एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
रत्नागिरीत घराला आग, दोन चिमुरड्यांचा मृत्यू
नाटे इथे गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने मुद्सर दर्वेश यांनी आपल्या घरात रॉकेलचा दिवा पेटवून ठेवला होता.
![रत्नागिरीत घराला आग, दोन चिमुरड्यांचा मृत्यू Ratnagiri : Fire at home, two kids died रत्नागिरीत घराला आग, दोन चिमुरड्यांचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/01115108/Ratnagiri-House-Fire-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या साखरी नाटे गावात घराला आग लागून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. नमिर मुदसर दर्वेश (वय 7 वर्ष) आणि फातिमा मुद्सर दर्वेश (वय 5 वर्ष) अशी या दोन लहान मुलांची नावं आहेत.
रविवारी (30 सप्टेंबर) रात्री दहाच्या सुमारास ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी अथक प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत नमिर आणि फातिमा या दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता. आग लागली त्यावेळी या मुलांचे आई-वडील शेजाऱ्यांकडे काही काम निमित्ताने गेले होते.
नाटे इथे गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने मुद्सर दर्वेश यांनी आपल्या घरात रॉकेलचा दिवा पेटवून ठेवला होता. मात्र हा दिवा लहान मुलांच्या हातून खाली पडला आणि बाजूला असलेल्या कपड्यांची पेट घेतला असावा असा अंदाज आहे. त्यामुळे घरात सगळीकडे धूर झाला आणि यातच नमिर आणि फातिमा यांचा गुदमरुन आणि होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion