एक्स्प्लोर

Hingoli News : हिंगोली-मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी हिंगोलीकर आक्रमक, अमरावती-तिरुपती एक्सप्रेस रोखली

हिंगोली ते मुंबई  रेल्वे सुरू (Hingoli to Mumbai railway service) करण्यासाठी हिंगोलीकर आक्रमक झाले आहेत.

Hingoli Agitation : हिंगोली ते मुंबई  रेल्वे सुरू (Hingoli to Mumbai railway service) करण्यासाठी हिंगोलीकर आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी आंदोलकांनी आज अमरावती-तिरुपती एक्सप्रेस (Tirupati–Amravati Express) रोखली आहे. आज रेल्वे संघर्ष समिती व्यापारी आणि पत्रकारांच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं. सकाळी नऊ वाजता सर्व आंदोलक हे गांधी चौकामध्ये एकत्र आले होते. या ठिकाणहून मोर्चा काढत सर्व आंदोलक हिंगोलीच्या रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. सर्व आंदोलकांनी एकत्र येत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जायचं असेल तर परभणी किंवा नांदेडहून  पुढील प्रवास रेल्वेने करावा लागतो. हिंगोलीहून मुंबईसाठी रेल्वे फेरी सुरू करावी म्हणून, गेल्या अनेक दिवसापासून रेल्वे संघर्ष समिती व्यापारी त्याचबरोबर हिंगोलीकर हे प्रशासन दरबारी अर्ज विनंती करत आहेत. परंतू याची कोणतीही दखल प्रशासनाने अद्याप घेतलेली नाही. त्यामुळं हिंगोलीकरांनी आज आक्रमक पवित्रा घेतला.

रावसाहेब दानवे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मराठवाड्याचे असताना सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी रेल्वे नाही. त्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली. या आंदोलनामध्ये विविध संघटना आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवला आहे.  आंदोलकांसोबत स्थानिक रेल्वे प्रशासनाने चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतू, आंदोलक आंदोलनावर ठाम होते. पोलिसांनी आंदोलकांना आडवण्याचा प्रयत्नही केला. परंतू आंदोलक थेट रेल्वे रुळावर पोहोचले. आंदोलकांनी रेल्वे रुळावरच आंदोलन सुरू केलं, याच कालावधीमध्ये अमरावती-तिरुपती एक्सप्रेस हिंगोलीच्या रेल्वे स्टेशनवर दाखल होत होती. या रेल्वेला आंदोलकांनी रोखले. यावेळी काही आंदोलक रेल्वेच्या इंजिनवर देखील चढल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांनी केंद्रीय रेल्वेमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याबाबत आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग 

आजच्या या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळींचा सहभाग दिसून आला. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यासह अनेक सामाजिक संघटना व्यापारी त्याचबरोबर वकील आणि पत्रकारांचा सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग होता. हिंगोली ते मुंबई रेल्वे फेरी सुरू करा यासह अन्य मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. 


काय आहेत मागण्या?
 
जालना-छपरा एक्सप्रेस ही पुर्णा-हिंगोली-अकोला मार्गे चालवावी

वाशिम, हिंगोली, वसमतमार्गे मुंबईसाठी रेल्वे सुरु करावी

हिंगोली स्टेशनवर गुड्स शेड उभारावे

वसमत स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील माल धक्का बंद करावा 

हिंगोली-मुंबई रेल्वे सुरू झाल्यानंतर काय होणार फायदा ? 

हिंगोलीवरुन  मुंबईला जाणारी कोणतीही रेल्वे नाही. त्यामुळं कार्यालयीन कामकाजानिमित्त मुंबई जाणाऱ्या नागरिकांना आणि व्यवसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे. जर ही रेल्वे फेरी सुरू झाली तर कार्यालयीन कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना त्याचबरोबर व्यवसायासाठी दळणवळणाला साईस्कर होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील व्यवसायाला सुद्धा यामुळं चालना मिळणार आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी हिंगोलीकरांचा थेट संपर्क राहण्यास मदत होणार आहे. 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी

व्हिडीओ

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
Embed widget