एक्स्प्लोर

देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा

राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आक्रमक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी महाराष्ट्रातील तरुण पिढी ड्रग्जच्या विळख्यात कशी बरबाद होत आहे, याचे अत्यंत भीषण वास्तव मांडले आहे.

Raju Shetti on Devendra Fadnavis: "महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा, शाहू-फुले-आंबेडकरांचा आणि संतांच्या संस्कारांचा आहे. इतका थोर वारसा असलेला महाराष्ट्र कोणाच्या एका वक्तव्याने बदनाम होऊच शकत नाही. पण जेव्हा आम्ही 'बदनामी' शब्द वापरतो, तेव्हा ती राज्याच्या गौरवाबद्दल नसते, तर गल्लीबोळात पसरलेल्या ड्रग्जच्या भीषण वास्तवाबद्दल असते. विरोधकांनी प्रश्न विचारले की ती बदनामी, माध्यमांनी दाखवले की ती बदनामी... मग जनतेने काय मरायचे का? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते?" असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

राजू शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आक्रमक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी महाराष्ट्रातील तरुण पिढी ड्रग्जच्या विळख्यात कशी बरबाद होत आहे, याचे अत्यंत भीषण वास्तव मांडले आहे.

'घराघरांच्या उंबरठ्यापर्यंत ड्रग्ज'

राजू शेट्टी यांनी आपल्या पत्रात थेट गृहमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणतात, "ड्रग्ज विकणारे पेडलर्स आणि आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवणाऱ्या मोठ्या माशांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. मुंबईचे किनारे असोत, पुण्याचे पब-कट्टा संस्कृती असो, नाशिक-संभाजीनगर सारखी शहरे असोत, शाळा-कॉलेज असोत की ग्रामीण भाग ड्रग्जचे जाळे आता प्रत्येकाच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे. तुम्ही मंत्रालयात बसून बदनामीची भाषा करत आहात, पण इथल्या झोपडपट्ट्यांपासून ते हाय-फाय सोसायट्यांपर्यंत, एका बापाची कमाई आणि आईचे कुंकू ड्रग्जच्या विळख्यात रोज जळून खाक होत आहे."

म्हातारपणाची काठी व्हायचे सोडून पोरं आई-बापाचा गळा आवळतायत!

राज्यातील अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांतील तरुण मुले या ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचे सांगताना शेट्टी यांचेtop दुःख आणि संताप अनावर झाला. "आपली मुले डोळ्यांदेखत बरबाद होताना पाहून हतबल झालेले आई-बाप रात्री रडत आहेत. ही बदनामी नाही, हा त्या कुटुंबांचा आक्रोश आहे. ज्या हातांनी म्हातारपणी काठी व्हायचे, ते हात आज ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत. हे पाप कोणाचे?" असा थेट आणि अंगावर येणारा सवाल त्यांनी व्यवस्थेला विचारला आहे.

7 वी, 8 वीच्या निष्पाप पोरांच्या हातात अंमली पदार्थ 

राजू शेट्टी यांनी स्वतः प्रत्यक्ष ग्राउंडवर पाहिलेले भीषण वास्तव मांडताना सांगितले की, "१४ ते २२ वयोगटातील पोरांनी हत्या केलेल्या मयतांच्या वारसांशी आणि आरोपी असलेल्या पोरांच्या आईबापाशी मी स्वतः बोललो आहे. त्यांच्याकडून वस्तुस्थिती ऐकल्यानंतर मी हादरून गेलो. दुनियादारी माहीत नसणाऱ्या ७ वी, ८ वीच्या खेड्यातील निरागस पोरांच्या हातात जेव्हा मी अमली पदार्थ पाहिले, तेव्हा ही व्यवस्था किती सडलेली आहे हे सत्य मला समजले. म्हणूनच जेव्हा नागरिक, माध्यमं किंवा विरोधक यावर बोलतात, तेव्हा तो केवळ राजकीय आरोप नसतो, ती आपल्या घरातील मुलाबाळांच्या सुरक्षेची चिंता असते."

ही 'बदनामीची' नाही, तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई 

पत्राच्या शेवटी शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक सक्षम गृहमंत्री आणि राज्याचे नेते म्हणून राजकारण बाजूला ठेवून काम करण्याचा सल्ला दिला आहे. "महाराष्ट्र कधीच बदनाम होणार नाही, कारण या मातीची ताकद मोठी आहे. पण या मातीतील तरुण जर अंमली पदार्थांच्या नशेत संपून गेला, तर हा प्रगतीशील महाराष्ट्र पुढे कोण नेणार? गृहमंत्री म्हणून आपण ही बदनामीची लढाई म्हणून न पाहता, महाराष्ट्राच्या अस्तित्वाची आणि तरुण पिढीला वाचवण्याची लढाई म्हणून पाहावी. सत्य स्वीकारून यावर निर्णायक प्रहार करावा," अशी आर्त हाक राजू शेट्टी यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Abhimanyu Pawar: अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Embed widget