एक्स्प्लोर
ठाण्यातील तलावांची पाणी पातळी वाढली
जोरदार पावसामुळे ठाण्यातले तलाव भरू लागले आहेत. ठाण्याचा मासुंदा तलाव, जेल तलाव, कचराळी तलाव, मखमली तलाव अशा सगळ्याच तलावांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.

ठाणे: ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार पावसामुळे ठाण्यातले तलाव भरू लागले आहेत. ठाण्याचा मासुंदा तलाव, जेल तलाव, कचराळी तलाव, मखमली तलाव अशा सगळ्याच तलावांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या उन्हाळ्यात याच तलावांची पातळी मोठ्या प्रमाणात घटली होती. ठाणे शहर हे तलावाचं शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र उन्हाळ्यात याच तलावांची झालेली अवस्था पाहून ठाणेकर हळहळले होते. आता मात्र तलावांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येत्या पाच दिवसात ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला असून त्यामुळं ठाण्यातले तलाव ओव्हरफ्लो होतील, अशी शक्यता आहे.
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















