. याच कारखान्यातून तयार झालेली घर आज जगभरात अनेक ठिकाणी वसलेली आहेत. आणि हीच घरं काही दिवसात तळई गावात वसणार आहे.

फॅक्टरीत घरं तयार होतात हे ऐकून आपल्यालाही नवल वाटेल. मात्र अनेक देशांमध्ये कमी वेळेत जास्त टिकाऊ घरं आजही फॅक्टरीमध्ये तयार होत आहेत. आणि तशीच ही  घरं गुजरातच्या भुज येथेही  तयार होत आहेत. भुजच्या फॅक्टरीत तयार झालेली घरं थेट रायगडच्या तळई गावाच्या पुनर्विकासासाठी आणली जाणार आहेत.   

कोकणातील मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा लक्षात घेता ही घरं बनवली जात आहेत. या घरांच्या भिंती अतिशय मजबूत असणार आहेत सिमेंट केमिकल्स यांचा वापर करून लाईट वेट काँक्रीट पॅनल तयार केले जात आहेत. भिंतीसाठी हे पॅनल वापरले जाणारे आहेत. या भिंती फायर प्रूफ असणार आहेत. जर दुर्घटना घडून कुठल्याही प्रकारची आग लागली तरी या भिंतीमुळे ती आग पसरू शकणार नाही. तसेच उन्हाळ्यात जरी प्रचंड उष्णता वाढली तरी घरातील वातावरण थंड राहील आणि हिवाळ्यात जरी थंडी वाढली तरी घरातील वातावरण उष्ण राहील. एवढंच नाही कोकणात सोसाट्याचा वारा असतो. त्या वाऱ्यात ही घरांना काहीच होणार नाही. एवढंच नाही तर 180 प्रती तासाने वारे वाहत असेल तरी ही घरे या वादळात तग धरतील, असं सिटेक इंजिनीअरिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमरप्रकाश अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

प्रत्येक घरावर सोलर पॅनल आणि वॉटर हार्वेस्टिंगसाठी पाण्याच्या टाक्या असणार आहेत. फायर प्रूफ आणि आयसोलेशन असलेल्या घराच्या भिंतीसोबत छत ही कोकणातील परिस्थिती लक्षात घेऊन बनवण्याचं काम सुरू आहे. कोकणात मुसधार पाऊस कोसळत असल्याने त्याचा आवाज होऊ नये आणि तापमान कंट्रोल करण्यात यावा यासाठी पफ आयसोलेशन असलेले पत्रे तयार केले जात आहेत. जेणेकरून हे छत मजबूत तर असेल आणि तापमान ही कंट्रोल करणार आहे. फायर प्रूफ भिंत आणि पफ आयसोलेशन असलेलं घराचं छत  असणार आहे. 400 चौरस फूट कार्पेट असलेलं वन बीएचके हे घर असणार आहे. त्यात हॉल, बेडरूम किचन आणि शेतीच साहित्य ठेवण्यासाठी जागा असणार आहे.

वैशिष्ट्यपूर्ण नवीन टेक्नॉलॉजी असलेलं हे घर असणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणावर वादळवारा असल्याने अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यासाठी या सगळ्या घरांच्या छतावरती सोलार पॅनल बसवलं जाणार आहे. जेणेकरून विद्युत पुरवठा खंडित झाला तरी घरात सोलरचा वापर करता येईल. एवढच नाही तर पावसाळ्यात वाहून जाणार पाणी अडवले जाईल आणि ते वर्षभर वापरता येईल. अशा स्वरूपाच्या पाण्याच्या मोठ्या टाक्या प्रस्तावित आहेत. म्हणजेच तळई गावात विद्युत पुरवठा आणि पाण्यापासून वंचित राहता येऊ नये अशा स्वरूपाचं गाव वसवलं जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget