एक्स्प्लोर

Raju Shetti : शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं : राजू शेट्टी   

Raju Shetti : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.   

Raju Shetti : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा आळशी नाही. उसासाठी काय काय करावे लागते हे सर्वांना माहित आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे 18 महिने ऊस सांभाळावा लागतो, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. 

"ऊस हे शाश्वत पीक असले तरी शेतकऱ्यांनी उसासह इतर पिकांचा ही विचार केला पाहिजे असा सल्ला शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर राजू शेट्टी यांनी यावर बोलताना उसासाठी देखील खूप कष्ट घ्यावे लागतात असे सांगिले.  ते म्हणाले, "उसाच्या नोंदीसाठी साखर कारखान्याचे संचालक आणि चिटबॉयच्या हातापाया पडावे लागते. उसाच्या एफआरपीसाठी आंदोलने करावी लागतात, पोलिसांच्या काठ्या खाव्या लागतात, तुरुंगात जावं लागतं. या सर्व गोष्टी शरद पवार यांना माहिती आहेत. परंतु, आजकाल ऊस उत्पादकांना नावं ठेवण्याची एक पद्धत रूढ झाली आहे. दुर्दैव हे आहे की, याच उसाच्या मुद्यावरुन अनेक जण बँकाचे संचालक झाले, राज्य बँकेवर गेले, राजकारणात पैसा याच आळशी शेतकऱ्यांमुळे मिळाला हे विसरु नका." 

"नदी ओलांडल्यानंतर नावाड्याला जशी शिवी दिली जाते तसा हा सर्व प्रकार आहे. शरद पवार हे दहा वर्षे कृषीमंत्री होते. त्यांना हे माहिती पाहिजे की, ऊस हे एकमेव असं पिक आहे, ज्याला कायदेशीर हमीभावाचे सरंक्षण आहे. आम्ही इतर पिकांना देखील हमीभाव सरंक्षण मागतोय. परंतु, शासनाने जाहीर केलेले हमीभाव केवळ कागदावर राहतात. तुम्ही हमीभावाला सरंक्षण दिलं असतं तर उसा ऐवजी दुसरं पिक घेण्याचा सल्ला देता आला असता, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला. 
 
राजू शेट्टी म्हणाले, "18 महिने ऊस शेतात आहे, ही देखील शासनाची चूक आहे. एक वर्षाआधी तुम्हाला लक्षात आले होते की लागवडीचे क्षेत्र किती आहे? राज्यात चालू आणि बंद स्थितीतील कारखाने किती आहेत? त्यांची गाळप क्षमता किती आहे? याचा अभ्यास केला पाहिजे होता आणि बंद असलेले कारखाने चालू करायला पाहिजे होते. असे केले असते तर सर्व ऊस गाळप झाला असता. हे सर्व राज्य सरकारचं अपयश आहे." 

काय म्हणाले होते शरद पवार? 

"ऊस हे आळशी माणसाचं पीक आहे. म्हणजेच, एकदा लागवड झाली की, अधिकचे कष्ट नसतात. किंवा हातमशागतही नसते. लागवडीपासून सिंचन, मशागत आणि तोडणी देखील यंत्राच्या सहाय्यानं. त्यामुळे ऊस हे आळशी माणसाचं पीक आहे. दराचा विचार न करता उत्पादन घेणं सोपं असल्यानं शेतकऱ्यांचा कल याकडे वाढत आहे. शेतकऱ्यांनी ऊस घेण्यापेक्षा हंगामी पिकांसह फळबागांची लागवड करावी.", असं शरद पवार म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य; पाहा संपूर्ण मुलाखत

Sharad Pawar : कृषीमंत्री असताना देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी केली याचा आनंद : शरद पवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रियाRohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेटHingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवातTop News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Embed widget