एक्स्प्लोर
मराठवाडा-विदर्भासाठी पुढचे 2 दिवस धोक्याचे, वादळी पावसाची शक्यता
मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे चिंतेचे ढग हटलेले नाहीत. पुढचे २ दिवसही वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. जालना, बीड, वाशिम, अकोला, बुलडाण्यात गारपीटीसह पाऊस झाला.
मुंबई : मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे चिंतेचे ढग हटलेले नाहीत. पुढचे २ दिवसही वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीनं थैमान घातलं. यामुळे हरभरा, ज्वारी, गहू, द्राक्षांसह अनेक उभी पिकं भुईसपाट झाली. मात्र, तोंडचा घास हिरावल्यानं शेतकऱ्यांच्या डोक्यासमोर समस्यांचा डोंगर आ वासून उभा राहिला आहे. लिंबाएवढ्या गारांनी शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरलं आहे. त्यामुळे पुढचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्याला आणखी आटापिटा करावा लागणार आहे. दरम्यान, राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती आणि जालना जिल्ह्याला बसला आहे. संबंधित बातम्या : मराठवाडा, विदर्भात पुन्हा गारपीट, परभणीत महिलेचा मृत्यू, पिकं उद्ध्वस्त गारपिटीचा 11 जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टरला फटका
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















