एक्स्प्लोर

मेगाभरती निवडणुकांच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

सरकारच्या मेगा भरतीत कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी आदी विविध पदांसाठी ही भरती होणार आहे.

मुंबई : सरकारने मार्च महिन्यात मेगाभरतीची घोषणा करत बेरोजगार तरुणांना दिलासा मिळाला होता. मात्र चार महिन्यांपासून घोषणा होऊनही भरती प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आता जालना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 26 ऑगस्टपर्यंत निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी आचारसंहिता 19 जुलैला लागू झाली आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील. त्यामुळे मेगाभरती निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची दाट शक्यता आहे. मेगा भरतीच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी 16 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली होती. शुल्क भरण्यासाठी अडचणी आल्या. आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेच्या काळातही हजारो बेरोजगार तरुणांनी ऑनलाइन अर्ज भरले. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाकडून कोणतेही निर्देश किंवा सूचना जिल्हा प्रशासनाला आल्या नाहीत. जिल्हा प्रशासनानेही कोणतेही मार्गदर्शन मागवले नाही. त्यातच औरंगाबाद जालना विधान परिषदेची निवडणूक आचारसंहिता 19 जुलैला लागू झाली. फडणवीस सरकारच्या मेगा भरतीत कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी आदी विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. पण ही भरती कधी होणार हा प्रश्न आहे. औरंगाबाद जालना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 26 ऑगस्टपर्यंत निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल. त्यासाठी सप्टेंबर महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल. त्यामुळे मेगा भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणांना आणखी तीन-चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारच्या मेगाभरतीला आचारसंहितेचा फटका शासनाने आपल्या कार्यकाळातील बेरोजगारीचा कलंक पुसण्यासाठी मेगाभरतीची दारे खुली केल्याने बेरोजगार तरुणांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र गेल्या चार महिन्यांपासून या भरती प्रक्रियेची गाडी काही पुढे सरकलेली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आता ही मेघा भरती विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे. जिल्हा परिषदेने 2 मार्च रोजी 362 विविध संवर्गातील पदे भरण्यासाठी मोठी  जाहिरात प्रसिद्ध केली होती. शासनाच्या मेगाभरतीचा गाजावाजा पाहता ही प्रक्रिया सुरळीत पार पडेल असे वाटले होते मात्र या भरतीचे घोडे कुठे पेंड खाऊ लागलय असा अनेकांना प्रश्न पडला आहे. 2 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या जागांसाठी निघालेल्या जाहिरातीत कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता (सहायक), पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहायक (लेखा), कनिष्ठ सहायक (लिपिक), विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी आदी विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. सुरुवातीला 16 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. शुल्क भरण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या अडचणी आल्याने या साठी आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. म्हणजेच ती 23 एप्रिल करण्यात आली. आचारसंहितेचा ब्रेक? 11 एप्रिल ते 19 मे 2019 दरम्यान जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्या अगोदर राज्यातल्या हजारो बेरोजगार तरुणांनी ऑनलाइन अर्ज भरले. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाकडून कोणतेही निर्देश किंवा त्या संबंधीच्या सूचना जिल्हा प्रशासनाला आल्या नाहीत. प्रशासनानेही याबाबत कोणतेही मार्गदर्शन मागवले नाही. त्यातच  आता 19 जुलै रोजी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. 26 ऑगस्टपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यानंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल. सप्टेंबर महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मेगाभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणांना आणखी तीन-चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेची जिल्हा निहाय पदसंख्या 1)अहमदनगर- 729 2)नांदेड-  557 3)अकोला - 242 4)नंदुरबार- 332 5)अमरावती - 463 6)नाशिक -687 7)औरंगाबाद -362 8)उस्मानाबाद -320 9)बीड -456 10पालघर -708 11)भंडारा-143 12)परभणी -259 13बुलढाणा -332 14)पुणे-595 15)चंद्रपूर -323 16)रायगड-510 17)धुळे- 219 18)रत्नागिरी -466 19)गडचिरोली -335 20)सांगली -471 21)गोंदिया- 257 22)सातारा-708 23)हिंगोली-150 24)सिंधुदुर्ग-171 25)जालना -328 26)सोलापूर 415 27)जळगाव-607 28)ठाणे 196 29कोल्हापूर-552 30)वर्धा- 264 31)लातूर -286 32)वाशिम-182 33)नागपूर-405 34)यवतमाळ -505 नोकरभरतीला सध्या अडथळ्यांची शर्यत पार पडावी लागत आहे. जालना निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया किंवा त्या संबंधीची परीक्षा वगळता अन्य नोकरभरती प्रक्रिया होत नसल्याचे सांगत विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेनंतरच ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे म्हटले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात शासकीय नोकरीची मोठी संधी, 571 पदांसाठी मोठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
महाराष्ट्रात शासकीय नोकरीची मोठी संधी, 571 पदांसाठी मोठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
पेट्रोलसाठी बुलढाणा आणि परभणीत हाहाकार! 2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, अनेक पेट्रोल पंप बंद असल्यानं नागरिकांची तारांबळ
पेट्रोलसाठी बुलढाणा आणि परभणीत हाहाकार! 2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, अनेक पेट्रोल पंप बंद असल्यानं नागरिकांची तारांबळ
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
साखर कारखान्यांकडे 650 कोटी रुपयांची FRP थकीत, शेतकरी संकटात, कारखान्यांवर कारवाई करण्याची किसान सभेची मागणी
साखर कारखान्यांकडे 650 कोटी रुपयांची FRP थकीत, शेतकरी संकटात, कारखान्यांवर कारवाई करण्याची किसान सभेची मागणी

व्हिडीओ

Sushma Andhare Vs Sheetal Mhatre : फार्म हाऊसला पाणी, राजकीय उणीदुणी Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर
Sushma Andhare on Sheetal Mhatre : खरातला पाणी देण्यासाठी रुपाली चाकणकरांची शिफारस, मग बंदूक कुणी दिली?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rinku Singh: उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
Income Tax Update : 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
BCCI Schedule Update : रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी
रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी
Embed widget