एक्स्प्लोर

Raju Shetti : शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं : राजू शेट्टी   

Raju Shetti : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.   

Raju Shetti : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत केलेलं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा आळशी नाही. उसासाठी काय काय करावे लागते हे सर्वांना माहित आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे 18 महिने ऊस सांभाळावा लागतो, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. 

"ऊस हे शाश्वत पीक असले तरी शेतकऱ्यांनी उसासह इतर पिकांचा ही विचार केला पाहिजे असा सल्ला शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर राजू शेट्टी यांनी यावर बोलताना उसासाठी देखील खूप कष्ट घ्यावे लागतात असे सांगिले.  ते म्हणाले, "उसाच्या नोंदीसाठी साखर कारखान्याचे संचालक आणि चिटबॉयच्या हातापाया पडावे लागते. उसाच्या एफआरपीसाठी आंदोलने करावी लागतात, पोलिसांच्या काठ्या खाव्या लागतात, तुरुंगात जावं लागतं. या सर्व गोष्टी शरद पवार यांना माहिती आहेत. परंतु, आजकाल ऊस उत्पादकांना नावं ठेवण्याची एक पद्धत रूढ झाली आहे. दुर्दैव हे आहे की, याच उसाच्या मुद्यावरुन अनेक जण बँकाचे संचालक झाले, राज्य बँकेवर गेले, राजकारणात पैसा याच आळशी शेतकऱ्यांमुळे मिळाला हे विसरु नका." 

"नदी ओलांडल्यानंतर नावाड्याला जशी शिवी दिली जाते तसा हा सर्व प्रकार आहे. शरद पवार हे दहा वर्षे कृषीमंत्री होते. त्यांना हे माहिती पाहिजे की, ऊस हे एकमेव असं पिक आहे, ज्याला कायदेशीर हमीभावाचे सरंक्षण आहे. आम्ही इतर पिकांना देखील हमीभाव सरंक्षण मागतोय. परंतु, शासनाने जाहीर केलेले हमीभाव केवळ कागदावर राहतात. तुम्ही हमीभावाला सरंक्षण दिलं असतं तर उसा ऐवजी दुसरं पिक घेण्याचा सल्ला देता आला असता, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला. 
 
राजू शेट्टी म्हणाले, "18 महिने ऊस शेतात आहे, ही देखील शासनाची चूक आहे. एक वर्षाआधी तुम्हाला लक्षात आले होते की लागवडीचे क्षेत्र किती आहे? राज्यात चालू आणि बंद स्थितीतील कारखाने किती आहेत? त्यांची गाळप क्षमता किती आहे? याचा अभ्यास केला पाहिजे होता आणि बंद असलेले कारखाने चालू करायला पाहिजे होते. असे केले असते तर सर्व ऊस गाळप झाला असता. हे सर्व राज्य सरकारचं अपयश आहे." 

काय म्हणाले होते शरद पवार? 

"ऊस हे आळशी माणसाचं पीक आहे. म्हणजेच, एकदा लागवड झाली की, अधिकचे कष्ट नसतात. किंवा हातमशागतही नसते. लागवडीपासून सिंचन, मशागत आणि तोडणी देखील यंत्राच्या सहाय्यानं. त्यामुळे ऊस हे आळशी माणसाचं पीक आहे. दराचा विचार न करता उत्पादन घेणं सोपं असल्यानं शेतकऱ्यांचा कल याकडे वाढत आहे. शेतकऱ्यांनी ऊस घेण्यापेक्षा हंगामी पिकांसह फळबागांची लागवड करावी.", असं शरद पवार म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य; पाहा संपूर्ण मुलाखत

Sharad Pawar : कृषीमंत्री असताना देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी केली याचा आनंद : शरद पवार

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: महिलेच्या लैंगिक शोषणाावरून सुरू झालेला तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचला; अशोक खरात प्रकरणात खळबळ
Maharashtra Live Blog Updates: महिलेच्या लैंगिक शोषणाावरून सुरू झालेला तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचला; अशोक खरात प्रकरणात खळबळ
VIDEO : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, पण दुरावा कायम;  निरोप समारंभातील फोटोसेशन चर्चेत
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, पण दुरावा कायम;  निरोप समारंभातील फोटोसेशन चर्चेत
Sugar Industry : साखर कारखान्यांना दिलासा! आर्थिक सहाय्यासाठी राज्यस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
साखर कारखान्यांना दिलासा! आर्थिक सहाय्यासाठी राज्यस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका

व्हिडीओ

Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report
Eknath Shinde Speech Uddhav Thackeray |दीर्घायुष्य लाभो, प्रगती होवो, निरोपाच्या भाषणात भरभरुन बोलले
Bachchu Kadu On Ashok Kharat :खरातसोबत माझी भेट एक्सीडेंटल, व्हायरल व्हिडीओवर कडू स्पष्टच म्हणाले..
Devendra Fadnavis speech on Ashok Kharat: महिलांच्या योनीत बोट, लघवी पाजली, सभागृहात A टू Z सांगितलं
Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : काँग्रेसच्या तुलनेत एक लिटर पेट्रोलवर मोदी सरकार किती टॅक्स लावते? खासदाराने आकडेवारीच मांडली
काँग्रेसच्या तुलनेत एक लिटर पेट्रोलवर मोदी सरकार किती टॅक्स लावते? खासदाराने आकडेवारीच मांडली
Rinku Singh: शाहरुख खानच्या लाडक्या रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय
रिंकू सिंगचं प्रमोशन, कोलकाता नाईट रायडर्सचा आयपीएल सुरु होण्यापूर्वी मोठा निर्णय, कोणती जबाबदारी मिळाली?
Mhada Lottery 2026 : मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लवकरच 2500 घरांसाठी लॉटरी निघणार, किंमत किती असणार? 
मुंबईकरांसाठी गुड न्यूज, लवकरच 2500 घरांसाठी लॉटरी निघणार, किंमत किती असणार? 
Air India : 19 मार्चला कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ,  8 तासात विमान पुन्हा दिल्लीत पोहोचलं, एअर इंडियावर नामुष्की का आली?
कॅनडाला जाणारं विमान चीनमधून परत फिरवण्याची वेळ, एअर इंडियावर नामुष्की कोणत्या कारणामुळं आली?
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका
Ashok Kharat Property : नाशिक, अहिल्यानगर, पुणे अन् पनवेलमध्ये संपत्ती, भोंदू अशोक खरातच्या 40 कोटींच्या संपत्तीचा तपशील हाती, देवेंद्र फडणवीस यांची माहिती
भोंदू अशोक खरातची 40 कोटींची संपत्ती समोर, खरातची जमीन कोणत्या शहरात, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व तपशील मांडला
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
अजित दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळीही कापली; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, कोणाचं नाव घेतलं?
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
... म्हणून रुपाली चाकणकरांचीही चौकशी होणार; अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन
Embed widget