एक्स्प्लोर

Prithviraj Chavan: सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan: पुढील 15-16 दिवस गोडाऊनला पेठ्या ठेवल्या जातील आणि सरकारला घालमेल करायची असेल, तर केली जाईल असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Prithviraj Chavan: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील सावळा गोंधळावरून माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. पुढील 15-16 दिवस गोडाऊनला पेठ्या ठेवल्या जातील आणि सरकारला घालमेल करायची असेल, तर केली जाईल असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की भाजप सरकारने 73 आणि 74 व्या घटनात्मक अधिकाराला पायदळी तुडवल्याचा आरोप त्यांनी केला. या देशांमध्ये लोकशाही नाहीतर हुकूमशाही येईल असेही ते म्हणाले. निकाल पुढे ढकलल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त करतानाच ही शंभर टक्के सरकारची चूक असल्याचे त्यांनी सांगितले. 

आयोग भाजपचा असल्याचा आरोप

राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचा प्रचार संपत असताना, मतदानाच्या केवळ एक दिवस आधी काही नगरपालिकांमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. या निर्णयावरून राज्यात मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहेत. चव्हाण म्हणाले की, “निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळाला सरकारच जबाबदार आहे.” गेली पाच वर्षे राज्यात नोकरशाहीचे राज्य आहे, आणि अचानक 20 नगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाण्यामागे सरकारचा हस्तक्षेप असल्याचा आरोपही त्यांनी केला. आयोग भाजपचा असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, कितीही आंदोलने झाली, किंवा राहुल गांधीनी कितीही आवाज उठवला, तरी काहीही बदल होणार नाही.

देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होण्याची शक्यता

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय राजकारणाचा उल्लेख करताना चव्हाण यांनी एक मोठा दावा केला. “देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होण्याची शक्यता आहे,” असे ते म्हणाले. एपस्टाईन फाईल्समुळे अमेरिकेत गेल्या सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या गदारोळाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्या फाईल्स सार्वजनिक झाल्यास त्याचा भारताच्या राजकारणावरही मोठा परिणाम होऊ शकतो. चव्हाण म्हणाले, “जेफ्री एपस्टाईन नावाच्या अमेरिकन उद्योगपतीने अनेक बेकायदेशीर कृत्ये केली आणि अनेक देशांतील मोठ्या नेत्यांना त्यात ओढलं. त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव आहे. संसदेने ट्रम्प यांच्यामागे सतत पाठपुरावा केला असून जवळपास 10 हजार कागदपत्रे त्यांच्या ताब्यात आहेत. ही कागदपत्रे उघड झाल्यास ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागू शकतो.” सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत व्हिडिओ प्रसिद्ध केल्याची माहितीही त्यांनी दिली. “पुढील महिनाभरात मोठे राजकीय बदल घडू शकतात. मी फक्त एवढेच म्हटले की मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. त्याचा अर्थ ज्याने त्याने लावावा,” असे चव्हाण म्हणाले.

 

इतर महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Pratap Sarnaik on Eknath Shinde: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Embed widget