एक्स्प्लोर

नोटाबंदीच्या निर्णयात मोठी पळवाट ठेवली: पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: 'नोटाबंदीमुळे काळ्या पैशाचे पांढरे करण्यास उलट मदतच झाली. जो पैसा बँकेत आला तो पांढरा झाला, मग काळा पैसा गेला कुठे? त्यामुळे नोटाबंदीचा जो काही उद्देश होता तो अजिबात सफल झालेला नाही. किंबहुना नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठी पळवाट त्यामध्ये ठेवण्यात आली. प्रत्येकाला अडीच लाख जमा करण्याची मुभा दिली हिच मोठी त्या निर्णयामागील पळवाट होती.' अशी थेट टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. एबीपी माझाच्या नोटबंदीचे ५० दिवस या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. नोटाबंदीच्या निर्णयात मोठी पळवाट 'ज्या उद्देशाने नोटाबंदी केली, तो उद्देश अजिबात सफल झाला नाही. भारतात 98% रोखीने व्यवहार चालतात. त्यामुळे पूर्वतयारी नसतानाही नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला काँग्रेसनं कधीही विरोध केला नाही. निर्णय योग्य आहे पण त्याची अंमलबजावणी चुकीची होती. काळा पैसा हातात आला कुठे? नोटाबंदीच्या निर्णयात मोठी पळवाट ठेवली. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्येकी अडीच लाख जमा करण्याची मुभा का देण्यात आली? त्यामुळे ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांनी आपल्या जवळच्या लोकांमध्ये ती रक्कम वाटून बँकेत पैसे जमा केले. आणि हिच मोठी पळवाट या निर्णयामध्ये होती.' असा आरोप चव्हाणांनी केला. नोटाबंदीचा नागरिकांना प्रचंड त्रास '500 रुपयाच्या नोटा मोठ्या प्रमाणात छापायला हव्या होत्या. पण हे सरकार ते करण्यात कमी पडलं. नोटा तयार ठेवायला पाहिजे होत्या. पण ते काहीही त्यांना जमलं नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास झाला. अजूनही लोकांना खरी परिस्थिती माहित नाही. पण किती मोठी लोकं रांगेत उभे राहिलेलं पाहायला मिळाले. असं काहीही झालं नाही. मोठ्या लोकांनी तेच पैसे सोन्यात गुंतवले. इतर ठिकाणी गुतवंले. त्यामुळे आता जो पैसा बँकेत जमा झाला तो सगळा पांढरा पैसा आहे. त्यामुळे सरकारच्या हातात काहीच आलं नाही.' असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. कॅशलेससाठी नोटाबंदीची गरज होती का? 'कॅशलेससाठी तुमच्याकडे पुरेशी तयारी नाही. ग्रामीण भागात कनेक्टिव्हीटी नाही. कॅशलेस करण्यासाठी नोटाबंदीची गरज होती का? नोटाबंदी हा निर्णय फक्त काळा पैसा काढण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय. पण त्या निर्णयाचा फार काही फायदा सरकारला झाला नाही. तसंच कॅशलेस झाल्यावर भ्रष्टाचार कमी होतो हा गैरसमज देखील करुन घेऊ नका.' असंही चव्हाण म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय चुकीचाच 'नोटाबंदी करणं हे योग्य नव्हतं हे खुद्द रघुराम राजन यांनीही म्हटलं आहे. आणीबाणी निर्णयाबाबतीच इंदिरा गांधींनी मोठेपणानं माफी मागितली होती. या सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता हे मान्य करायला हवं. पण आता या सर्वात मार्ग काढणं गरजेचं आहे. मी मार्ग सुचवला होता. २००ची नोट काढा, २०००ची नोट बंद करावी हे आधीच सांगितलं आहे.' असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget