एक्स्प्लोर

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राष्ट्रपती राहणार उपस्थित, लातुरात जय्यत तयारी सुरू 

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( Ramnath Kovind) उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींना साहित्य संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली यंदाचे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद  ( Ramnath Kovind) उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींना साहित्य संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार  (Sharad Pawar)  यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह लातूरमधील सर्व पक्षांच्या आमदार आणि खासदार या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत. 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी लातूर येथे हे साहित्य संमेलन होणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमावर्ती भागात हे संमेलन होत आहे.  

लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आज साहित्य संमेलनाच्या नियोजनाविषयी माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेत साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संजय बनसोडे, भाजप खासदार सुधाकर श्रींगारे, भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर,  भाजप आमदार अभिमन्यू पवार, भाजप आमदार रमेश कराड, शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे,  लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

कोरोना महामारीनंतर होणाऱ्या या साहित्य संमेलनात सर्वच पक्षांनी फक्त लक्षच घातले नाहीतर प्रत्यक्ष सहभाग ही घेतला आहे. इतर वेळी राजकीय आरोप प्रत्यारोप करताना टोकाच्या भाषेचा वापर करणारे विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी एकत्र आलेले पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.  
         
लातूर येथील उदगीरच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालया हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. तयारीसाठी कमी वेळ मिळाला असला तरी मिळालेल्या वेळेत युद्ध स्तरावर तयारी सुरू आहे. देशभरातील 1000 पेक्षा जास्त मराठी साहित्यिक आणि कविंना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांची उदगीर, लातूर, बिदर आणि नांदेड येथे राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.  

36 एकरात मंडप 
एप्रिल महिन्यातील उन्हाळा आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेत मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास 36 एकर परिसरात मंडप उभारण्यात येत आहे. त्यामध्ये विविध सभागृह आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मुख्य मंडपात 5000 लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.  
    
यंदाच्या साहित्य संमेलनाला साहित्यिक आणि राजकारण्यांबरोबरच कलावंताची हजेरी असणार आहे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयच्या प्रांगणात साहित्य संमेलनाचे आयोजन होणार आहे. यावेळी या संस्थेचा हिरक महोत्सवही होणार आहे. त्यानिमित्ताने  20 एप्रिल रोजी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचा लाईव्ह कार्यक्रम असणार आहे.  21 तारखेला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget